Followers

Wednesday, 20 May 2020

प्रकरण क्रमांक (२५) "सौराष्ट्र दौरा"



                  "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
          'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२५) 
   
                                 "सौराष्ट्र दौरा"

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यावर मानव-धर्म स्थापन केला. हा नवीन धर्म असल्यामुळे ते अहोरात्र या मार्गाचा प्रसार करण्याकरिता आणि मानवजागृती व्हावी म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी गेले ५३ वर्षे सारखे गावोगोवी, खेडोपाडी दौरा करीत आहेत. त्यामुळे हा मार्ग अनेकांनी अवलंबिलेला आहे, आजच्या घटकेस या मार्गात हजारो कुटुंबातील लोकं सेवक आहेत. सुरूवातीला जरी या मार्गाची वाढ अत्यंत धिम्या प्रमाणात झाली तरी आता ती उत्तरोत्तर वाढतच आहे. खालील तक्त्यावरून हे लक्षात येईल.
   १९४७ ते १९७० पर्यंत २३८ परिवार 
   १९७१ ते १९८० पर्यंत १,१२६ परिवार 
   १९८१ ते १९९० पर्यंत ३,३५२ परिवार 
   १९९१ ते २००० पर्यंत १०,५०६ परिवार 
   २००१ ते ३१ डिसेंबर २०१० पर्यंत २४,९८८ परिवार
सुरूवातीला जास्त सेवक न होण्याचे कारण की हा मार्ग एकदम नवीन आहे. जुनी संस्कृती सोडून नवीन संस्कृतीची ही निर्मिती आहे. वर्षानुवर्ष लोकांमध्ये जे जुने आचारविचार आहेत, ज्या भावना आहेत. त्यांना काडीमोड देणे लोकांना जमत नाही. परंतु या मार्गाचा सेवक झाल्यावर त्यांना जो आत्मानुभव येतो तो पाहून या नवीन संस्कृतीमध्ये लोकांचे आगमन होत आहे. गावोगावी बाबांनी दौरा केल्यामुळे या मार्गाचे सेवक भारताच्या चारही भागात पसरलेले आहेत. इतकेच नव्हे तर अमेरिकेला सुद्धा या मार्गाचे सेवक आहेत. असाच एक दौरा १९८२ साली २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत सौराष्ट्र येथे गेला होता. या दौऱ्यात महानत्यागी बाबा जुमदेवजीसोबत गावोगावचे साधारणतः ५० सेवक होते. बाबांनी केलेल्या प्रत्येक दौऱ्यात विशेष अनुभव येतात. सौराष्ट्र दौऱ्यात सुध्दा असे अनेक अनुभव आलेत. ते अनुभव परमेश्वराने कशाप्रकारे दिले हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल.

     महानत्यागी बाबा जुमदेवजी साधारणतः ५० सेवकासोबत दिनांक २० नोव्हेंबर १९८२ ला सायंकाळी ७ वाजता हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसने सुरतला जाण्यास निघाले. २१ नोव्हेंबर ला दुपारी १:३० वाजता ते सुरत येथे पोहचले. दि. २२ नोव्हेंबर ला निंबायत खाडी सुरत येथे हवनकार्य आटोपून तेथील सेवकांचा परिचय बाबांना करून देण्यात आला. त्यानंतर तेथे उपस्थित सेवकांनी या मार्गाची दीक्षा घेण्याचे कारण आणि त्यांचे आत्मानुभव यावर चर्चा झाली. रात्री ८ वाजता मानवजागृतीवर अनुभवात्मक भजनाचा कार्यक्रम होऊन बाबांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर जेवण करून आराम केला.

दिनांक २३ डिसेंबर १९८२ ला सुरत शहर बघण्याचे ठरले म्हणून बाबा सेवकांबरोबर सुरत दर्शनाकरीता दुपारी १ वाजता निघाले. निघताना बाबांनी सर्व सेवकांना आदेश दिला की, आपण कोणत्याही देवळात किंवा मंदिरात गेलो तरी तेथील मूर्तीला नमस्कार करू नये. फक्त मानवाने तयार केलेली कला बघू, कारण परमेश्वर दगडात नाही. तो निर्जीव वस्तूंमध्ये नाही तर सजीवांमध्ये आहे. 

सुरत शहर बघता बघता ते अंबामातेच्या देवळात गेले. तेथे बाबांनी पुन्हा सर्वाना आठवण करून दिली की मूर्तीला नमस्कार करू नये. आपण येथे या देशातील कला पाहावयास आलो आहोत. तरी कला बघून पुढे जाऊ या. देऊळाच्या पायऱ्याशेजार खालच्या बाजूला हनुमानजीचे मंदिर होते. सर्वजण देवळाच्या बाहेर निघाले पण हेमराज सातपुते आणि आसाराम सव्वालाखे हे मागे राहिले. हनुमानजीचे देऊळ असल्यामुळे आणि या मार्गाचे प्रतीक बाबा हनुमानजी असल्यामुळे हेमराज सातपुते यांचे मन होलावले आणि "तेथे कर माझे जुळती" या म्हणीप्रमाणे त्यांनी श्रध्देने त्या हनुमानजीच्या मूर्तीला नमस्कार केला. आसारामजी सव्वालाखे यांनी पाहिले. परंतु दोघांनीही त्याबद्दल आपसात चर्चा केली नाही. किंबहुना ही आपली चूक झाली. येथे त्यांनी बाबांचा शब्द तोडला. त्यांचे हे परमेश्वराचे शब्द असल्यामुळे तो एकाअर्थी परमेश्वराचा अपमान झाला होता. त्यानंतर पुढे साईनाथ मंदिर तापी नदी, चमडीभर जागा बघून पुढे अश्विनीकुमार तीन पत्ती हा भाग सर्वानी पाहिला परंतु तेथे अक्षरश: तीन पत्तीदेवजी पाच पत्ती होती. सर्वांनीच बाबांच्या आदेशाचे पालन करून कोणत्याही देवळात नमस्कार केला नाही. फक्त सृष्टिसौंदर्य, नवनवीन तयार केलेली कलात्मक देवळे, भव्य इमारती इत्यादी रमणीय स्थळे पहिली. अश्विनीकुमार तीन पत्ती बघून तेथून सायंकाळी लिंगायत खाडी येथे परत येण्यास निघाले. सुरत दर्शनाकरीता स्पेशल बस केली होती.

परत येतांना बसच्या समोर एक व्यक्ती आली आणि त्याला वाचिवण्याकरिता बसच्या ड्रायव्हरने जोरात ब्रेक मारला. सातपुते हा मागे बसला होता आणि आसारामजी सव्वालाखे हा समोरच्या सीटवर जे ५ जण बसले होते त्यापैकी एक जण होता. ब्रेक जोराने मारल्यामुळे बस एकदम थांबली आणि बस मधील सेवक लोकं आपआपल्या सीटवरच आदळलेत. परंतु हेमराज सातपुते हा त्याच्या सीटवरून उडून आसाराम सव्वालाखेच्या अंगावर जाऊन आदळला. तसा हेमराज सातपुते हा सव्वालाखेच्या सीटपासून ३-४ सीट मागे बसला होता. या घडामोडीमुळे सव्वालाखेच्या छातीला जबर मार लागला त्यामुळे तो मी मरतो आहे असे जोराने बसमध्येच ओरडू लागला. त्यानंतर बस सरळ डॉक्टरांकडे नेण्यात आली. तेथे त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. अपघाताची केस असल्यामुळे डॉक्टर औषधोपचार करण्यात तयार नव्हते परंतु बाबांची महिमा ऐकून त्यांनी औषधोपचार केला. हे कसे घडले हे डॉक्टरांनी विचारले असता त्यांना सांगण्यात आले की, सव्वालाखेवर सातपुते पाच फुट जागेवर आपटला गेला. तेव्हा डॉक्टर म्हणाले फार मोठी दुखापत झाली आहे. पण औषध दिलेले आहे आराम होईल त्यानंतर निंबायत खाडी येथे सर्वजण परत आले.

    रात्री ८ वाजता उघना यार्ड, सुरत येथे सेवकांचे अनुभावात्मक भजनकार्य, सेवकांचे अनुभव यावर चर्चासत्र झाले आणि शेवटी मानवजागृतीवर बाबांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम सुरू असतांना सव्वालाखे निंबायत खाडी येथे आराम करीत होता. त्याच्या प्रकृतीला पूर्णपणे आराम पडला नव्हता. बाबांनी सेवकांना कोणती चूक झाली हे विचारले असता कोणीही सांगावयास तयार नव्हते कोणाच्याही लक्षात त्याची चूक आली नाही. शेवटी सव्वालाखे यांच्या लक्षात त्याच्या हातून झालेली चूक लक्षात आली आणि त्याने एका सेवकाच्या हातून बाबांना कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणी झालेल्या चुकीची माहिती देण्यास पाठविले. बाबांना हि गोष्ट कळल्यावर ते निंबायत खाडीला कार्यक्रम आटोपल्यावर परत आले. त्यांनी सातपुतेला विचारले असता त्याने होकार दिला की, मी हनुमानजीच्या देवळात नमस्कार केला आणि सव्वालाखे यांनी ते पाहिले. मी आपल्या आदेशाचे उल्लंघन केले ही माझी महान चूक झाली आहे असे बाबा आणि उपस्थित सेवकांना सांगून तो पुढे म्हणाला की, माझ्या हातून घडलेल्या चुकीबद्दल भगवान बाबा हनुमानजी आणि महानत्यागी बाबा जुमदेवजी तसेच सेवकबंधू क्षमा करतील अशी त्याने बाबांना विनंती केली. त्याप्रमाणे बाबांनी दोघांच्याही हातून घडलेल्या चुकीबद्दल क्षमा केली आणि तिकडे सव्वालाखे यांच्या प्रकृतीला आराम पडला, तत्पूर्वी सव्वालाखेला एका तासातून तीनवेळा बाबा हनुमानजीला क्षमा मागण्यास सांगितले अशाप्रकारे बाबांनी दोघांनाही क्षमा करून त्यांना त्यांच्याकडे झालेल्या चुकीपासून मुक्त केले. परंतु ही चूक अगोदरच सांगितली असती तर त्या दोघांवर ही आपत्ती आली नसती. 

     यावरून हे सिध्द होते की, चूक दाबून ठेवली, त्यातल्या त्यात बाबांच्या आदेशाचे पालन केले नाही तर किती मोठे दुःख येते. जसे चोरी करणाऱ्या पेक्षा चोरी करण्यास सांगणारा माणूस हा मोठा गुन्हेगार होतो त्याप्रमाणे चूक करण्यापेक्षा चूक लपविणारा हा जास्त गुन्हेगार असतो हे सिध्द होते. त्याचप्रमाणे परमेश्वराला चुकीची क्षमा मागितल्यास तो मानवाला क्षमा करून त्याचे दुःख दूर करतो. इतका परमेश्वर मायाळू आहे.

      त्या दिवशी रात्रीला १२ वाजता जेवण आटोपून काहीजण तेथे झोपले होते, तर काहीजण जागेच्या अभवामुळे दुसऱ्या सेवकांकडे २-३ ठिकाणी झोपावयास गेले होते. रात्री दोन वाजताच्या सुमारास सर्व सेवकांना उलटी आणि शौचास होऊ लागले. यावरून बाबांना आणि सर्वांना वाटले की अन्नातून विषबाधा झाली असावी. तेथे बाबांनी असा आदेश दिला की, जेथे जेथे सेवक थांबले आहेत तेथून त्या सेवकांची माहिती आणावी. त्याप्रमाणे माहिती घेतली असता ज्या ज्या ठिकाणी सेवक थांबले होते त्या त्या ठिकाणी ज्या सेवकांनी जेवण केले होते त्या सर्वांनाच उलटी आणि शौचास होत आहे हे समजले. हे समजल्यावर बाबांनी श्री. शिरपूरकर सेवक याला सांगितले की, जवळपास कोणी डॉक्टर असेल तर त्याला बोलावून आण कारण ही अन्नातील विषबाधा दिसते आहे. सर्व सेवक परमेश्वराच्या नावाचा सारखा जयघोष करू लागले शिरपूरकर डॉक्टरांकडे गेल्यावर त्याला डॉक्टरांनी विचारले की उलटी कशी होते, तेव्हा ईश्वरी कला, त्याच क्षणी शिरपूरकरला उलटी आली आणि डॉक्टर समोरच उलटी करीत, अशी उलटी करीत आहेत आणि सारखे शौचास जात आहेत असे त्यांनी सांगितले. ते डॉक्टरला घेऊन आले. डॉक्टरांनी सर्वांना तपासून इंजेक्शन दिलेणी ओषधोपचार केला. 

लहान मोठे मिळून साधारण २०० सेवकांना विषबाधा झाली होती. म्हणून बाबांनी सांगितले की आपण या सर्वांवर कोठूनही औषध उपलब्ध करून औषधोपचार करा कारण ही विषबाधा होणे चांगले नाही. अशी घटना घडणे हे योग्य नव्हे कारण आम्ही नागपूरला राहत असून भगवतकार्याचा दौरा करीत आहोत. बाबांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनी सर्वांवर उपाय करून विषबाधेपासून सर्वांना वाचविले. काही सेवक खूब लांब झोपायला गेले होते. त्यांच्या प्रकृतीविषयी त्या दिवशी माहिती मिळू शकली नाही. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी असे कळले की, त्यांना सुद्धा विषबाधा झाली होती. परंतु त्यांनी भगवंताच्या नावाचे (बाबा हनुमानजी) तीर्थ घेतल्यामुळे विना औषधाने त्यांची विषबाधा नाहीशी झाली. त्या दिवशी रात्री सर्वजण औषधोपचारानंतर शांत झोपले. कोणतीही वाईट घटना घडली नाही. परमेश्वराने सर्वांना जीवदान दिले

दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी बाबांना आपल्या घरी चहा पिण्याकरिता निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे बाबा सेवकांना घेऊन त्या डॉक्टरांकडे चहापाणी घ्यावयास गेले. तेव्हा डॉक्टरांनी बाबांना सांगितले की रात्रीला झालेली विषबाधा ही भयंकर स्वरूपाची होती. जरी औषधोपचार केला तरी ती आटोक्यात येण्यासारखी नव्हती. उलट कितीतरी जण दगावयास पाहिजे होते. परंतू कोणीही दगावले नाही. यावरून आपल्याजवळ फार मोठी परमेश्वरी शक्ती आहे असे मला वाटते. त्यावर बाबांनी डॉक्टरांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, या मार्गावर जागृत शक्ती आहे . म्हणून कोणी दगावले नाही. या परमेश्वरी कृपेचा अनुभव या मार्गातील कित्तेक सेवकांना आलेला आहे.

दि. २४ नोव्हेंबर १९८२ साली पटलेवाडी सुरत येथे सेवकांचा परिचय, अनुभव कथन आणि बाबांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर २५ नोव्हेंबर १९८२ ला रात्री साडेदहा वाजता बसने अहमदाबादला बाबा सेवकांसोबत जावयास निघाले. २६ नोव्हेंबरला बापूनगर, मोरारजी चौक, अहमदाबाद येथे भगवतकार्याचे चर्चासत्र, अनुभव, परिचय आणि बाबांचे मानवजागृतीवर मार्गदर्शन झाले. दि. २७ नोव्हेंबरला अहमदाबाद दर्शनाकरिता बसने निघून झुलता मिनार, गोमतीपूर, काकडीया तलाव, बालवटीका, अपना बाजार, सिद्धी सय्यद जाळी, भद्राकली मंदिर, हरिसिंगची वाडी, गांधी आश्रम, मानव मंदिर ओपन सिनेमा हॉल, विज्ञान भवन, भाव निरझर इत्यादी ऐतिहासीक स्थळे पाहलीत. सेवकांनी मंदिरात नमस्कार केला नाही, तर केवळ मानवाने बनविलेली कलाकृती पाहिली.

दि. २८ नोव्हेंबरला सौराष्ट्र पाहण्याकरिता स्पेशल बसने सर्व सेवक निघाले. सायला चोतील, नवरगुजा पाहून जामनगर पाहिले आणि रात्री जामनगरला मुक्काम केला. या बसमध्ये जेवणाकरिता एक काँट्रॅक्टर ठेवला होता. त्याने सेवकांशी व्यवस्थित व्यवहार केला नाही. त्याने सेवकांना त्रास दिला. पोटभर जेवण दिले नाही. बाबा बरोबर असल्यामुळे परमेश्वरी कृपा होती. त्यामुळे त्याच्यावर खूब वाईट प्रसंग आले. त्याचा स्टोव्ह झाडाला अडकून फुटला. त्याने काटकसर करूनही त्याला या धंद्यात खूब मोठा तोटा झाला आणि तो आर्थिक अडचणीत आला.

दि. २९ नोव्हेंबरला बाबा आणि सर्व सेवक जामनगरवरून द्वारकापुरी येथे आले. तेथे सुदामपुरी, द्वारका मंदिर, अरबी समुद्र पहिला. नंतर समुद्रात असणाऱ्या द्वारकामंदिरात जाण्याकरिता सर्वजण नावाने निघाले. नावेत ५० सेवक आणि ५० लोक इतर असे एकूण १०० लोक बसले होते. बाबा नावेतील वरच्या भागाला बसले होते. नाव सुरू झाली. नाव पाण्यातून जातांना ती दोन्ही बाजूंना डोलू लागली. तेव्हा नाविक खूब घाबरला. त्यांच्या लक्षात येईना की, वारा नसतांना नाव हेलकावे का घेत आहे. नावेचे दोन्ही काठ पाण्याच्या पातळीपर्यंत हेलकावे घेत होते. तेव्हा सेवकांनी बाबा हनुमानजींच्या जयघोष केला. त्यांत इतर लोकही सामील झाले आणि नावेचे हेलकावे घेणे बंद झाले. त्यानंतर नाव सुरळीतपणे द्वारका मंदिरात पोहचली. जेव्हा नाव समुद्रातून जात होती तेव्हा जोराचा वारा सुरू नव्हता किंवा समुद्राच्या लाटाही जोराने वाहत नव्हत्या. नावाने हेलकावे खाणे ही परमेश्वरी लीला होती असे बाबांचे म्हणणे होते. सेवकांनी मंदिरात नमस्कार केला नाही, तर केवळ मानवाने बनविलेली कलाकृती पाहिली. नावेने हेलकावे खाणे ही परमेश्वरी लीला होती. असे बाबांचे म्हणणे होते. 

  द्वारकामंदिराच्या परिसरात पोहचल्यावर बाबांनी नेहमीप्रमाणे सर्व सेवकांना कोणत्याही देवळात नमस्कार करू नये असे आदेश दिले. परिसरात शिरल्याबरोबर कृष्णमंदिराजवळ सर्वजण पोहचले. द्वारकानगरीचे मुख्य द्वार बंद होते. ते सायंकाळी ६ वाजता उघडणार होते. तोपर्यंत सर्वजण दार उघडण्याची वाट पाहून तेथेच थांबले,बरोबर ५ वाजता मुख्य द्वार उघडले गेले. तेथून सर्वजण सुदाम महाराजांच्या बैठकित गेले. तेथे जे सुदाम महाराज होते ते बैठकित आले आणि आपल्या सिंहासनावर बसले. त्या ठिकाणी अशी एक प्रथा आहे की प्रथम सुदाम महाराज लोकांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून दान वसूल करतात आणि त्यानंतरच पुढे द्वारकानगरी पाहण्यासाठी आत जाऊ देतात. त्याप्रमाणे सुदाम महाराज आपल्या आसनावर बसल्यानंतर बाबांसह सर्व सेवक आणि इतर लोक खाली बसले. यानंतर सुदाम महाराजांनी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. ते सांगू लागले की कृष्णाची द्वारका आहे. येथे दान केल्यास पुण्य मिळते . अन्यथा त्रास होतो. म्हणून पुण्य मिळविण्याकरिता आपल्या शक्तीनुसार प्रत्येकाने ५०१, १००१, ५००१ रुपये दान करावे हे ऐकून बाबांना आश्चर्य वाटले. या मार्गातील एक सेवक श्री. नागेराव खापरे यांना बाबांनी सांगितले की, त्या सुदाम महाराजांना सांगा की, आमच्याबरोबर आमचे धर्मगुरु महानत्यागी बाबा जुमदेवजी आहेत. ते निष्काम भावनेने कार्य करतात. ते गुरुपूजा घेत नाहीत आणि दान पण देत नाहीत. म्हणून आम्ही तुम्हाला दान देऊ शकत नाही. त्याप्रमाणे नागोराव खापरेंनी सुदाम महाराजांना तसे सर्वासंमक्ष सांगितले. तेव्हा हे ऐकून तेथील पुजाऱ्यांनी सेवकविरुद्ध कट रचला की यांना दर्शन घेऊ द्यायचे नाही. तेथून सर्वजण कृष्णाच्या देवळाजवळ आले तेथे सर्वजण देवळाचे दार उघडेल या आशेने थांबले होते. परंतु कट केल्याप्रमाणे तेथील पुजारी एकानंतर एक परत जात होते, पण कृष्णाच्या मंदिराचे दार उघडले नाही. तेव्हा तेथेच बाबांनी सर्व सेवकांना मार्गदर्शन करून त्यांच्याबरोबर जे इतर लोक होते त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, या देशात पुजाऱ्यांची एवढी सत्ता आहे की, ते दान दिल्याशिवाय देवाचे दर्शन घेऊ देत नाहीत. पुजारी लोकांनी देवाला विकायला काढले आहे. पण देव देवळात नाही. तो प्रत्येक मानवाजवळ आहे. त्यांचा आत्म्यात आहे. म्हणून म्हटले आहे की,

"मंदिर, मस्जिद, गुरुद्वारोने बाँट लिया भगवान को,
सागर बाँटो धरती बाँटो, मत बाँटो इंसान को।"

मानवाला आपसात वाटू नका कारण त्याला वाटल्यास भगवंताला (परमेश्वराला) वाटल्यासारखे होईल. त्यानंतर बाबांनी सर्व सेवकांना आदेश दिला की, बाबा हनुमानजीचा जयघोष करून परत चला. त्याप्रमाणे सर्व सेवकांनी खालीलप्रमाणे जयघोष केला.

भगवान बाबा हनुमानजी की जय। 
महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय। 
परमात्मा एक।। 
सत्य, मर्यादा, प्रेम कायम करनेवाले 
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले 
मानव धर्म की जय।

आणि सर्व सेवक मुख्य व्दाराच्या बाहेर निघाले. एक सेवक श्री. केशव चिचघरे हा सर्वात मागे राहिला होता. मुख्य व्दाराजवळ एक साधू, धुनी लावून बसला होता. केशव चिचघरे जेव्हा गेटजवळ आला तेव्हा एक पुजारी असे म्हणाला की, यांनी दान दिले नाही. म्हणून यांची नाव पाण्यात बुडेल. हे शब्द त्या साधूकडून ऐकल्यावर त्यांच्या अंगाची लाहीलाही झाली आणि त्यांनी रागारागाने त्या पुजाऱ्यांना उत्तर दिले की तुम्ही पुजारी स्वतःला काय समजता आहात ? त्या सर्वांवर परमेश्वराची कृपा आहे म्हणून ते काहीही न बोलता निघून गेले. तुम्ही पुजारी इतके नीच आहात की, जर कोणी दान दिले नाही तर तुम्ही त्यांना देवाचे दर्शनही घेऊ देत नाही. हे सर्व केशव चिचघरेनी ऐकल्यावर त्यांनी बाबांना सांगितले तेव्हा बाबा म्हणाले की, ही सर्व मूर्ख लोकांची सत्ता परमेश्वराला मान्य नाही आणि ती लवकरच बदलेल. याकरिताच या मार्गाची उत्पत्ती आहे. बाबा व्दारकेला आराम करण्याकरिता एका ठिकाणी थांबले. तेथे काही कारणास्तव सेवकांचे जेवणाच्या कॉन्ट्रॅक्टरशी खूप भांडण झाले. तेव्हा बाबांनी सर्व सेवकांना आवरले. त्या कॉन्ट्रॅक्टरचे खूप आर्थिक नुकसान झाले ३० नोव्हेंबरला द्वारकेवरून पोरबंदर येथे सर्व पोहचले.

तेथे भारत मंदिर, दवाखाना आणि गांधीजींचे घर सर्वांनी पाहिले. तेथून सर्वजण सोमनाथला पोहचले. तेथे सोमनाथचे ऐतिहासिक मंदिर पाहून समुद्रकिनाऱ्यावरील सृष्टी- सौंदर्य पाहिले. त्यानंतर तेथे रात्रीला मुक्काम करून १ डिसेंबर रोजी जुनागड येथे सर्वजण आले. जुनागडचा किल्ला, ९,९९९ पायऱ्या असलेले गडावरील देवस्थान पाहिले.  तेथून वीरपूरला जाऊन "जलाराम बापूचे" मंदिर पाहिले. हे मंदिर पाहिल्यानंतर बाबांच्या मनात असे विचार आले की, आपणही कुठेतरी चांगलीशी जागा मिळवून अशाच प्रकारचे "मानव-मंदिरा"  चे भवन आपल्या मंडळातर्फे बांधावे. त्या ठिकाणी आपल्या सेवकांना सुख, शांती आणि समाधान मिळेल. त्याप्रमाणे येथूनच प्रेरणा घेऊन बाबांनी नागपूर येथे मानव मंदिर उभारले आहे.

विरपूरवरून गोंडलला गेल्यावर योगी महाराजांचे मंदिर पाहिले. २ डिसेंबरला गोंडलवरून आकोट होत सांरगपूरला गेले. तेथे लक्ष्मीनारायणचे मंदिर व हनुमान मंदीराची कलाकृती सर्वांनी पाहिली. तेथून ३ डिसेंबरला पुन्हा अहमदाबाद येथे परत आले. वरील सर्व ठिकाणी सर्व सेवक मंदिरात फिरलेत परंतु बाबांच्या आदेशानुसार कोणत्याही सेवकाने, कोणत्याही मंदिरात, कोणत्याही मूर्तीला नमस्कार केला नाही. 

३ डिसेंबरला जुना बापूनगर, अहमदाबाद येथे रात्री ८ वाजता मानवी अनुभवावर भजनकार्य आणि मानव जागृतीवर बाबांचे मार्गदर्शन झाले. तेव्हा बाबा आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, मंदिरात कोणत्याही मूर्तीला नमस्कार कोणीही केला नाही. कारण बाबा सजीवामध्ये परमेश्वरी रूप पाहतात. निर्जीवामध्ये परमेश्वर वास करीत नाही. मूर्ती ही निर्जीव वस्तू आहे. म्हणून बाबांचे सेवक कोणत्याही मूर्तीला नमस्कार करीत नाहीत. ते रूप सजीवांमध्येच पाहतात म्हणून त्यांना आत्मप्रचीती, आत्मानुभव आणि आत्मज्ञानाची प्राप्ती होते. त्यामुळेच सेवकांची आत्मशक्ती वाढते. भावनेचा नाश होतो आणि मानव हा अनुभवाचे तज्ञ होतो. तो भगवंताला समोर ठेवून आत्मसाक्षात्कारांनी आपले भविष्य बनवून उज्ज्वल करतो.

दिनांक ४ डिसेंबर रोजी नवा बापूनगर, अहमदाबाद येथे रात्री ८ वाजता मानवी अनुभवात्मक चर्चाबैठक, भजनकार्य, सेवकांचे अनुभव आणि मार्गदर्शन होऊन दि . ५ डिसेंबरला अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसने नागपूरला प्रस्थान होऊन ६ डिसेंबर १९८२ ला सकाळी ७ वाजता नागपूरला आगमन झाले 

या सौराष्ट्र दौऱ्यात जे जे घडले त्याला सर्व परमेश्वरी कृपा कारणीभूत आहे आणि तिनेच ही परिस्थती उत्पन्न करून तिला पूर्णपणे सांभाळले आहे. त्याचे कारण मानव हा कर्मकर्ता असल्यामुळे त्याच्या हातून चुका होणे स्वाभाविक आहे आणि तो चुकला की त्याचे परिणाम चुकी एवढेच होतात. हे परमेश्वराने मानवाला शिकविले आहे. वरील सर्व घटनेवरून हे सिध्द होते की, बाबा बरोबर भगवंत नेहमी वास करतो. त्यामुळे त्यांचेपुढे सेवकांवर कितीही अडचणी किंवा समस्या निर्माण झाल्यात तरी त्या चुटकी सारख्या सहजतेने सुटतात.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जिवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Tuesday, 19 May 2020

【"मांत्रिकाच्या त्रासाने त्रस्त झालो', 'शेवटच्या क्षणी परमात्मा एक मार्गी आलो"】



                              【"माझा अनुभव"】
अनुभव क्रमांक: (१९१) प्रकाशित दिनांक: ०१ डिसेंबर २०१६

【"मांत्रिकाच्या त्रासाने त्रस्त झालो', 'शेवटच्या क्षणी परमात्मा एक मार्गी आलो"】

माझे नाव प्रफुल दिलीपजी थोटे आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.

या मार्गात सर्वच सेवक दुःखी आलेले आहे. हा मार्ग सुखी लोकांनां दिसत नसतो, हे खरं आहे. त्याचप्रमाणे माझे कुटुंब दुःखा मुळेच या मार्गात आले. माझ्या कुटुंबावर दुःख असे होते की, कुटुंबात बाहेरचं लावलेलं होतं. माझ्या वडिलांना दारूचे व्यसन होते, त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती खूप खालावली होती. माझे वडील दारू पिण्याचा नादात, घरातील सर्व दागिने गहाण ठेवून दारू पीत असायचे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली होती.

माझ्या आईला मांत्रिकाचा त्रास होता. माझी आई रात्र भर झोपत नसायची. रात्रीचे १२ वाजले कि, माझी आहे घुमायची. तिला स्वप्नात एक माणूस, मला व माझ्या वडिलांना मारतांना दिसायचा. हे बघून माझी आई घाबरून व दचकून उठायची आणि रडायची.  ती म्हणायची कि, "तुम्ही माझ्यासमोर बसून राहा", माझ्या आईच्या स्वप्नातीलं माणूस आमच्या घरासमोर राहत होता. त्यामुळे माझी आई घाबरायची.

असे काही दिवस चालले. नंतर माझ्या वडिलांचे सुद्धा डोकं दुखायचे. रात्री १२ वाजले कि, माझे वडील घराबाहेर जायचे. हे बघून मी घाबरत होतो आणि मला रडायला येत होतं. मला वाटायचं मी काय करू? कोणाकडे जाऊ?

माझ्या आईची आई, म्हणजेच माझी आजी, माझ्या आईची भेट घेण्याकरिता आली. आजी मार्गातील सेविका होती (आई चा लग्नानंतर मार्गात प्रवेश). त्यामुळे माझ्या आजीने वडिलांना मार्गाबद्दल माहिती दिली. नंतर आम्ही सर्व जण झोपलो आणि आजी रात्री १२ च्या सुमारास झोपेत बोलत होती. नंतर सकाळच्या वेळेस, मी तिला विचारले की, "रात्री काय बडबडत होतीस", तर आजी म्हणाली की, "तो तुझ्या घरासमोरचा माणूस, मला म्हणत होता की, तू खूप शहाणी झालीस काय? त्यांना मार्ग घे म्हणत आहेस".

तर आजी म्हणाली की, "मी भगवंताचे नाव स्मरण केले, तेव्हा बाबा आले आणि तो लगेच पळाला"! हे सर्व माझ्या स्वप्नात झाले, म्हणून बडबडली असेल.

पुढे काही दिवस त्रासात लोटले आणि माझ्या आईची प्रकृती खूप जास्त खराब झालेली होती. काही दिवसातच पोळा होता, तेव्हा माझे वडील एका मांत्रिकाजवळ गेले. ते म्हणत होते की, "परमात्मा एक मार्ग घे, नाहीतर तुझी पत्नी मरून जाईल". माझे वडील घरी आले व घडलेलं सर्व सांगितलं. पुढे पोळा सण झाल्यावर माझ्या वडिलांचे मित्र, वडिलांना म्हणाले की, "तुला तुझ्या पत्नीची चिंता नाही आहे वाटते", तुला तिला असेच मारायचे आहे कि काय ? 

"त्यापेक्षा मार्गात ये, सर्व नीट होईल".

नंतर आम्ही माझ्या आईसोबत, मार्गदर्शक श्री. रमेशजी धनजोडे यांच्या घरी गेलो. तिथे मार्गदर्शकांनी मार्गाबद्दल सर्व माहिती दिली. सर्व जुने विचार व देवी-देवतांच्या फोटोचे विसर्जन करायला सांगितले आणि वडिलांना सांगितले की, "तुम्हाला यापुढे कधीही दारू पिता येणार नाही म्हणून, मन पक्के करावे". मला तिथेच परमेश्वरावर विश्वास बसला कारण, त्यांच्याकडे आम्ही आईला नेतांना, पकडून कसेबसे नेले. परंतु, मार्गाबद्दल सर्व माहिती दिल्यावर, आम्हाला ३ दिवसांचे साधे कार्य दिले आणि परत घरी येतांना आई स्वतः आमच्यासोबत चालत आली.

पुढे आम्हाला मार्गदर्शकांनी ७ दिवसांचे साधे कार्य दिले. आम्हाला खूप समाधान लाभले व कित्येक दिवसांचा चुकीचा काळ दूर झाला आणि परमेश्वराची जाणीव मिळाली. आम्हाला कार्यात समाधानी लाभली व आमच्या कुटुंबात आनंद दरवळू लागला.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागते.

नमस्कार.

सेवक : प्रफुल दिलीपजी थोटे
रा : आझाद चौक, कुही, जिल्हा: नागपूर
सेवक नंबर : २४२२६
मार्गदर्शक : श्री. रमेशजी धनजोडे
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ मंगेश संग्रामे:- 7057624579

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

प्रकरण क्रमांक (२४) "ईच्छा अनुसार भोजन"

       

                    "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
            'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२५) 
   
                            "ईच्छा अनुसार भोजन"

मोगरकशा तलावावर घडलेल्या प्रसंगातून सर्व सुखरुप मंगरली या गावी संध्याकाळी आल्यावर महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू झाली. बैठकीत उपस्थित असलेल्या सेवकांना हया मार्गावर ते तत्व, शब्द आणि नियम शिकविले आहेत तसेच या मार्गची उपासना केल्यावर त्यांना जे अनुभव आलेत त्यावर आपआपले विचार मांडले. त्यानतर बाबांचे मार्गदर्शन झाले. सर्व लोक आनंदी वातावरणात असल्यामुळे बैठक बरीच उशिरापर्यंत चालली. त्या वेळेस रात्रीचे बारा वाजले होते.

बैठक समाप्त झाल्यावर महानत्यागी बाबा जुमदेवजी त्या गावातील सेवकांना म्हणाले, आम्हाला आता नुसत्या दुधाचा चहा प्यावयास पाहिजे. या गावात आल्यापासून दोन दिवस झाले. पण दूधाचा चहा मिळाला नाही. तर आता पाहिजे अशी इच्छा प्रगट केली. सेवक हे ऐकून गोंधळला आणि बाबांना विनंती केली की, बाबा एवढ्या मध्यरात्रीच्या वेळेस या गावात दूध कोठून मिळणार? घरीपण दुध नाही. कारण माझ्या घरच्या म्हशी जगलात चरावयास गेल्या होत्या तेव्हा वासरुसुध्दा तिच्याबरोबर होते. त्या वासराने म्हशीचे संपूर्ण दुध पिऊन टाकले. म्हशी जेव्हा सायंकाळी जंगलातुन चरुन आल्यात तेव्हा मी दुध काढण्याकरिता गेलो असता म्हशीने एकही थेंब दूध दिले नाही. आता सांगा बाबा, मी दुधाचा चहा कसा पाजु? तेव्हा बाबा म्हणाले, मला माहित नाही की दूध कोठे मिळेल! तुम्ही दुध कोठुनही आणा आणि आम्हाला फक्त दुधाचा चहा पाजा. तो सेवक गवळी होता व साधारणतः ऐंशी वर्षाचा म्हातारा होता. तो बाबांना म्हणाला, बाबा या जंगलात जवळपास एकही गाव नाही आणि या गावात रात्री दूध मिळत नाही हा माझा आयुष्यभराचा अनुभव आहे. तेव्हा बाबा जुमदेवजी म्हणले, मला तुमचा अनुभव माहीत नाही. आणि त्याचे काही करावयाचेही नाही. आम्हाला दुधाचा चहा आताच पाहिजे. तेव्हा त्या सेवकाने बाबांना विनंती केली की, बाबा आपण मला मार्गदर्शन करा की मला दुध कोठून मिळेल?

महानत्यागी बाबा जुमदेवजी सर्वांना उद्देशुन म्हणाले, मी एका परमेश्वराची कृपा प्राप्त केलेली आहे. भगवंत दूध देईल. त्यानंतर त्या सेवकाला बाबा म्हणाले, ज्या म्हशीने एकही थेंब दूध दिले नाही त्याच म्हशीला समोर आणा आणि घरात जाऊन बाबा हनुमानजीच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती लावून कापूर लावा आणि विनंती करा की, बाबा हनुमानजी, महानत्यागी बाबा जुमदेवजींना दुधाचा चहा पाहिजे, तर बाबांकरिता दुध द्या. बाबांनी असे सांगितल्यावर त्या सेवकाने बाबांच्या आदेशाचे पालन केले आणि वर सांगितल्याप्रमाणे विनंती केली. त्यानंतर तो बाहेर आला. भगवंताचे नामस्मरण करुन त्याने म्हशीच्या पाठीवर जोरात थाप मारली आणि भांडे घेऊन तो म्हशीचे दूध काढू लागला. आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या म्हशीने दूध दिले नव्हते त्याच म्हशींचे दृध तो चर- चर करीत काढू लागला. त्या म्हशीने साधारणतः दोन लिटर दुध दिले. या मार्गातील सेवक नवरगावचे सरपंच श्री. वाघमारे हे त्या गवळ्याजवळ पाहावयास गेले असता त्याला दुधाने पूर्ण भरलेले भांडे दिसले. त्याने तो गंज आणून बाबांजवळ ठेवला तेव्हा सर्वजण ही भगवंताची लीला बघून अवाक झाले. त्यानंतर बाबा सेवकाला म्हणाले, या संपूर्ण दघाचा चहा बनवा. त्यात मुळीच पाणी टाकु नका आणि थेंबभर दुध शिल्लक ठेवू नका. त्याप्रमाणे त्या संपूर्ण दुधाचा चहा बनवुन तो सर्वांना दिला.

तो म्हातारा गवळी सेवक बाबांना म्हणाला की बाबा याच म्हशीप्रमाणे दुसरी म्हैस सुध्दा दुध देईल काय? त्यावर बाबांनी उत्तर दिले तुम्ही तुमचा अनुभव घेऊन पाहा. तुम्ही एकाच भगवंताचे मनापासून सेवक आहात आणि दिलेल्या तत्व, शब्द, नियमाने वागत असाल तर परमेश्वर नक्कीच यश देईल. परमेश्वर देतो पण मानवाचा परमेश्वरावर विश्वास नाही.

म्हणून बाबांनी तत्वात सांगितले आहे की, "इच्छा अनुसार भोजन" म्हणजेच मानवाने कोणतीही इच्छा परमेश्वराजवळ प्रगट केली तर तो, ती पूर्ण करतो. पण त्याकरिता एक लक्ष, एक चित्त, एक भगवान मानून सत्यकर्म करावयास हवे.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जिवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.



Monday, 18 May 2020

【"भगवंतावरील अतूट विश्वास, करी सर्व रोगांचा नाश"】


                            【"माझा अनुभव"】
अनुभव क्रमांक: (१९०) प्रकाशित दिनांक: ३० नोव्हेंबर २०१६

     【"भगवंतावरील अतूट विश्वास, करी सर्व रोगांचा नाश"】

माझे नाव 'रविंद्र खुशालरावजी पराते' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझ्या दैनंदिन जीवनात आलेला चौथा अनुभव सादर करीत आहे.

नागपूर ते भंडारा रोडवरील महालगांव या ठिकाणी डॉक्टर श्री. लखुजी साबळे हे पशुवैद्यकीय अधिकारी राहतात. ते मला व माझ्या हाताखाली असलेल्या मुलाला जवळपास सहा ते सात महिने पासुन औषधीचे ऑर्डर देतो म्हणायचे, पण द्यायचे नाही. असेच सहा ते सात महिने निघून गेले. तर मी एक दिवस अचानक त्यांना फोन केला तर ते मला म्हणाले की, "पराते जी मुझे आपसे कोई बात नही करनी", आणि फोन ठेवून दिला!

 मी एकदम शांत झालो आणि विचारात पडलो की, माझी अशी कोणती चुक झाली? हे साहेब असे नाराज झाले. परमेश्वराला मी तेव्हाच प्रणाम केला व म्हटले, "बाबा माझ्या चुकीची मला क्षमा करा". तो दिवस तसाच गेला. तेव्हा माझे कार्य सुरू होते आणि आम्ही सर्व सकाळी उठून भगवंताच्या समोर विनंती ला बसलो व बाबांसमोर शब्द ठेवले की, बाबा डॉक्टरांना सद्बुद्धी द्या, त्यांनी ऑर्डर पण दिला पाहिजे व ते भेटले पण पाहीजे आणि पहा सेवकांनो बाबाची कृपा, दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही फोन न करता त्यांच्याकडे गेलो व त्यांची जाण्याची व आमची पोहोचण्याची वेळ ही एक झाली. बघा सेवकांनो भगवतांनी माझी हाक ऐकली. मग आम्ही आतमध्ये बसलो. सर्व नीट पार पडले व जायच्या वेळी डॉक्टर स्वतः म्हणाले की, "परातेजी ऑर्डर तो लिखो" तेव्हा मी एकदम खुश झालो आणि मला साहेबांनी छान अशी औषधींची ऑर्डर दिली.

तेव्हा मी सर्वप्रथम भगवंताचे आभार मानले आणि माझा तो दिवस आनंदात गेला. डॉक्टर साहेब पण तेव्हा पासून नेहमी ऑर्डर देत असतात.  

एक अनुभव आणखी सांगु इच्छितो, माझा मुलगा प्रसाद रविन्द्र पराते. याचे जन्मतःच वजन हे १.४ किलोग्राम होते. वजन वाढविण्यासाठी डॉक्टरांनी जे जे सांगितले ते सर्व आम्ही केले पण वजन काही वाढेलच नाही. सर्व औषधोपचार झाला, चेकअप झाले पण फरक काही पडेना. एक गोष्ट नंतर लक्षात आली ती म्हणजे, माझ्या पहील्या बाळाला जो आजार (CMV) होता. तर मी त्या विषयावर डॉक्टर सोबत चर्चा केली तर ते म्हणाले की, त्या (CMV) आजाराचे प्रतिजैविके त्याच्या आईच्या शरीरात आहे, त्यामुळे त्याला याची भिती नाही. पण माझे मन काही मानेना. तर मी डॉक्टरांना विनंती केली आणि ती (CMV) टेस्ट करायला लावली आणि ती पॉझिटिव्ह आली. 

नंतर डॉक्टरांनी त्या आजाराचा उपचार सुरू केला. जवळपास तो उपचार १ ते दोन महीने चालला. नंतर डॉक्टरांनी सांगितले की, आता हा सुरक्षित आहे. कसलीही भिती नाही. वजन हळूहळू वाढेल. परंतु माझे सासरे म्हणाले, जावई तुम्ही याला चांगल्या डॉक्टरकडे दाखवा. तर मी सर्वप्रथम माझे मार्गदर्शक श्री. विष्णुजी ठवकर मु. बिडगणेशपूर यांची भेट घेतली व त्यांना सर्व हकीकत सांगितली. तेव्हा मार्गदर्शक काकाजींच्या तोंडातून शब्द बाहेर पडले की, त्याला आता काहीही होणार नाही. कोणत्याही डॉक्टर कडे न्यायची गरज पडणार नाही. पण माझे सासरे काही ऐकत नव्हते. तर एक दिवस मी म्हणालो चला तुमची इच्छा पुर्ण करून घेऊ तुम्ही सांगाल त्या डॉक्टर कडे जाऊ. 

तर ते म्हणाले ठिक आहे आणि आम्ही नागपूर रामदासपेठ येथे बाळाचे तज्ञ डॉक्टर साल्पेकर कडे नेले. जेव्हा डॉक्टरांनी बाळाला चेक केले तेव्हा ते म्हणाले, हा एकदम मस्त आहे. याला कुठलाही त्रास नाही. वजन खाण्यापिण्याणे वाढेल. तर, अशाप्रकारे भगवंत नेहमी माझ्या शब्दावर उभे राहिले. माझ्या कुटुंबात आनंद बहरला.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" ला क्षमा मागते.

नमस्कार..!

सेवक: रविन्द्र खुशालरावजी पराते
रा: पुलगाव, जिल्हा: वर्धा 
सेवक नंबर: ४२४००
मार्गदर्शक: श्री. विष्णूजी ठवकर 
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ मंगेश संग्रामे:- 7057624579

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.


प्रकरण क्रमांक: (२३) "मोगरकसा तलाव"


                       "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
          'सुधारित पाचवी आवृत्ती'  प्रकरण क्रमांक (२३) 
                                  "मोगरकसा तलाव"

सत्ययुगातील गोष्टी आपण इतिहासात वाचतो. रामायणात असा उल्लेख आहे की, जेव्हा श्रीराम चौदा वर्षे वनवासाला गेले होते, तेव्हा भरताने श्रीरामाच्या पादुका राजसिंहासनावर ठेवून त्यांच्या नावाने राज्यकारभार सुरळीत चालविला होता. हेतू हा की, श्रीराम हा सत्य आचरण करणारा मर्यादा पुरूषोत्तम होता. तीच लक्षणे त्यांच्या पादुकांत होती. त्यामुळेच राज्यकारभार सुरळीत चालला. परंतु या कलियुगात सुद्धा पादुकांना तेवढेच महत्व आहे, महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या रूपात बाबा जुमदेवजी हे मोंगरकशा तलाव येथे गेले असतानाची ही घटना आहे. एक जोडनाव जी पाण्याने संपूर्ण भरून सुद्धा तलावात न डुबता तरंगत होती आणि त्यात असलेला सेवक जीवंत राहिला. हा एक परमेश्वराचा साक्षात्कार आहे.

       १९७८ सालातील एप्रिल महिन्याची गोष्ट महान त्यागी बाबा जुमदेवजींनी परमेश्वराबद्दल मानवाला जागविण्याकरिता नेहमीप्रमाणे सात सेवक घेऊन रामटेक तालुक्यातील काही गावांत दौरा काढला. १/४/१९७८ ला महानत्यागी बाबा जुमदेवजी नागपूरच्या आपल्या सेवकांसोबत नागपूर रामटेकवरून भंडारबोडी येथील परमात्मा एक सेवक दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेत पोहचले. तेथे बाबांचे भगवतकार्यावर मार्गदर्शन झाले. दुसऱ्या दिवशी दोन एप्रिलला बाबांनी सेवकांना, पाच बैलगाड्या बरोबर घेऊन कांद्री येथे दौरा केला. तेथे भगवतकार्याची चर्चा बैठक आणि बाबांचे मार्गदर्शन होऊन मुक्काम केला. तीन एप्रिलला पंचाळा येथे दौरा होऊन चार एप्रिलला मंगरली या गावात दौरा केला. या गावाच्या दौऱ्यात नागपूरसह लोहारा, कांद्री, सिवनी, भंडराबोडी, सालईमेटा, पंचाळा, मांडवी या गावांतील बरेच सेवक होते. मंगरली हे गाव घनदाट जंगलाच्या मध्यभागी वसलेले १५-२० घरांचे छोटेसे गाव आहे. या गावात या मार्गात आलेले दोन सेवक राहत होते. त्यांपैकी एक सेवक बाहेरगावी लग्नाला गेला होता म्हणून बाबांचा मुक्काम दुसऱ्या सेवकाकडे झाला. ज्या सेवकाकडे बाबा थांबले होते त्या ठिकाणी त्या सेवकाचा मामा पण थांबला होता तो म्हातारा होता. त्याला पंधरा दिवसांपासून सारखा ताप येत होता. या गावात भगवत कार्याची चर्चा बैठक होऊन बाबांनी मानवजागृतीवर सेवकांना मार्गदर्शन केले.

           चर्चाबैठकीच्या अगोदर तेथे या दौऱ्यात ज्या बायामंडळी आल्या होत्या त्यांनी संपूर्ण स्वयंपाक केला होता. चर्चाबैठक संपल्यावर भोजनाची तयारी झाली. सर्व सेवक आणि बाबा भोजनास बसले. सोबत आलेल्या बायांनी पंगती वाढल्यात. तो म्हातारा बाबांकडे आला आणि त्याने त्यांना नमस्कार केला. त्या पंगतीतच तो बाबांच्या आदेशानुसार जेवायला बसला. जेवण झाल्यावर तो बाबांजवळ पुन्हा आला आणि बाबांना नम्रपणे म्हणाला की, बाबा आपण धन्य आहात. मला पंधरा दिवसांपासून खूप ताप होता. त्यामुळे मी जेवलो नव्हतो. पण आपल्या आगमनाने आणि मार्गदर्शनाने माझा ताप नाहीसा झाला आणि आज मी पोटभर जेवलो. हा किती मोठा चमत्कार आहे की, बाबांच्या आगमनाने आणि मार्गदर्शनाने सेवकांनाच नव्हे तर इतरांना सुद्धा परमेश्वरी कृपेचा लाभ मिळतो आणि त्यांचे दुःख नाहीसे होते.

              जो सेवक बाहेरगावी लग्नाला गेला होता त्याचे नाव होते शेरकी. तो रात्री लग्नावरून परत आला. त्या रात्रीला मंगरली या गावातच मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच एप्रिलला शेरकी नावाच्या सेवकाने बाबा जुमदेवजींना विनंती केली की, बाबा येथून दहा मैलांवर मोंगरकशा नावाचा एक ऐतिहासिक तलाव आहे. त्याच्या चारही बाजूनी घनदाट जंगल आहे. फार सुंदर दृश्य आहे. आपण तेथे सर्वजण वनभोजनास चलावे. त्यावर बाबांनी संमती दिली. साधारणतः माणसे व बाया मिळून साठ सेवक हजर होते. सर्वांनी चहापाणी, नास्ता घेतला आणि सर्वजण वनभोजनास जाण्याची तयारी करू लागले. सामान घेऊन जाण्याकरिता बैलबंडिची आवश्यकता होती. तेव्हा सेवकाचा म्हातारा मामा म्हणाला, एक बंडी आहे. त्याचे बैल म्हातारे आहेत. त्यांतील एक बैल असा आहे की, तो मोंगरकशा तलाव संपल्यावर खाली बसला तर उठतच नाही . त्याच्या अंगावरून ट्रक गेला तरी तो उठत नाही. हे शब्द बाबांनी ऐकले . तेव्हा बाबा म्हणाले , बंडीला त्या बैलालाच जुपा काय होईल ते परमेश्वर करील आणि लवकर वनभोजनास चला. सर्व सेवक तयार झाले सामानाकरिता एक बैलबंडी आणि सेवकांकरिता खाचर तयार केले ज्या बंडीत जास्त साहीत्य होते , तेथे पाच-सहा सेवक बसले होते आणि त्याच बंडीला तो बैल जुंपला होता. ती बंडी नागपूरचा एक सेवक श्री. जगन्नाथजी सोनकुसरे चालवत होता. तो म्हातारा पण बाबांबरोबर वनभोजनास आला. जाताना तो समोरच्या खचरामध्ये बसला होता आणि बंडी मागे होती. त्याला सारखी भीती वाटत होती की , बैल चालता चालता खाली बसतो काय ? म्हणून तो सारखा मागे वळून पाहत होता. परंतु त्याला तो बैल चालताना दिसत होता . किंबहुना तो बैल त्याच्या जोडीला बैलाचे मानाने धावत होता. संपुर्ण प्रवासात तो बैल एकदाही खाली बसला नाही. त्यामुळे या बसक्या बैलाचे त्या म्हाताऱ्याला आश्चर्यच वाटत होते. बाबा आणि सर्व सेवक मोंगरकशा तलावापाशी पोहचले. हा तलाव भंडारा जिल्ह्यात आहे. चांगलीशी जागा पाहून झाडाच्या सावलीत सर्व सामान उतरविले. तेथे स्वयंपाकाकरिता काळया दगडांची जमवाजमव केली. चूल तयार केली. दौऱ्यावर आलेल्या काही बाया मंडळी तलावावरून अंघोळ करून आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करू लागल्या. बायांना बाबांनी सांगितले की तुम्ही या बाजूला आंघोळ करून या ती पूर्व दिशा होती. आणि पुरूष मंडळी तो डोंगा दिसतो तेथे म्हणजे त्या दिशेच्या विरूध्द दिशेला, पश्चिमेला आंघोळ करायला जातील मुक्काम दक्षिण दिशेला होता. स्वयंपाकाला सुरूवात झाल्यावर बाबा सर्व सेवकांना (पुरूष) म्हणाले की , चारपाच सेवक येथे थांबा आणि बाकीचे सर्व आंघोळ करायला चला. त्याचप्रमाणे सर्व सेवक बाबांसोबत डोंगा असलेल्या बाजूला, पश्चिमेला आंघोळ करायला निघाले तेथे पोहचल्यावर काही सेवकांना पोहणे माहीत असल्यामुळे त्यांनी पोहण्यासाठी बाबांची परवानगी मिळण्यासाठी त्यांना विनंती केली तेव्हा तेथे वनखात्याचा चौकीदार होता. त्याने त्यांना पोहायला  जाऊ नये यासाठी विनंती केली. कारण तलावात सुरूवातीलाच दोन हत्ती, पुढे तीन हत्ती आणि मध्यभागी चार हत्ती पाणी आहे संपूर्ण तलावात खूप जाळे आहे त्यामुळे येथे कोणीही कोळी मासोळी पकडायला आत जात नाही, कारण जाळ्यात पाय अडकले तरी तो वर येत नाही आणि बुडून त्याचा अंत होतो, असे तो म्हणाला. त्यावर बाबांनी काठाजवळ पोहायला परवानगी दिली. त्यानंतर सेवक लोक पोहू लागले. बाजूलाच एक जोडनाव होती. तेव्हा एका सेवकाने ती जोडानांव पाण्यात नेण्याकरिता विनंती केली. तेव्हा बाबा म्हणाले, जर नाव चालवता येत असेल तरच घेऊन जा. त्याप्रमाणे ती नाव बाबांच्या परवानगीने तिची दोरी सोडून आत नेण्यात आली. त्यांत पाच-सहा सेवक होते त्यावेळेस बाबा किनाऱ्यावर बसूनच आंघोळ करणार होते. म्हणून ते सेवकांना म्हणाले की, मी नावेत येत नाही. नाव थोडी दूर पाण्यात गेल्यावर ज्या सेवकांना पोहता येत होते त्यांनी पटापट नावेतून पाण्यात उड्या मारल्या. त्यानंतर तेथे श्री. मोतीरामजी हरडे (दिवानजी) नावाचे एकच सेवक उरले होते. कारण त्यांना पोहता येत नव्हते. दिवानजीला वाटले की, आपण आता नाव चालवू ते नावेच्या डाव्या भागाला उभे होते. म्हणून त्यांनी वल्हे उचलले आणि त्यांच्या उजव्या भागाला ते वल्हे पाण्यात टाकले. वल्हे पाण्यात घेतल्यामुळे आणि त्याला खालच्या बाजूला आधार न मिळाल्यामुळे दिवानजी उजव्या नावेत पडले हे दृश्य बाबा आंघोळ करता करता पाहत होते तेव्हा बाबा म्हणाले दिवानजी तुम्हाला नाव चालवता येत नाही तर नावेत कशाला गेलात बाबांना वाटले हे पाण्यात बुडतील म्हणून त्यांनी गडीरामजी डोनारकर या सेवकाला विचारले की , तुला पोहता येते काय ? त्याने होकार दिल्याबरोबर बाबांनी त्याला आदेश दिला की, तुम्ही पोहत जा आणि त्या नावेची दोरी ओढून किनाऱ्यावर आणा आणि बांधून ठेवा. त्याप्रमाणे त्यांनी ती नाव आणून किनाऱ्यावर बांधून ठेवली. बाबांची आंघोळ आटोपल्यावर बाबा सर्व सेवकांना म्हणाले की, तुम्ही सर्वजण लवकर आंघोळ करून भोजनास या तोपर्यंत मी मुक्कामाच्या ठिकाणी जातो आहे. त्याप्रमाणे बाबा जायला निघाले. त्यावेळेस ते पायात पादुका घालावयास विसरले होते त्या तलावाच्या काठावरच राहिल्या होत्या .

बाबा तेथून गेल्यामुळे काही सेवकांनी बांधून ठेवलेल्या नावेची दोरी सोडली. काही सेवक नावेत बसून कपडे धुऊ लागले. लोहारा या गावचा सेवक श्री. शामरावजी कार याने त्या नावेला जोराने लाथ मारली. त्यामुळे ती नाव खोल पाण्यात गेली आणि उकडे कारचा पाय चिरला गेला. श्री. श्रीराम भंडारबोडीवाला हे पुन्हा पोहत पोहत त्या नावेपर्यंत गेले आणि नावेला पकडून ते नावेत चढतांना ती नाव एका बाजुला वाकली. त्याबरोबर नावेत असणारे लोक पाण्यात भडाभड पडले. नाव जेव्हा सरळ झाली तेव्हा त्या जोडानावेत संपूर्ण पाणी भरले होते. काठावर असलेले १५-२० सेवक जोराने ओरडू लागले की नाव पाण्यात बुडाली, हा आवाज स्वयंपाक करणाऱ्या  बायांपर्यंत पोहचला. तेथे धर्मपुरी या गावची सौ. चंद्रभागाबाई ही सेविका होती. ती जोराने म्हणाली, बाबा असतांना नाव बुडू शकत नाही. त्या बाईला बाबांच्या कृपेबद्दल किती आत्मविश्वास होता हे दिसून येते. बाबा तेव्हा तीनचारशे पावले चालत आले होते. त्यांच्याही कानावर ओरडण्याचा आवाज आला. त्याचक्षणी त्यांच्या पायाला खडे रूतू लागले. तेव्हा बाबांच्या लक्षात आले की, आपण पायात पादुका घातल्या नाहीत, आणि त्या आपण तलावाच्या काठावरच विसरलो आहोत. बाबांनी मनात विचार केला की भगवंता, काय केले या सेवकांनी ? बाबांच्या शब्दांवर अंमल न केल्यामुळे या सेवकांवर हा प्रसंग ओढवला होता. परंतु बाबांच्या ऐवजी त्यांच्या पादुका तेथे असल्यामुळे त्यावर मात झाली होती.

     बाबा पादुका घालण्याकरिता परत तलावाच्या काठावर आले आणि तलावावरील दृश्य त्यांनी पाहिले तेव्हा नागपूरचे सेवक श्री. लक्ष्मणरावजी उराडे हे एकटेच त्या जोडनावेत दोन भागात पाय देऊन उभे आहेत संपूर्ण नाव पाण्याने भरलेली आहे तरी ती पाण्यात तरंगत आहे असे दिसले. बाबांच्या बाजूला काही सेवक उभे होते. त्यांना म्हणाले, हे तुम्ही काय केले ? तुम्हा सेवकांना बाबा सांगूनही तुम्ही बाबांचे ऐकत नाही आणि असे प्रसंग तुम्ही बाबांना दाखवता. तेव्हा त्या सेवकांनी बाबांना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर बाबांना संपूर्ण चौकशी केली , किती सेवक नावेत होते ? किती सेवक पोहून बाहेर निघाले? आणि किती आत बुडाले ? चौकशी अंती त्यांना कळले की सर्वजण बाहेर निघाले, पण गोपीचंद तुपट या सेवकाला पोहता येत नव्हते. म्हणून तो आतच आहे. त्याला काढण्याकरिता संपत शेरकी पाण्यात गेला. संपत शेरकीने गोपीचंदला काठावर आणले. बाबांच्या बाजूला मादरी या गावाचा कचरू नावाचा सेवक उभा होता. त्याला बाबांनी विचारले, "तुला पोहता येते काय?" त्याने होय म्हटल्याबरोबर त्याला बाबांनी आदेश दिला की, पाण्याने भरलेल्या नावेची दोरी धरून काठावर आण. त्याप्रमाणे बाबांच्या आदेशाचे पालन करून त्याने त्या नावेला पोहत जाऊन काठावर आणले. त्याबरोबर श्री. उराडे हेही काठावर आले. सर्वजण बाहेर निघाल्यावर बाबांनी त्यांना विचारले की, हे कसे काय घडले? त्यावर त्यांनी खालील माहिती सविस्तरपणे सांगितली. 

         प्रथम उराडे साहेब म्हणाले, नावेने कलाटणी घेतल्याबरोबर मी नावेला घट्ट धरून ठेवले. नावेत संपूर्ण पाणी भरल्यावर ती सरळ झाली आणि मी उभा झालो. विचार केला की, मला पोहता येत नाही म्हणून उडी मारू शकत नाही. नावेत संपूर्ण पाणी भरल्यामुळे ती नाव बुडणार म्हणजे दोन्ही क्रियांत मी मरणारच आहे. जीवंत राहू शकत नाही. तेव्हा मी भगवंताला प्रार्थना केली आणि म्हटले, "मरे या जिये भगवत नामपर! बाबा हनुमानजी आप मुझे मारो, या तारो मैं आपके शरणमें हुँ। अशी याचना करीत होतो. “देव तरी त्याला कोण मारी" या म्हणीप्रमाणे खरोखरच भगवंताने श्री. उराडे यांना जीवदान दिले. नाव संपूर्ण पाण्याने भरून सुध्दा बुडाली नाही. ती पाण्यात तरंगत राहिली. म्हणजेच भगवंताने त्या नावेला खालून टेका दिला होता हे सिध्द होते आणि हा किती मोठा साक्षात्कार आहे की नावेत पाणी भरून सुध्दा ती बुडाली नाही. धन्य आहे तू भगवंता! नाव काठावर आणली असता बादलीने त्या नावेतून पाणी काढले आणि दोरीने ती काठावर बांधून ठेवली. 

         दुसऱ्या घटनेत श्री. संपत शेरकी सांगतात की, गोपीचंद ज्या भागातील पाण्यात पडला होता त्याच भागात तो पण पडला आणि त्याला वर आणण्याचे प्रयत्न केले. परंतु गोपीचंदने संपतला पाण्यातच एकदम मिठी मारली. त्यामुळे त्याच्या पोहण्यात अडथळा निर्माण झाला आणि त्याला हात फेकणे अशक्य झाले.  तेव्हा त्याच्या मनात आले की, मी आता बुडणार आणि हाही बुडणार म्हणून संपतने भगवंताला प्रार्थना केली, भगवान बाबा हनुमानजी आपण मला या प्रसंगातून वाचवा. मी आता मरतो आहे तेव्हा परमेश्वराने त्याच्यावरही कृपा केली. त्याने भगवंताला विनंती केल्याबरोबर गोपीचंदचा हात सुटला. लगेचच त्याने आपले दोन्ही हात पाण्यात मारले व तो वर आला. हात पाण्यावर मारल्याबरोबर संपतच्या हातात गोपीचंदचे धोतर आले. तो धोतर धरून पोहत पोहत काठावर आला आणि त्याने गोपीचंदला आपल्याबरोबर ओढत काठावर आणले. अशाप्रकारे सर्वजण तलावाच्या बाहेर जीवंत सुखरूप निघाले. धन्य तो परमेश्वर !  त्या ठिकाणी बाबांच्या पादुकांच्या रूपात परमेश्वर उभा होता आणि त्याने या सर्व सेवकांची त्या वाईट प्रसंगातून मुक्तता केली. त्यानंतर सर्वांनी भगवान बाबा हनुमानजी की जय ! समर्थ बाबा जुमदेवजीकी जय ! परमात्मा एक ! सत्य, मर्यादा प्रेम कायम करनेवाले, अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले मानव धर्म की जय ! असा हर्षकल्लोळात जयघोष केला. 

          वनखात्याच्या चौकीदार हाही त्या वेळेस तेथे हजर होता. तो म्हणाला, या तलावात जो उडी मारतो तो वर येत नाही. तो मरतोच पण तुम्ही सर्वजण सहीसलामत कसे वर आलात ? हे तुमचे गुरू तुमच्याबरोबर असल्यामुळेच त्यांचाच महिमा आहे. येथे कोळी मासोळी धरत नाहीत. ते घाबरतात पण तुमची हिंमत आणि तुमच्या गुरूने दिलेली परवानगी यामुळे खरोखरच भगवंत तुमच्याजवळ आहे हे सिध्द होते. 

          त्यानंतर सर्वजण भोजनाच्या ठिकाणी आले. सर्वांनी भरपूर भोजन केले. सर्वांच्या आनंदाला पारावर नव्हता. सर्वजण बाबांना म्हणाले "बाबा आज या प्रसंगातून वाचलो नसतो तर काय झाले असते? केवढा मोठा प्रसंग ओढवला होता आणि सर्व सेवक बाबांसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर त्या सर्वांनी बाबांना शब्द दिला की , हा प्रसंग बाबांचे न ऐकल्यामुळे, त्यांच्या शब्दाचा अनादर केल्यामुळे ओढवला. यापुढे बाबांचे शब्द नेहमी अंमलात आणू असे सत्य वचन त्या सर्वांनी दिल. बाबांनी त्या सर्वांना क्षमा केली. जेवण आटोपल्यावर सामानाची आवरा-आवर करून मंगरली या गावात सायंकाळी सर्व सेवक सुखरूपपणे परत आले वरील प्रसंगावरून हे सिध्द होते की , बाबांच्या रूपात परमेश्वर नेहमी सर्वत्र असतो. सर्व सेवकांनी त्यांच्या शब्दांचा आदर करायला पाहिजे. परमेश्वर बाबांच्या पादुकाच्या रूपातही हजर असतो. बाबा परमेश्वराचे रूप आहे हे "बसका बैलं" म्हणजे जनावराने देखील ओळखले.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जीवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

【"व्यसनाचा नाद सुटता नाते जुडले परमेश्वराशी, पण अज्ञानी शब्दप्रयोगाने परत मुके समाधानाशी"】


                                 【माझा अनुभव】
अनुभव क्रमांक: १८३ प्रकाशित दिनांक: २३ नोव्हेंबर २०१६

【"व्यसनाचा नाद सुटता नाते जुडले परमेश्वराशी, पण अज्ञानी शब्दप्रयोगाने परत मुके समाधानाशी"】

माझे नाव 'तेजस्विनी विकासजी उराडे' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.

आमचे मार्गात येण्याचे कारण हे की, माझे बाबा खुप व्यसनी होते. दारू, सट्टा, लॉटरी, यांचे त्यांना खुप व्यसन होते. ते फारसे जास्त वेळ घरी राहत नव्हते. ऑफिसला जायच्या नावाने निघायचे आणि कुठे पण जायचे. घरची परिस्थिती खुप खराब होती. त्यांना घरी काय असते-नसते त्याची काहीच जाणीव (चिंता) नसायची. ते खुप जास्त दारू प्यायचे. 

त्यांनी लोकांकडून पैसे घेऊन कर्ज करुन ठेवलेले होते. नोकरीवर पण नव्हते त्यामुळे पगार मिळत नव्हता. यामुळे घरची परिस्थिती खुप खराब होती. बाबा दारू पिऊन यायचे आणि आईला-ताईला आणि आम्हाला खुप मारायचे. बाबाचे दोन्ही यकृत खराब झाले होते. बाबांना डॉक्टरने सांगितले होते की, फोटो मोठी करुण घ्या हार घालण्यासाठी (म्हणजे मरण्याच्या वाटेवर लागने), तरीही ते काही सुधरले नाही. रोज दारू पिऊन येणे आणि मारझोड करणे, शिव्या-गाळी करने हाच नेहमी प्रकार चालायचा.

माझी आत्या मौदा येथे राहत होती. त्या बाबांना नेहमी म्हणायच्या की, अगरबत्तीची पूजा असते तो मार्ग (परमात्मा एक मानव धर्म)घेत का नाही? तर बाबा सर्वांना म्हणायचे की, मी खुप अगरबत्त्या आणि खुप मेनबत्त्या लावल्या, पण माझी दारू कधीच नाही सुटनार.

त्यानंतर आमच्या घराजवळून काही अंतरावर एक सेवक काकाजी राहात होते. त्यांचे नाव घुले काकाजी असे आहे, ते मार्गात होते. त्यांनी आईला सांगितले होते. पण, बाबा आईचे ऐकत नव्हते. एक दिवस ते काकाजी बाबांना भेटले व त्यांना मार्गाबद्दल पुर्ण सविस्तर माहीती दिली, अनुभव सांगितले, तर बाबा तयार झाले की, ठीक आहे, जर चांगले होईल तर मी करणार.

त्यानंतर आम्ही आमच्या मार्गदर्शक काकाजीकड़े गेलो. त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा सांगितली. पण मार्ग देण्यास नकार दिला की, मी आता मार्ग देऊ शकत नाही. आमचे कार्य सुरु आहे. तेव्हा बारा वर्षातून येणारे त्यागाचे(शुद्धीकरण) कार्य सुरु होते. तर त्यांनी आम्हाला दहा ते बारा दिवस दिले. आम्ही घरी आलो नंतर बाबांनी पुन्हा तेच सुरु केले. 

त्यानंतर आम्ही दहा ते बारा दिवसांनी काकाजीकड़े गेलो, काकाजींनी आम्हाला तीन दिवसाचे कार्य दिले. आम्ही घरी आलो. माझ्या बाबांनी आम्हाला घरी सोडले आणि ते बाहेर गेले. आम्ही घरी गेलो तर आमच्या घराला पूर्ण इलेक्टरीक करंट होता. आम्ही बाबांना फोन केला आणि घरी बोलावले आणि घरा जवळचे सेवक त्यांना आणि काकाजींना कॉल केला. ते म्हणाले बाबाचे नाव स्मरण करा आणि घरी प्रवेश करा. आम्ही तसेच केले तर, करंट कुठे गेला कळलच नाही.

घुले काकाजी आम्हाला म्हणाले, मार्गात मरावं लागते "मरे या जिये भगवंत नामपर" या तत्वाप्रमाणे. आम्ही आमच्या घरचे पूर्ण देवांचे विसर्जन केले आणि काही काका, मामाकडे दिले. काकाजींनी सांगितले, सकाळी उठून आंघोळ करुण विनंती करावी लागणार. आम्ही बाबाला पाठ आणायला सांगितले आणि घरी साफसफाई सुरु केली. बाबा बाहेर गेले आणि दारूच्या दुकानाजवळ जाऊन बसले. पण काय माहिती काय झाले? आत जाण्याची त्यांची हिम्मत झाली नाही. पाठ घेवून घरी परत आले. त्या दिवसापासून आम्ही कधीच बाबाला दारू पिऊन असलेल्या व्यक्ति जवळ उभे सुद्धा पाहिले नाही. मार्गात आम्हाला खुप सुख समाधानी मिळाली.

त्यानंतर ६ जून, २०१४ ला माझे वडील परमेश्वरात विलीन झाले. आम्हाला आलेला अनुभव, ज्या चुकीमुळे आज माझे वडील आमच्यात नाहीत. शब्द रूपी परमेश्वर असतो, हे सत्य आहे. यावर आलेला अनुभव मी आपल्यासमोर सांगू इच्छिते. 

माझी ताई अभ्यासात खूप हुशार नव्हती. पण बाकी गोष्टी पण ती मन लावून करत होती. ताई अभ्यासात हुशार नसल्यामुळे घरच्यांनी तिचे लग्न करायचे ठरविले व बारावीत असतांना तिचे लग्न जुळले. तिचे लग्न पक्के झाले आणि लग्नाची २७ फेब्रुवारी तारीख ठरली. ताईची बारावीची परीक्षा २२ की २३ फेब्रुवारी पासून होती, तर ताई परिक्षेचे ओळखपत्र आणायला शाळेत जायला घाबरत होती. कारण तीला वाटत होते की, माझे सर आणि मॅडम मला रागावणार, इतक्या लवकर लग्न करत आहे म्हणणार. ती जास्त कोणासोबत बोलत नव्हती. जितके काम असेल तितकेच बोलायची. आम्हाला माहिती होते की, ताई भितीमुळे शाळेत जाणार नाही. तेव्हा माझे वडिल त्यांच्या मुखातून काही शब्द काढून खूप मोठ्या त्रासात गेले. 

त्यांनी ताईला म्हटले की, तु शाळेत जा आणि परिक्षेचे ओळखपत्र घेऊन ये. जर कोणी रागवले किंवा काही म्हटले तर त्यांना सांग की, माझ्या वडीलांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या  आहेत, म्हणून ते माझे लग्न करून देत आहेत. कळत-नकळत बाबा असे का बोलले माहिती नाही? माझ्या ताईचे लग्न व्यवस्थित पार पडले. त्यानंतर आई-बाबा, मी, ताई-भाऊजी फिरायला गेलो. फेब्रुवारी मध्ये त्यांचे लग्न झाले आणि आम्ही एप्रिलच्या शेवटी फिरायला गेलो. तिथे माझ्या बाबांची प्रकृती खराब झाली. नंतर उपचार वैगरे केल्यावर कळले की, बाबांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या आहेत. 

भगवंताने बाबांना व आम्हाला शिक्षा दिली की, जिभेला हाड नसल्यामुळे वाटेल ते बोलू नये. सेवकांनी खोटे बोलल्यावर भगवंत लगेच शिक्षा देतात. त्यानंतर आम्ही माफीचे कार्य केले आणि बाबांचे उपचार चालु ठेवले. अपेक्षा होती की, यश मिळेल पण यश मिळाले नाही. त्यांनी ५ वर्ष रक्तशुद्धीकरण केले आणि सहाव्या वर्षी ते परमेश्वरात विलीन झाले. 

त्यानंतर आम्ही कार्य केले आणि नंतर त्यागाचे कार्य केले व पक्के सेवक झालो. आता माझ्या भावाला माळ दिली आहे. आता सर्व ठीक आहे आणि माझे पण लग्न झाले. मी आता लग्नानंतर अनेकात आहे. आपल्या मार्गात शब्दाला खुप महत्त्व आहे. मला याचा अनुभव आला आहे, म्हणून सेवकांनो विनंती करते की, कधीही विचार करून मुखातून शब्द काढावे.  

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागते.

नमस्कार...!

सेविका :- तेजस्विनी विकासजी उराडे
पत्ता :- रा. परसोडी वाघमारे ले-आऊट, उमरेड

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Sunday, 17 May 2020

प्रकरण क्रमांक: २२ "आत्मप्रचिती"


                       "मानवधर्म परिचय पुस्तक"  (मराठी)
                'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२२) 
   
                                  "आत्मप्रचीती"

एके दिवशी महानत्यागी बाबा जुमदेवजी नेहमीप्रमाणे काही सेवकांना बरोबर घेऊन मानव जागृती विषयी मार्गदर्शन करण्याकरिता रामटेक तालुक्यातील भंडारबोडी या गावी दौऱ्यावर गेले होते. ते परमात्मा एक सेवक सहकारी दुग्ध उत्पादक संस्था, भंडारबोडी येथे निवासाला थांबले होते. ही संस्था बाबांच्याच मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली आहे. हे दौऱ्याचे दिवस भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षाचे होते. या कृष्णपक्षास पितृपक्ष असेही म्हणतात. हिंदु धर्मातील लोक या पितृपक्षामध्ये त्यांच्या कुटुंबात मरण पावलेल्या लोकांचे त्या तिथीला श्राध्द करतात. त्यामुळे या पक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. 

भगवतकार्याची चर्चाबैठक आटोपल्यावर बाबांनी त्या ठिकाणी मुक्कात केला. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आंघोळ वगैरे आटोपून त्या संस्थेच्या प्रांगणात एकटेच बसले होते. त्यावेळेस त्यांना एकाएकी आठवण झाली की , सध्या श्राध्दपक्ष सुरू आहे आणि आज त्यांच्या वडिलांचा मुक्तिदिवस आहे. तेव्हा ते स्वतःच मनाशी विचार करू लागले की, आजच्या तिथीला त्यांच्या वडिलांना देवाज्ञा होऊन या मृत्युलोकांतुन मुक्ती मिळाली होती. ते या पृथ्वीतलाला (जगाला) सोडून गेले होते. ते मनाशीच बोलले, जर मी स्वतःच्या घरी नागपूरला असतो तर वडिलांच्या नावावर दिवसभर उपवास केला असता आणि सायंकाळी भगवान बाबा हनुमानजीला नैवेद्य दाखवून एकदाच जेवण घेतले असते . पण आता तसे करणे शक्य नाही. या विचारात ते चिंतामग्न झाले आणि या विचारतच देहभान विसरले. ते नकारात आले. त्यांच्या अंतरात्म्यातून खालील संवाद बाहेर पडलेत ? जे त्यांनी त्यांच्याच कर्णाव्दारे ऐकले.

त्यांच्या अंतरात्म्यातून आवाज निघला की, "सेवक, तू पागल हो गया। किस बातकी तू चिंता कर रहा है। तेव्हा महानत्यागी बाबा जुमदेवजी भगवान बाबा हनुमानजीला म्हणाले, "बाबा, आज मेरे पिताजी का मुक्ति का दिन है। अगर मैं अपने घरपर होता तो उनकी याद में एकही समय भोजन करता। लेकिन मैं बाहर गांव में हूँ। मैं कुछ भी नही कर सकता"। बाबाचे हे शब्द ऐकून भगवान बाबा हनुमानजी महानत्यागी बाबा जुमदेवजीला म्हणाले , "हे सेवक सुन, तेरे पिताका शरीर और मेरा आत्मा एक है। तू एक भगवान को मानता है, इसलिए तेरे पिता मरने के बाद वह आत्मा तेरे पिताका शरीर छोड़कर मुझमे विलीन हो गया, और तूने तेरे पिताका शरीर जलाकर राख कर दिया। अब बोल सेवक, तू राखकी पूजा करता है या मेरी। भगवंताचे हे शब्द ऐकून महानत्यागी बाबा जुमदेवजी म्हणाले, भगवान आजसे मेरे मन का शुद्धिकरण हुआ। में इस तरह के पुराने विचार मेरे दिल मे कभी नही लाऊंगा और भगवान , मैं तेरी ही पूजा हमेशा करूँगा असे बाबांनी भगवंताला सत्य वचन दिले.

 अशा प्रकारे भगवंताने (बाबा हनुमानजीने) महानत्यागी बाबा जुमदेवजींना आत्मप्रचीती दिली. तेव्हापासून बाबांनी सेवकांना मुत्यु झालेल्या लोकांची पूजा करणे बंद करायला लावले .

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
जीवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.