Followers

Showing posts with label मानवधर्म परिचय पुस्तक. Show all posts
Showing posts with label मानवधर्म परिचय पुस्तक. Show all posts

Tuesday, 27 July 2021

"मानवधर्मातील सेवकांचा त्याग" वरील विचार नक्की वाचन करा व जास्तीतजास्त सेवकांपर्यंत आठवणीने शेयर करा. नमस्कार

 

"बाबांनी आपल्याला मानवधर्मामध्ये त्याग करायला शिकविले, तर त्याग म्हणजे काय ? त्याग आपण आपल्या जिवनात कशाप्रकारे पार पाडतो आणि त्यामुळे आपल्या जीवनात काय बदल होतो"?

                     【लेख स्पष्टीकरण】

त्याग म्हणजे समर्पण. आपल्या मार्गात त्यागाला विशेष महत्व दिले आहे. कारण काही चांगले मिळविण्यासाठी, काही वाईट गोष्टींचा त्याग करावा लागतो. 

★वाईट काय?  

तर, विविध व्यसन जे मानवी जीवनासाठी हानिकारक आहे ते नेहमीसाठी सोडणे, विविध वाईट विचार ज्याने मानवी जीवनाचा नुकसान होऊ शकते अश्या विचारांना कायमचे सोडणे.

★चांगले काय?

मानवी जीवनाचे सुख, मानवी जीवनाचा कल्याण, मनुष्याची आंतरिक शांती, ई.

तर, चांगले काय व वाईट काय हे आपणा सर्वांना चांगल्याप्रकारे माहितीये व त्याच्या अनुसरण आपल्या जीवनात कसा करावं हे विचार करण्याची सद्बुद्दी  परमेश्वराने सर्व मनुष्याला दिली आहे. फक्त त्या सद्बुद्दी चा वापर कसा करावा याचा योग्य दृष्टीकोन असणे आवश्यक आहे.

मानवधर्मात जेव्हा सेवक कुणीही व्यक्ती प्रवेश करतो व त्यानंतर दुःख दूर झाल्यावर,समाधानी मिळाल्यावर मार्गाच्या नियमाप्रमाणे त्यागाचे कार्य करावे लागतात व १२ वर्षातून एकदा पक्क्या सेवकांना त्यागाचे कार्य करावे लागतात. तसेच काही विशीष्ट वेळी त्यागाचे कार्य करावे लागतात. परंतु फक्त त्यागाचे कार्य करणे म्हणजेच त्याग नाही.

या मार्गातील सेवकांना बाबांनी नेहमी सत्याची वागणूक देण्यास सांगितले आहे, मर्यादेचे पालन करून प्रेमाने राहण्यास सांगितले आहे. कारण या मार्गात येण्याअगोदर प्रत्येक सेवक हा कुठल्या ना कुठल्या दुःखाने ग्रस्त होता आणि त्या दुःखावर विजय मिळवण्याकरता सेवकाला आपल्या मनाची एकाग्रता पूर्ण करण्यास आपल्या आत्म्यातून त्याग करणे आवश्यक होते. जोपर्यंत आत्मा जागृत होत नाही तोपर्यंत दुःख दूर होत नाही याचा अनुभव आपण घेतलेला आहे.

आपल्याला जर कोणती गोष्ट मिळवायची असेल तर त्या गोष्टीबद्दल आपण विचार करतो, ही गोष्ट जर मला हवी आहे तर मला नेमकं काय करावे लागेल आणि त्याबद्दल विचारांची देवाण-घेवाण इतरांशी करतोय.  सर्व केल्यानंतर जेव्हा जो योग्य तोडगा निघतो त्या माध्यमातुन आपण ती गोष्ट पूर्ण करतो.

बाबांनी सांगितले आहे, जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख व समाधानी हवी असेल तर स्वतःच्या मनावर ताबा असायला हवा. मनात कुठल्याही प्रकारचा मोह, लोभ निर्माण न करता मनावर नियंत्रण असणे खूप गरजेचे आहे. तुमच्या चुकीच्या इच्छा, विचार या सर्वांना वेळेवर मूठमाती द्यावी लागेल.

त्याग केल्याने बरेचसे फायदे मानवाला होत असते कारण कुठल्याही गोष्टीबद्दल जागरूक असणे किंवा त्याबद्दल विचार करणे. त्या गोष्टीबद्दल तत्पर असणे खूप गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण त्याग करतो त्यातून मिळणारा आनंदही आपल्यालाच मिळतो आणि या त्यागामुळे आपले जीवनमान उंचावते सुख समाधान प्राप्त होते आणि आपल्या जीवनाचे सोने झाले असे जाणवते. 

या मार्गात काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार अश्या मानवी मनातील सर्व विकारांचा त्याग करावा लागतो व एका परमेश्वराच्या चरणी मरून निष्काम कर्मयोगी बनून सत्कर्म करावे लागतात. त्यामुळे आपण परमेश्वर प्रिय मानव बनतो. आपले आचार-विचार शुद्ध बनतात व आपला जीवनाचा उद्देश सफल होतो म्हणजेच प्रपंच साधून परमार्थ साधल्या जातो.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो. नमस्कार...!

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील लेख वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.


Friday, 11 December 2020

प्रकरण क्र: (२९) "मर्यादित कुटुंब" हे प्रकरण नक्की वाचा व आवर्जून शेयर करा.

 


"मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)

             'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२९) 

                             "मर्यादित कुटुंब"


महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माच्या शिकवणुकीत जे चार तत्व, तीन शब्द आणि पाच नियम दिलेले आहेत. त्यातील नियम पाचमध्ये त्यावेळच्या परिस्थितीनुसार मानव मंदिर सजविण्याकरिता फंड अनुदान जमा करणे हा नियम दिला होता. त्याप्रमाणे बाबांनी सेवकांचे मानव मंदिर, सहकारी बँक, ग्राहक भांडार याच्या स्वरुपात सजविल्यानंतरही सेवकांना जीवनचरितार्थ चालवितांना त्रास होतो हे लक्षात आल्यानंतर त्याच्या कारणाचे संशोधन करुन त्यावर निदान काढले. सध्याची देशाची किंवा सपूर्ण जगाची परिस्थिती पाहून जाता मानवांना भेडसावणाऱ्या समस्या कोणतेही

सरकार पूर्णपणे सोडवू शकत नाही किंवा कोणतेही सरकार आपल्या देशाची भरभराट करु शकत नाही. वाढती महागाई, अन्नधान्याची टंचाई, उद्योगधंदे कमी पडणे याला जर कोणी जबाबदार असेल तर ती वाढती लोकसंख्या आहे. जोपर्यंत या वाढत्या

लोकसंख्येला आळा बसणार नाही. तोपर्यंत हल्लीच्या काळात कोणताही देश आपली प्रगती करु शकत नाही. म्हणून प्रत्येक देशाच्या सरकारने याविषयी बरेच संशोधन करुन कुटुंब कल्याण या नावाची योजना राबविणे सुरु केले आहे.

त्यात भारत हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु ही योजना भारतात सरकारतर्फे यशस्वी झाली नाही. भारत सरकार अजूनही मर्यादित कुटुंबाकरिता मानव जागृती करुन निरनिराळ्या प्रकारच्या योजना राबवीत आहे पण सरकार अजुनही लोकसंख्येला मात्र आळा घालु शकले नाही.

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी भगवान बाबा हनुमानजीचा वार्षिक कार्यक्रम आणि एका भगवंताचा सदतिसावा प्रगट दिनोत्सव दि. १७/८/१९८४ रोजी साजरा करीत असतांना सेवकांना भेडसावित असलेल्या समस्यांचे निवारण खालीलप्रकारे मार्गदर्शन केले. ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, "जीवनात चालण्याकरिता, गृहस्थी उंच आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी जे पाच नियम दिले आहेत त्यातील पाचवा नियम मंदिर सजविण्याकरिता फंड अनुदान गोळा

करणे याऐवजी "आपले कुटुंब मर्यादित ठेवणे" हा नियम आजपासून अमलात आणावा." कारण फंड अनुदान भरपूर झाले असून त्या फंडाचा सदुपयोग आपण चांगल्या कामाकरिता केला आहे आणि त्या सर्व गोष्टींचा लाभ सेवकांना मिळतही आहे. परंतु

सेवकांना त्यांच्या मुलांचे योग्यरित्या पालनपोषण करता यावे आणि त्यांना चांगले शिक्षण देता यावे याकरिता प्रत्येक कुटुंबात परिवार-नियोजन आणण्यासाठी खालीलप्रमाणे नियम पाळावेत असा आदेश सेवकांना दिला.

१) या मार्गात जे सेवक आहेत किंवा होतील, त्यांच्या कुटुंबातील ज्याचे लग्न झाले आहे किंवा पुढे होईल त्यांनी लग्नानंतर १६ वर्षांच्या अवधीमध्ये फक्त दोन मुले होऊ द्यावीत.

२) डॉक्टरी सल्ला घेऊन बायांनी गर्भप्रतिबंधक उपाय करावेत.

३) प्रत्येक कुटुंबात मुलाच्या लग्नाची वयोमर्यादा २५ वर्षांची असावी. २५ वर्षांच्या आत कोणत्याही मुलाचे लग्न करु नये.

महानत्यागी बाबा जुमदेवजी पुढे म्हणाले की, आज असे पाहण्यात येत आहे की, लग्न झाल्यावर ४-५ वर्षातच ३-४ मुले जन्माला येतात. त्यामुळे आईवडिलांची त्यांचे पालनपोषण करतांना तारांबळ उडते आणि त्यांना खूप त्रास होतो. त्याप्रमाणे

आईच्या प्रकृतीवरही परिणाम होतो. वरील नियमांचे पालन केल्यास त्रास कमी होईल आणि खर्चात बचत होऊन जीवनमान उंचावेल म्हणून सर्वांनी यापुढे "मर्यादित कुटुंब" हा नियम पाळावा असा आदेश दिला आणि त्या दिवसापासून म्हणजे १७ ऑगस्ट १९८४ पासून सर्व सेवकांनी तो नियम अमलात आणला.

अशाप्रकारे जे काम सरकार एकाएकी करु शकत नाही ते कार्य या मार्गातील सेवक बाबांच्या आदेशानुसार मार्गदर्शन करुन त्यांच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळवितात.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ★जिवन एस. पाटील: 7020000823


सौजन्य: "सर्व सेवक -सेविका"

परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】


🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.




Sunday, 29 November 2020

प्रकरण क्रमांक : (२८) "महानत्यागी"

 


                  "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)

          'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२८) 

                          "महानत्यागी"

समर्थ बाबा जुमदेवजी यांनी १९४६ साली बाबा हनुमानजीची प्राप्ती केल्यानंतर ते मानवाचे दुःख दूर करु लागले. परंतु त्या कृपेने मानवाचे दुःख पूर्णपणे नाहीसे झाले नाही त्यांनी अशा शक्तीचे संशोधन करण्यास सुरुवात केली की जो मानवाचे सर्व प्रकारचे दुःख हरण करु शकेल. शेवटी त्यांनी १९४८ साली एका भगवंताची प्राप्ती केली. तेव्हापासून परमेश्वराप्रती मानवाला जागविण्याचे कार्य निष्काम भावनने ते सतत करीत आहेत. याकरिता बाबा मानवाला रोज मार्गदर्शन करतात.

मानवाला त्यांच्या शारीरिक आणि मानसिक दुःखातुन मोकळे केल्यावर त्याच्या आर्थिक आणि सामाजिक अडचणीचे निवारण करण्याकरिता बाबा आध्यात्मिक

विषयाबरोबरच सामाजिक क्रांतीकडे वळले. त्यांनी त्याकरिता आपल्या सेवकांच्या गरजा भागविता याव्यात म्हणून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली आणि त्या माध्यमाद्वारे परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक, गोळीबार चौक, नागपूर येथे स्थापन केली. जागनाथ बुधवारी, नागपूर येथे "परमात्मा एक सेवक ग्राहक भांडार' उघडले. सालईमेटा आणि धोप या खेड्यांत तेथील सेवकांना शेतीबरोबर जोडधंदा मिळावा म्हणून दुध उत्पादक संस्था स्थापन केल्यात.

हे सर्व कार्य करीत असतांना आध्यात्मिक विषयांवर जास्त भर देऊन त्यांनी सतत १९४७ ते १९८४ म्हणजे जवळ जवळ ३७ वर्षे निष्काम भावनेने मानव जागृतीचे कार्य केले. याकरिता त्यांनी खेडोपाडी, गावोगावी, उन्हाळा, पावसाळा किंवा थंडीच्या

दिवसांची पर्वा न करता पायी, खाचर, बैलगाडी, बस इत्यादी साधनांनी प्रवास केला. याकरिता येणारा खर्च ते स्वतः करीत असत. खेड्यापाड्यात जे काही मिळेल ते खात-पित असत. परंतु मी भगवंत प्राप्ती केली आहे म्हणून लोकांनी फुकटात खाऊ घालावे असा कधीही मोह होऊ दिला नाही. ते कधीही गुरुपुजा घेत नाहीत. आत्मा हाच परमात्मा आहे आणि तो प्रत्येकात आहे हे ते समजतात. म्हणून कोणालाही स्वतःच्या पाया पडू देत नाहीत. कोणाचेही व्यक्तीगत हार स्वीकारत नाहीत. परमेश्वरी कार्य करतांना ते आंधोळीची किंवा जेवणाची पर्वा करीत नाहीत.

बाबांनी वरील संस्था स्थापन करुन सेवकांना त्यांची गृहस्थी उंच आणण्याकरिता या संस्थाचा लाभ मिळवून दिला. या संस्था बाबांनी आपल्या मार्गदर्शनाने तयार केल्या आहेत. या संस्था वृध्दिंगत व्हाव्यात यांकरिता त्यांनी स्वतः अंगमेहनत केलेली आहे. स्वतःच्या देह झिजविला आहे. या योजना राबविण्याकरिता स्वतःच्या रक्ताचे पाणी केले आहे आणि या संस्था तयार होऊन नावारुपाला आल्यावर स्वतःच्या कष्टाचे फलित म्हणून त्यांनी त्याचा मोबदला मात्र घेतला नाही. या संस्थेत होणाऱ्या लाभाचा कधी स्वतःकरिता उपयोग केला नाही. किंबहूना कधी साधा चहासुध्दा या संस्थाकडून त्यांनी घेतला नाही. बँकेची आणि मंडळाची वास्तु तयार करतांना स्वतः जातीने बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देऊन ते पूर्ण करण्याची पराकाष्ठा केली. यावरून त्यांनी केलेल्या त्यागाची कल्पना येते.

इतकेच नव्हे तर "आपल्यासारखे करिता तात्काळ, नाही काळवेळ तया लागी" या म्हणीप्रमाणे समर्थ बाबा जुमदेवजींनी आपल्या सर्व सेवकांना स्वावलंबी

जीवन जगण्यास शिकविले आहे. त्यांच्या आचरणात स्वतःसारखा त्याग निर्माण केला आहे. बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द आणि नियमांच्या आचरणाने सेवकांच्या जीवनात त्यागच निर्माण झालेला आहे आणि म्हणून मंडळामार्फत अस्तित्वात आलेल्या सर्व संस्था प्रगतीपथावर आहेत. त्यांनी आपल्या जीवनात सतत त्याग केल्यामुळे त्यांच्यावर परमेश्वरी कृपा आहे.

या परमेश्वरी कार्याकरिता बाबा सतत त्याग करीत आलेले आहेत. बाबांचे हे वरील सर्व प्रकारचे कार्य लक्षात घेऊन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या दि. ५/८/१९८४ च्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत "महानत्यागी बाबा जुमदेवजी" असे संबोधण्यात यावे असे ठरले आणि त्याप्रमाणे सर्व सेवकांतर्फे मंडळाच्या कार्यकारिणीने बाबांना नम्र विनंती केल्यावर सेवकांच्या विनंतीला मान देऊन वरील पदवी स्वीकारण्यास बाबांनी परवानगी दिली. त्याप्रमाणे दि. १६ ऑगस्ट १९८४ रोजी झालेल्या वार्षिक प्रगट दिनाच्या दिवशी बाबांना "महानत्यागी बाबा जुमदेवजी" ही पदवी सर्व सेवकांतर्फे बहाल करण्यात आली. आणि ती बाबांनी हसतमुखाने स्वीकारली. त्या दिवसापासून बाबा सद्गुरु समर्थ या नावाऐवजी "महानत्यागी" बनले.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ★जिवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:- "सर्व सेवक -सेविका"

परमात्मा एक मानवधर्म परिवार

【युवा सेवकांचा ग्रुप】


🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.


Sunday, 15 November 2020

प्रकरण क्र. (२७) "ज्ञान परस मररस योगी"

 


                 "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
                        'सुधारित पाचवी आवृत्ती'


      प्रकरण क्रमांक (२७): ज्ञान पररस मररस योगी

१९८३ सालची घटना आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजी हे आपल्या निवासस्थानी एक दिवस रात्री आपल्या असानावर झोपले होते. त्यांना झोपेत स्वप्न दिसले. त्या स्वप्नात त्यांना कोणीही व्यक्ती किंवा कोणतीही वस्तु दिसली नाही. फक्त त्यांना मोठमोठी अक्षरे लिहिलेली दिसलीत. त्यांच्या मुखातुन सारखे तेच तेच शब्द बाहेर पडत होते. ते शब्द होते "ज्ञान पररस मररस योगी" जवळजवळ अर्धातासपर्यंत ते हे शब्द वाचत होते. त्यानंतर त्यांना जाग आली आणि त्यानंतरसुध्दा त्यांच्या मुखातुन तेच शब्द बाहेर पडत होते म्हणून बाबांनी आपल्या डायरीत त्या शब्दांची नोंद त्याच वेळेस करुन ठेवली. हे शब्द जरी त्यांना स्वप्नात दिसले तरी ते शब्द परमेश्वरानेच त्यांच्या मुखकमलातुन बाहेर काढले होते. त्यावर बाबांनी बराच विचार केला आणि नंतर ते सर्वांना सांगू लागले की, ज्याप्रमाणे परिस नावाच्या वस्तुचा लोखंडाला स्पर्श झाल्यावर ते लोखंड सोने बनते, त्याप्रमाणे ज्ञान हे परिसा सारखे आहे. या ज्ञानाला जो स्पर्श करतो त्याचे सोने होईल. म्हणजे तो महानज्ञानी होतो. परंतु मानवी जीवनात दैवीशक्तीकरिता मनाची एकाग्रता, एक चित्त, एक लक्ष, एक भगवान याची अत्यावश्यकता आहे. हेच दैवी शक्तीचे उगमस्थान आहे.

 परमेश्वराला समोर ठेवून बाबांनी दिलेल्या "मरे या जिये भगवत नामपर" या तत्वाप्रमाणे परमेश्वराच्या नावावर मेले तर भगवंत भक्ताच्या पाठीशी उभा होतो आणि परिसासारखे रस तयार होऊन तो ज्ञानी बनतो. जर तो परमेश्वराच्या चरणी मेला नाही तर रस तयार होत नाही. म्हणून माणूस परमेश्वराच्या चरणी मेल्यावरच त्याचा रस तयार होतो आणि रस बनल्यावर ती व्यक्ती योग्यासारखी बनते. हा या मार्गातील सेवकांना प्रत्यक्षात आलेला अनुभव आहे. परमेश्वराच्या नावावर मरणारी व्यक्ती बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमाने वागली तर ती योगी बनते. अन्यथा तिला कितीही पुस्तकी ज्ञान असले तरी ती योगी बनु शकत नाही. त्याला परमेश्वराची साथ असणे आवश्यक आहे. कर्तव्याने आत्मानुभव येतो. आत्मप्रचिती होते, आत्मज्ञान वाढते. तेव्हाच तो ज्ञानी पुरुष होऊन योगी बनतो हे सिध्द होते.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जिवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.







Thursday, 5 November 2020

प्रकरण क्रमांक : (२६) (असाध्य रोग)



                  "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
                        'सुधारित पाचवी आवृत्ती'

      प्रकरण क्रमांक (२६):  असाध्य रोग

 मानवधर्म हा मार्ग मानवाने आत्मसात केल्यास त्याला झालेले असाध्य रोग नष्ट होतात. उदाहरणार्थ- ह्रदयविकार, कोड, महारोग, कॅन्सर, टी.बी. मुळव्याध, कावीळ मधमेह इत्यादी. यांची अनेक उदाहरणे म्हणून या मार्गातील सेवकांचे अनुभव सांगता येतील. या असाध्य रोगांत वंश परंपरागत आणि संसर्गजन्य असे अनेक रोग आहेत. या मार्गात हे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात.

जेव्हा वरीलपैकी कोणताही रोग उदा. टी.बी., महारोग कोड, मधुमेह, मुळव्याध, हृदयविकार मानवाला झाल्यानंतर जेव्हा तो डॉक्टरांकडे जातो तेव्हा प्रथमच डॉक्टर चौकशी करतात की त्यांच्या घराण्यात हा रोग यापूर्वी कधी झालेला आहे काय? त्यामागील कारण हेच की, हे रोग वंशपरंपरागत आहेत. म्हणून हे रोग होतात आणि यावर औषधोपचार केला तरी तो रोग त्या घराण्यात पुढे कोणालाही होणार नाही याची शाश्वती

डॉक्टरांकडून मिळत नाही. याला कारण "रक्ताचे नाते" म्हणून ते सांगतात. महाननत्यागी बाबा जुमदेवजी यांनी यावर बरेच संशोधन केले आहे आणि या असाध्य रोगांवर मात करुन या मार्गात ते साध्य केलेले आहेत. त्यांचे संशोधनपुढीलप्रमाणे आहे.

 डॉक्टरांच्या निदानाप्रमाणे वंशपरंपरागत रोग होण्याचे कारण, "रक्ताचे नाते" असेल तर तो त्या कुटुंबात प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात असला पाहिजे. परंतु तसे होत नाही. तो एखाद्यालाच असतो. काही वेळेस दोन-तीन पिढ्यानंतर येतो. त्या कुटुंबात तो रोग ज्या व्यक्तीला झाला असेल ती व्यक्ती मरण पावल्यावर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि मोक्ष न मिळाल्यामुळे तो भटकत असतो. तो आत्मा ज्या कुटुंबातून बाहेर पडतो त्या कुटुंबात तो पुनः जाण्याचा प्रयत्न करतो आणि शक्यतोवर तो तेथेच जातो. तेव्हा त्या कुटुंबात तो आत्मा गेल्यावर ज्याला तो स्पर्श करतो त्याला हा रोग जडतो. आणि जोपर्यंत त्या आत्म्याला शांती किंवा मोक्ष मिळत नाही तोपर्यंत रोग त्या कुटुंबातील वंशजात होत असतो.


 ज्या व्यक्तीला असा रोग झाला आहे ती व्यक्ती या मार्गात आल्यावर त्यावर ही दैवीशक्ती कार्य करते आणि ज्या आत्म्याचा त्याला स्पर्श झाला असेल त्यावर मात करते आणि त्या आत्म्याला या लक्ष चौर्यांशी भोगातुन मुक्त करते. ती भटकती आत्मा मुक्त झाल्यावर त्याला मोक्ष मिळतो. त्यामुळे तो पुन्हा भटकत नाही आणि त्यापुढे तो आत्मा कोणालाही स्पर्श करीत नाही. म्हणून त्या कुटुंबात ते दुःख पुन्हा कोणालाही होत नाही. अशा प्रकारे वंशपरंपरागत रोग नष्ट होतात आणि त्या कुटुंबाची त्या रोगापासून मुक्तता होते.

हाच सिध्दांत संसर्गजन्य रोगांकरिता लागू होतो. काही संसर्गजन्य रोग उदा. कावीळ हे धुळीच्या कणांमुळे होतात . वातावरण बदल झाल्यास अनेक रोग उद्भवतात. वातावरण बदलविणे हे सुद्धा त्या सृष्टीनिर्मात्या परमेश्वराचे कार्य आहे. तीच दैवीशक्ती यावर मात करू शकते. म्हणून हेही रोग या मार्गात त्या दैवीशक्तीमुळे बरे होतात.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जिवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.





Wednesday, 20 May 2020

प्रकरण क्रमांक (२५) "सौराष्ट्र दौरा"



                  "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
          'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२५) 
   
                                 "सौराष्ट्र दौरा"

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यावर मानव-धर्म स्थापन केला. हा नवीन धर्म असल्यामुळे ते अहोरात्र या मार्गाचा प्रसार करण्याकरिता आणि मानवजागृती व्हावी म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी गेले ५३ वर्षे सारखे गावोगोवी, खेडोपाडी दौरा करीत आहेत. त्यामुळे हा मार्ग अनेकांनी अवलंबिलेला आहे, आजच्या घटकेस या मार्गात हजारो कुटुंबातील लोकं सेवक आहेत. सुरूवातीला जरी या मार्गाची वाढ अत्यंत धिम्या प्रमाणात झाली तरी आता ती उत्तरोत्तर वाढतच आहे. खालील तक्त्यावरून हे लक्षात येईल.
   १९४७ ते १९७० पर्यंत २३८ परिवार 
   १९७१ ते १९८० पर्यंत १,१२६ परिवार 
   १९८१ ते १९९० पर्यंत ३,३५२ परिवार 
   १९९१ ते २००० पर्यंत १०,५०६ परिवार 
   २००१ ते ३१ डिसेंबर २०१० पर्यंत २४,९८८ परिवार
सुरूवातीला जास्त सेवक न होण्याचे कारण की हा मार्ग एकदम नवीन आहे. जुनी संस्कृती सोडून नवीन संस्कृतीची ही निर्मिती आहे. वर्षानुवर्ष लोकांमध्ये जे जुने आचारविचार आहेत, ज्या भावना आहेत. त्यांना काडीमोड देणे लोकांना जमत नाही. परंतु या मार्गाचा सेवक झाल्यावर त्यांना जो आत्मानुभव येतो तो पाहून या नवीन संस्कृतीमध्ये लोकांचे आगमन होत आहे. गावोगावी बाबांनी दौरा केल्यामुळे या मार्गाचे सेवक भारताच्या चारही भागात पसरलेले आहेत. इतकेच नव्हे तर अमेरिकेला सुद्धा या मार्गाचे सेवक आहेत. असाच एक दौरा १९८२ साली २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत सौराष्ट्र येथे गेला होता. या दौऱ्यात महानत्यागी बाबा जुमदेवजीसोबत गावोगावचे साधारणतः ५० सेवक होते. बाबांनी केलेल्या प्रत्येक दौऱ्यात विशेष अनुभव येतात. सौराष्ट्र दौऱ्यात सुध्दा असे अनेक अनुभव आलेत. ते अनुभव परमेश्वराने कशाप्रकारे दिले हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल.

     महानत्यागी बाबा जुमदेवजी साधारणतः ५० सेवकासोबत दिनांक २० नोव्हेंबर १९८२ ला सायंकाळी ७ वाजता हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसने सुरतला जाण्यास निघाले. २१ नोव्हेंबर ला दुपारी १:३० वाजता ते सुरत येथे पोहचले. दि. २२ नोव्हेंबर ला निंबायत खाडी सुरत येथे हवनकार्य आटोपून तेथील सेवकांचा परिचय बाबांना करून देण्यात आला. त्यानंतर तेथे उपस्थित सेवकांनी या मार्गाची दीक्षा घेण्याचे कारण आणि त्यांचे आत्मानुभव यावर चर्चा झाली. रात्री ८ वाजता मानवजागृतीवर अनुभवात्मक भजनाचा कार्यक्रम होऊन बाबांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर जेवण करून आराम केला.

दिनांक २३ डिसेंबर १९८२ ला सुरत शहर बघण्याचे ठरले म्हणून बाबा सेवकांबरोबर सुरत दर्शनाकरीता दुपारी १ वाजता निघाले. निघताना बाबांनी सर्व सेवकांना आदेश दिला की, आपण कोणत्याही देवळात किंवा मंदिरात गेलो तरी तेथील मूर्तीला नमस्कार करू नये. फक्त मानवाने तयार केलेली कला बघू, कारण परमेश्वर दगडात नाही. तो निर्जीव वस्तूंमध्ये नाही तर सजीवांमध्ये आहे. 

सुरत शहर बघता बघता ते अंबामातेच्या देवळात गेले. तेथे बाबांनी पुन्हा सर्वाना आठवण करून दिली की मूर्तीला नमस्कार करू नये. आपण येथे या देशातील कला पाहावयास आलो आहोत. तरी कला बघून पुढे जाऊ या. देऊळाच्या पायऱ्याशेजार खालच्या बाजूला हनुमानजीचे मंदिर होते. सर्वजण देवळाच्या बाहेर निघाले पण हेमराज सातपुते आणि आसाराम सव्वालाखे हे मागे राहिले. हनुमानजीचे देऊळ असल्यामुळे आणि या मार्गाचे प्रतीक बाबा हनुमानजी असल्यामुळे हेमराज सातपुते यांचे मन होलावले आणि "तेथे कर माझे जुळती" या म्हणीप्रमाणे त्यांनी श्रध्देने त्या हनुमानजीच्या मूर्तीला नमस्कार केला. आसारामजी सव्वालाखे यांनी पाहिले. परंतु दोघांनीही त्याबद्दल आपसात चर्चा केली नाही. किंबहुना ही आपली चूक झाली. येथे त्यांनी बाबांचा शब्द तोडला. त्यांचे हे परमेश्वराचे शब्द असल्यामुळे तो एकाअर्थी परमेश्वराचा अपमान झाला होता. त्यानंतर पुढे साईनाथ मंदिर तापी नदी, चमडीभर जागा बघून पुढे अश्विनीकुमार तीन पत्ती हा भाग सर्वानी पाहिला परंतु तेथे अक्षरश: तीन पत्तीदेवजी पाच पत्ती होती. सर्वांनीच बाबांच्या आदेशाचे पालन करून कोणत्याही देवळात नमस्कार केला नाही. फक्त सृष्टिसौंदर्य, नवनवीन तयार केलेली कलात्मक देवळे, भव्य इमारती इत्यादी रमणीय स्थळे पहिली. अश्विनीकुमार तीन पत्ती बघून तेथून सायंकाळी लिंगायत खाडी येथे परत येण्यास निघाले. सुरत दर्शनाकरीता स्पेशल बस केली होती.

परत येतांना बसच्या समोर एक व्यक्ती आली आणि त्याला वाचिवण्याकरिता बसच्या ड्रायव्हरने जोरात ब्रेक मारला. सातपुते हा मागे बसला होता आणि आसारामजी सव्वालाखे हा समोरच्या सीटवर जे ५ जण बसले होते त्यापैकी एक जण होता. ब्रेक जोराने मारल्यामुळे बस एकदम थांबली आणि बस मधील सेवक लोकं आपआपल्या सीटवरच आदळलेत. परंतु हेमराज सातपुते हा त्याच्या सीटवरून उडून आसाराम सव्वालाखेच्या अंगावर जाऊन आदळला. तसा हेमराज सातपुते हा सव्वालाखेच्या सीटपासून ३-४ सीट मागे बसला होता. या घडामोडीमुळे सव्वालाखेच्या छातीला जबर मार लागला त्यामुळे तो मी मरतो आहे असे जोराने बसमध्येच ओरडू लागला. त्यानंतर बस सरळ डॉक्टरांकडे नेण्यात आली. तेथे त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. अपघाताची केस असल्यामुळे डॉक्टर औषधोपचार करण्यात तयार नव्हते परंतु बाबांची महिमा ऐकून त्यांनी औषधोपचार केला. हे कसे घडले हे डॉक्टरांनी विचारले असता त्यांना सांगण्यात आले की, सव्वालाखेवर सातपुते पाच फुट जागेवर आपटला गेला. तेव्हा डॉक्टर म्हणाले फार मोठी दुखापत झाली आहे. पण औषध दिलेले आहे आराम होईल त्यानंतर निंबायत खाडी येथे सर्वजण परत आले.

    रात्री ८ वाजता उघना यार्ड, सुरत येथे सेवकांचे अनुभावात्मक भजनकार्य, सेवकांचे अनुभव यावर चर्चासत्र झाले आणि शेवटी मानवजागृतीवर बाबांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम सुरू असतांना सव्वालाखे निंबायत खाडी येथे आराम करीत होता. त्याच्या प्रकृतीला पूर्णपणे आराम पडला नव्हता. बाबांनी सेवकांना कोणती चूक झाली हे विचारले असता कोणीही सांगावयास तयार नव्हते कोणाच्याही लक्षात त्याची चूक आली नाही. शेवटी सव्वालाखे यांच्या लक्षात त्याच्या हातून झालेली चूक लक्षात आली आणि त्याने एका सेवकाच्या हातून बाबांना कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणी झालेल्या चुकीची माहिती देण्यास पाठविले. बाबांना हि गोष्ट कळल्यावर ते निंबायत खाडीला कार्यक्रम आटोपल्यावर परत आले. त्यांनी सातपुतेला विचारले असता त्याने होकार दिला की, मी हनुमानजीच्या देवळात नमस्कार केला आणि सव्वालाखे यांनी ते पाहिले. मी आपल्या आदेशाचे उल्लंघन केले ही माझी महान चूक झाली आहे असे बाबा आणि उपस्थित सेवकांना सांगून तो पुढे म्हणाला की, माझ्या हातून घडलेल्या चुकीबद्दल भगवान बाबा हनुमानजी आणि महानत्यागी बाबा जुमदेवजी तसेच सेवकबंधू क्षमा करतील अशी त्याने बाबांना विनंती केली. त्याप्रमाणे बाबांनी दोघांच्याही हातून घडलेल्या चुकीबद्दल क्षमा केली आणि तिकडे सव्वालाखे यांच्या प्रकृतीला आराम पडला, तत्पूर्वी सव्वालाखेला एका तासातून तीनवेळा बाबा हनुमानजीला क्षमा मागण्यास सांगितले अशाप्रकारे बाबांनी दोघांनाही क्षमा करून त्यांना त्यांच्याकडे झालेल्या चुकीपासून मुक्त केले. परंतु ही चूक अगोदरच सांगितली असती तर त्या दोघांवर ही आपत्ती आली नसती. 

     यावरून हे सिध्द होते की, चूक दाबून ठेवली, त्यातल्या त्यात बाबांच्या आदेशाचे पालन केले नाही तर किती मोठे दुःख येते. जसे चोरी करणाऱ्या पेक्षा चोरी करण्यास सांगणारा माणूस हा मोठा गुन्हेगार होतो त्याप्रमाणे चूक करण्यापेक्षा चूक लपविणारा हा जास्त गुन्हेगार असतो हे सिध्द होते. त्याचप्रमाणे परमेश्वराला चुकीची क्षमा मागितल्यास तो मानवाला क्षमा करून त्याचे दुःख दूर करतो. इतका परमेश्वर मायाळू आहे.

      त्या दिवशी रात्रीला १२ वाजता जेवण आटोपून काहीजण तेथे झोपले होते, तर काहीजण जागेच्या अभवामुळे दुसऱ्या सेवकांकडे २-३ ठिकाणी झोपावयास गेले होते. रात्री दोन वाजताच्या सुमारास सर्व सेवकांना उलटी आणि शौचास होऊ लागले. यावरून बाबांना आणि सर्वांना वाटले की अन्नातून विषबाधा झाली असावी. तेथे बाबांनी असा आदेश दिला की, जेथे जेथे सेवक थांबले आहेत तेथून त्या सेवकांची माहिती आणावी. त्याप्रमाणे माहिती घेतली असता ज्या ज्या ठिकाणी सेवक थांबले होते त्या त्या ठिकाणी ज्या सेवकांनी जेवण केले होते त्या सर्वांनाच उलटी आणि शौचास होत आहे हे समजले. हे समजल्यावर बाबांनी श्री. शिरपूरकर सेवक याला सांगितले की, जवळपास कोणी डॉक्टर असेल तर त्याला बोलावून आण कारण ही अन्नातील विषबाधा दिसते आहे. सर्व सेवक परमेश्वराच्या नावाचा सारखा जयघोष करू लागले शिरपूरकर डॉक्टरांकडे गेल्यावर त्याला डॉक्टरांनी विचारले की उलटी कशी होते, तेव्हा ईश्वरी कला, त्याच क्षणी शिरपूरकरला उलटी आली आणि डॉक्टर समोरच उलटी करीत, अशी उलटी करीत आहेत आणि सारखे शौचास जात आहेत असे त्यांनी सांगितले. ते डॉक्टरला घेऊन आले. डॉक्टरांनी सर्वांना तपासून इंजेक्शन दिलेणी ओषधोपचार केला. 

लहान मोठे मिळून साधारण २०० सेवकांना विषबाधा झाली होती. म्हणून बाबांनी सांगितले की आपण या सर्वांवर कोठूनही औषध उपलब्ध करून औषधोपचार करा कारण ही विषबाधा होणे चांगले नाही. अशी घटना घडणे हे योग्य नव्हे कारण आम्ही नागपूरला राहत असून भगवतकार्याचा दौरा करीत आहोत. बाबांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनी सर्वांवर उपाय करून विषबाधेपासून सर्वांना वाचविले. काही सेवक खूब लांब झोपायला गेले होते. त्यांच्या प्रकृतीविषयी त्या दिवशी माहिती मिळू शकली नाही. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी असे कळले की, त्यांना सुद्धा विषबाधा झाली होती. परंतु त्यांनी भगवंताच्या नावाचे (बाबा हनुमानजी) तीर्थ घेतल्यामुळे विना औषधाने त्यांची विषबाधा नाहीशी झाली. त्या दिवशी रात्री सर्वजण औषधोपचारानंतर शांत झोपले. कोणतीही वाईट घटना घडली नाही. परमेश्वराने सर्वांना जीवदान दिले

दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी बाबांना आपल्या घरी चहा पिण्याकरिता निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे बाबा सेवकांना घेऊन त्या डॉक्टरांकडे चहापाणी घ्यावयास गेले. तेव्हा डॉक्टरांनी बाबांना सांगितले की रात्रीला झालेली विषबाधा ही भयंकर स्वरूपाची होती. जरी औषधोपचार केला तरी ती आटोक्यात येण्यासारखी नव्हती. उलट कितीतरी जण दगावयास पाहिजे होते. परंतू कोणीही दगावले नाही. यावरून आपल्याजवळ फार मोठी परमेश्वरी शक्ती आहे असे मला वाटते. त्यावर बाबांनी डॉक्टरांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, या मार्गावर जागृत शक्ती आहे . म्हणून कोणी दगावले नाही. या परमेश्वरी कृपेचा अनुभव या मार्गातील कित्तेक सेवकांना आलेला आहे.

दि. २४ नोव्हेंबर १९८२ साली पटलेवाडी सुरत येथे सेवकांचा परिचय, अनुभव कथन आणि बाबांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर २५ नोव्हेंबर १९८२ ला रात्री साडेदहा वाजता बसने अहमदाबादला बाबा सेवकांसोबत जावयास निघाले. २६ नोव्हेंबरला बापूनगर, मोरारजी चौक, अहमदाबाद येथे भगवतकार्याचे चर्चासत्र, अनुभव, परिचय आणि बाबांचे मानवजागृतीवर मार्गदर्शन झाले. दि. २७ नोव्हेंबरला अहमदाबाद दर्शनाकरिता बसने निघून झुलता मिनार, गोमतीपूर, काकडीया तलाव, बालवटीका, अपना बाजार, सिद्धी सय्यद जाळी, भद्राकली मंदिर, हरिसिंगची वाडी, गांधी आश्रम, मानव मंदिर ओपन सिनेमा हॉल, विज्ञान भवन, भाव निरझर इत्यादी ऐतिहासीक स्थळे पाहलीत. सेवकांनी मंदिरात नमस्कार केला नाही, तर केवळ मानवाने बनविलेली कलाकृती पाहिली.

दि. २८ नोव्हेंबरला सौराष्ट्र पाहण्याकरिता स्पेशल बसने सर्व सेवक निघाले. सायला चोतील, नवरगुजा पाहून जामनगर पाहिले आणि रात्री जामनगरला मुक्काम केला. या बसमध्ये जेवणाकरिता एक काँट्रॅक्टर ठेवला होता. त्याने सेवकांशी व्यवस्थित व्यवहार केला नाही. त्याने सेवकांना त्रास दिला. पोटभर जेवण दिले नाही. बाबा बरोबर असल्यामुळे परमेश्वरी कृपा होती. त्यामुळे त्याच्यावर खूब वाईट प्रसंग आले. त्याचा स्टोव्ह झाडाला अडकून फुटला. त्याने काटकसर करूनही त्याला या धंद्यात खूब मोठा तोटा झाला आणि तो आर्थिक अडचणीत आला.

दि. २९ नोव्हेंबरला बाबा आणि सर्व सेवक जामनगरवरून द्वारकापुरी येथे आले. तेथे सुदामपुरी, द्वारका मंदिर, अरबी समुद्र पहिला. नंतर समुद्रात असणाऱ्या द्वारकामंदिरात जाण्याकरिता सर्वजण नावाने निघाले. नावेत ५० सेवक आणि ५० लोक इतर असे एकूण १०० लोक बसले होते. बाबा नावेतील वरच्या भागाला बसले होते. नाव सुरू झाली. नाव पाण्यातून जातांना ती दोन्ही बाजूंना डोलू लागली. तेव्हा नाविक खूब घाबरला. त्यांच्या लक्षात येईना की, वारा नसतांना नाव हेलकावे का घेत आहे. नावेचे दोन्ही काठ पाण्याच्या पातळीपर्यंत हेलकावे घेत होते. तेव्हा सेवकांनी बाबा हनुमानजींच्या जयघोष केला. त्यांत इतर लोकही सामील झाले आणि नावेचे हेलकावे घेणे बंद झाले. त्यानंतर नाव सुरळीतपणे द्वारका मंदिरात पोहचली. जेव्हा नाव समुद्रातून जात होती तेव्हा जोराचा वारा सुरू नव्हता किंवा समुद्राच्या लाटाही जोराने वाहत नव्हत्या. नावाने हेलकावे खाणे ही परमेश्वरी लीला होती असे बाबांचे म्हणणे होते. सेवकांनी मंदिरात नमस्कार केला नाही, तर केवळ मानवाने बनविलेली कलाकृती पाहिली. नावेने हेलकावे खाणे ही परमेश्वरी लीला होती. असे बाबांचे म्हणणे होते. 

  द्वारकामंदिराच्या परिसरात पोहचल्यावर बाबांनी नेहमीप्रमाणे सर्व सेवकांना कोणत्याही देवळात नमस्कार करू नये असे आदेश दिले. परिसरात शिरल्याबरोबर कृष्णमंदिराजवळ सर्वजण पोहचले. द्वारकानगरीचे मुख्य द्वार बंद होते. ते सायंकाळी ६ वाजता उघडणार होते. तोपर्यंत सर्वजण दार उघडण्याची वाट पाहून तेथेच थांबले,बरोबर ५ वाजता मुख्य द्वार उघडले गेले. तेथून सर्वजण सुदाम महाराजांच्या बैठकित गेले. तेथे जे सुदाम महाराज होते ते बैठकित आले आणि आपल्या सिंहासनावर बसले. त्या ठिकाणी अशी एक प्रथा आहे की प्रथम सुदाम महाराज लोकांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून दान वसूल करतात आणि त्यानंतरच पुढे द्वारकानगरी पाहण्यासाठी आत जाऊ देतात. त्याप्रमाणे सुदाम महाराज आपल्या आसनावर बसल्यानंतर बाबांसह सर्व सेवक आणि इतर लोक खाली बसले. यानंतर सुदाम महाराजांनी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. ते सांगू लागले की कृष्णाची द्वारका आहे. येथे दान केल्यास पुण्य मिळते . अन्यथा त्रास होतो. म्हणून पुण्य मिळविण्याकरिता आपल्या शक्तीनुसार प्रत्येकाने ५०१, १००१, ५००१ रुपये दान करावे हे ऐकून बाबांना आश्चर्य वाटले. या मार्गातील एक सेवक श्री. नागेराव खापरे यांना बाबांनी सांगितले की, त्या सुदाम महाराजांना सांगा की, आमच्याबरोबर आमचे धर्मगुरु महानत्यागी बाबा जुमदेवजी आहेत. ते निष्काम भावनेने कार्य करतात. ते गुरुपूजा घेत नाहीत आणि दान पण देत नाहीत. म्हणून आम्ही तुम्हाला दान देऊ शकत नाही. त्याप्रमाणे नागोराव खापरेंनी सुदाम महाराजांना तसे सर्वासंमक्ष सांगितले. तेव्हा हे ऐकून तेथील पुजाऱ्यांनी सेवकविरुद्ध कट रचला की यांना दर्शन घेऊ द्यायचे नाही. तेथून सर्वजण कृष्णाच्या देवळाजवळ आले तेथे सर्वजण देवळाचे दार उघडेल या आशेने थांबले होते. परंतु कट केल्याप्रमाणे तेथील पुजारी एकानंतर एक परत जात होते, पण कृष्णाच्या मंदिराचे दार उघडले नाही. तेव्हा तेथेच बाबांनी सर्व सेवकांना मार्गदर्शन करून त्यांच्याबरोबर जे इतर लोक होते त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, या देशात पुजाऱ्यांची एवढी सत्ता आहे की, ते दान दिल्याशिवाय देवाचे दर्शन घेऊ देत नाहीत. पुजारी लोकांनी देवाला विकायला काढले आहे. पण देव देवळात नाही. तो प्रत्येक मानवाजवळ आहे. त्यांचा आत्म्यात आहे. म्हणून म्हटले आहे की,

"मंदिर, मस्जिद, गुरुद्वारोने बाँट लिया भगवान को,
सागर बाँटो धरती बाँटो, मत बाँटो इंसान को।"

मानवाला आपसात वाटू नका कारण त्याला वाटल्यास भगवंताला (परमेश्वराला) वाटल्यासारखे होईल. त्यानंतर बाबांनी सर्व सेवकांना आदेश दिला की, बाबा हनुमानजीचा जयघोष करून परत चला. त्याप्रमाणे सर्व सेवकांनी खालीलप्रमाणे जयघोष केला.

भगवान बाबा हनुमानजी की जय। 
महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय। 
परमात्मा एक।। 
सत्य, मर्यादा, प्रेम कायम करनेवाले 
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले 
मानव धर्म की जय।

आणि सर्व सेवक मुख्य व्दाराच्या बाहेर निघाले. एक सेवक श्री. केशव चिचघरे हा सर्वात मागे राहिला होता. मुख्य व्दाराजवळ एक साधू, धुनी लावून बसला होता. केशव चिचघरे जेव्हा गेटजवळ आला तेव्हा एक पुजारी असे म्हणाला की, यांनी दान दिले नाही. म्हणून यांची नाव पाण्यात बुडेल. हे शब्द त्या साधूकडून ऐकल्यावर त्यांच्या अंगाची लाहीलाही झाली आणि त्यांनी रागारागाने त्या पुजाऱ्यांना उत्तर दिले की तुम्ही पुजारी स्वतःला काय समजता आहात ? त्या सर्वांवर परमेश्वराची कृपा आहे म्हणून ते काहीही न बोलता निघून गेले. तुम्ही पुजारी इतके नीच आहात की, जर कोणी दान दिले नाही तर तुम्ही त्यांना देवाचे दर्शनही घेऊ देत नाही. हे सर्व केशव चिचघरेनी ऐकल्यावर त्यांनी बाबांना सांगितले तेव्हा बाबा म्हणाले की, ही सर्व मूर्ख लोकांची सत्ता परमेश्वराला मान्य नाही आणि ती लवकरच बदलेल. याकरिताच या मार्गाची उत्पत्ती आहे. बाबा व्दारकेला आराम करण्याकरिता एका ठिकाणी थांबले. तेथे काही कारणास्तव सेवकांचे जेवणाच्या कॉन्ट्रॅक्टरशी खूप भांडण झाले. तेव्हा बाबांनी सर्व सेवकांना आवरले. त्या कॉन्ट्रॅक्टरचे खूप आर्थिक नुकसान झाले ३० नोव्हेंबरला द्वारकेवरून पोरबंदर येथे सर्व पोहचले.

तेथे भारत मंदिर, दवाखाना आणि गांधीजींचे घर सर्वांनी पाहिले. तेथून सर्वजण सोमनाथला पोहचले. तेथे सोमनाथचे ऐतिहासिक मंदिर पाहून समुद्रकिनाऱ्यावरील सृष्टी- सौंदर्य पाहिले. त्यानंतर तेथे रात्रीला मुक्काम करून १ डिसेंबर रोजी जुनागड येथे सर्वजण आले. जुनागडचा किल्ला, ९,९९९ पायऱ्या असलेले गडावरील देवस्थान पाहिले.  तेथून वीरपूरला जाऊन "जलाराम बापूचे" मंदिर पाहिले. हे मंदिर पाहिल्यानंतर बाबांच्या मनात असे विचार आले की, आपणही कुठेतरी चांगलीशी जागा मिळवून अशाच प्रकारचे "मानव-मंदिरा"  चे भवन आपल्या मंडळातर्फे बांधावे. त्या ठिकाणी आपल्या सेवकांना सुख, शांती आणि समाधान मिळेल. त्याप्रमाणे येथूनच प्रेरणा घेऊन बाबांनी नागपूर येथे मानव मंदिर उभारले आहे.

विरपूरवरून गोंडलला गेल्यावर योगी महाराजांचे मंदिर पाहिले. २ डिसेंबरला गोंडलवरून आकोट होत सांरगपूरला गेले. तेथे लक्ष्मीनारायणचे मंदिर व हनुमान मंदीराची कलाकृती सर्वांनी पाहिली. तेथून ३ डिसेंबरला पुन्हा अहमदाबाद येथे परत आले. वरील सर्व ठिकाणी सर्व सेवक मंदिरात फिरलेत परंतु बाबांच्या आदेशानुसार कोणत्याही सेवकाने, कोणत्याही मंदिरात, कोणत्याही मूर्तीला नमस्कार केला नाही. 

३ डिसेंबरला जुना बापूनगर, अहमदाबाद येथे रात्री ८ वाजता मानवी अनुभवावर भजनकार्य आणि मानव जागृतीवर बाबांचे मार्गदर्शन झाले. तेव्हा बाबा आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, मंदिरात कोणत्याही मूर्तीला नमस्कार कोणीही केला नाही. कारण बाबा सजीवामध्ये परमेश्वरी रूप पाहतात. निर्जीवामध्ये परमेश्वर वास करीत नाही. मूर्ती ही निर्जीव वस्तू आहे. म्हणून बाबांचे सेवक कोणत्याही मूर्तीला नमस्कार करीत नाहीत. ते रूप सजीवांमध्येच पाहतात म्हणून त्यांना आत्मप्रचीती, आत्मानुभव आणि आत्मज्ञानाची प्राप्ती होते. त्यामुळेच सेवकांची आत्मशक्ती वाढते. भावनेचा नाश होतो आणि मानव हा अनुभवाचे तज्ञ होतो. तो भगवंताला समोर ठेवून आत्मसाक्षात्कारांनी आपले भविष्य बनवून उज्ज्वल करतो.

दिनांक ४ डिसेंबर रोजी नवा बापूनगर, अहमदाबाद येथे रात्री ८ वाजता मानवी अनुभवात्मक चर्चाबैठक, भजनकार्य, सेवकांचे अनुभव आणि मार्गदर्शन होऊन दि . ५ डिसेंबरला अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसने नागपूरला प्रस्थान होऊन ६ डिसेंबर १९८२ ला सकाळी ७ वाजता नागपूरला आगमन झाले 

या सौराष्ट्र दौऱ्यात जे जे घडले त्याला सर्व परमेश्वरी कृपा कारणीभूत आहे आणि तिनेच ही परिस्थती उत्पन्न करून तिला पूर्णपणे सांभाळले आहे. त्याचे कारण मानव हा कर्मकर्ता असल्यामुळे त्याच्या हातून चुका होणे स्वाभाविक आहे आणि तो चुकला की त्याचे परिणाम चुकी एवढेच होतात. हे परमेश्वराने मानवाला शिकविले आहे. वरील सर्व घटनेवरून हे सिध्द होते की, बाबा बरोबर भगवंत नेहमी वास करतो. त्यामुळे त्यांचेपुढे सेवकांवर कितीही अडचणी किंवा समस्या निर्माण झाल्यात तरी त्या चुटकी सारख्या सहजतेने सुटतात.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जिवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Tuesday, 19 May 2020

प्रकरण क्रमांक (२४) "ईच्छा अनुसार भोजन"

       

                    "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
            'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२५) 
   
                            "ईच्छा अनुसार भोजन"

मोगरकशा तलावावर घडलेल्या प्रसंगातून सर्व सुखरुप मंगरली या गावी संध्याकाळी आल्यावर महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू झाली. बैठकीत उपस्थित असलेल्या सेवकांना हया मार्गावर ते तत्व, शब्द आणि नियम शिकविले आहेत तसेच या मार्गची उपासना केल्यावर त्यांना जे अनुभव आलेत त्यावर आपआपले विचार मांडले. त्यानतर बाबांचे मार्गदर्शन झाले. सर्व लोक आनंदी वातावरणात असल्यामुळे बैठक बरीच उशिरापर्यंत चालली. त्या वेळेस रात्रीचे बारा वाजले होते.

बैठक समाप्त झाल्यावर महानत्यागी बाबा जुमदेवजी त्या गावातील सेवकांना म्हणाले, आम्हाला आता नुसत्या दुधाचा चहा प्यावयास पाहिजे. या गावात आल्यापासून दोन दिवस झाले. पण दूधाचा चहा मिळाला नाही. तर आता पाहिजे अशी इच्छा प्रगट केली. सेवक हे ऐकून गोंधळला आणि बाबांना विनंती केली की, बाबा एवढ्या मध्यरात्रीच्या वेळेस या गावात दूध कोठून मिळणार? घरीपण दुध नाही. कारण माझ्या घरच्या म्हशी जगलात चरावयास गेल्या होत्या तेव्हा वासरुसुध्दा तिच्याबरोबर होते. त्या वासराने म्हशीचे संपूर्ण दुध पिऊन टाकले. म्हशी जेव्हा सायंकाळी जंगलातुन चरुन आल्यात तेव्हा मी दुध काढण्याकरिता गेलो असता म्हशीने एकही थेंब दूध दिले नाही. आता सांगा बाबा, मी दुधाचा चहा कसा पाजु? तेव्हा बाबा म्हणाले, मला माहित नाही की दूध कोठे मिळेल! तुम्ही दुध कोठुनही आणा आणि आम्हाला फक्त दुधाचा चहा पाजा. तो सेवक गवळी होता व साधारणतः ऐंशी वर्षाचा म्हातारा होता. तो बाबांना म्हणाला, बाबा या जंगलात जवळपास एकही गाव नाही आणि या गावात रात्री दूध मिळत नाही हा माझा आयुष्यभराचा अनुभव आहे. तेव्हा बाबा जुमदेवजी म्हणले, मला तुमचा अनुभव माहीत नाही. आणि त्याचे काही करावयाचेही नाही. आम्हाला दुधाचा चहा आताच पाहिजे. तेव्हा त्या सेवकाने बाबांना विनंती केली की, बाबा आपण मला मार्गदर्शन करा की मला दुध कोठून मिळेल?

महानत्यागी बाबा जुमदेवजी सर्वांना उद्देशुन म्हणाले, मी एका परमेश्वराची कृपा प्राप्त केलेली आहे. भगवंत दूध देईल. त्यानंतर त्या सेवकाला बाबा म्हणाले, ज्या म्हशीने एकही थेंब दूध दिले नाही त्याच म्हशीला समोर आणा आणि घरात जाऊन बाबा हनुमानजीच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती लावून कापूर लावा आणि विनंती करा की, बाबा हनुमानजी, महानत्यागी बाबा जुमदेवजींना दुधाचा चहा पाहिजे, तर बाबांकरिता दुध द्या. बाबांनी असे सांगितल्यावर त्या सेवकाने बाबांच्या आदेशाचे पालन केले आणि वर सांगितल्याप्रमाणे विनंती केली. त्यानंतर तो बाहेर आला. भगवंताचे नामस्मरण करुन त्याने म्हशीच्या पाठीवर जोरात थाप मारली आणि भांडे घेऊन तो म्हशीचे दूध काढू लागला. आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या म्हशीने दूध दिले नव्हते त्याच म्हशींचे दृध तो चर- चर करीत काढू लागला. त्या म्हशीने साधारणतः दोन लिटर दुध दिले. या मार्गातील सेवक नवरगावचे सरपंच श्री. वाघमारे हे त्या गवळ्याजवळ पाहावयास गेले असता त्याला दुधाने पूर्ण भरलेले भांडे दिसले. त्याने तो गंज आणून बाबांजवळ ठेवला तेव्हा सर्वजण ही भगवंताची लीला बघून अवाक झाले. त्यानंतर बाबा सेवकाला म्हणाले, या संपूर्ण दघाचा चहा बनवा. त्यात मुळीच पाणी टाकु नका आणि थेंबभर दुध शिल्लक ठेवू नका. त्याप्रमाणे त्या संपूर्ण दुधाचा चहा बनवुन तो सर्वांना दिला.

तो म्हातारा गवळी सेवक बाबांना म्हणाला की बाबा याच म्हशीप्रमाणे दुसरी म्हैस सुध्दा दुध देईल काय? त्यावर बाबांनी उत्तर दिले तुम्ही तुमचा अनुभव घेऊन पाहा. तुम्ही एकाच भगवंताचे मनापासून सेवक आहात आणि दिलेल्या तत्व, शब्द, नियमाने वागत असाल तर परमेश्वर नक्कीच यश देईल. परमेश्वर देतो पण मानवाचा परमेश्वरावर विश्वास नाही.

म्हणून बाबांनी तत्वात सांगितले आहे की, "इच्छा अनुसार भोजन" म्हणजेच मानवाने कोणतीही इच्छा परमेश्वराजवळ प्रगट केली तर तो, ती पूर्ण करतो. पण त्याकरिता एक लक्ष, एक चित्त, एक भगवान मानून सत्यकर्म करावयास हवे.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जिवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.



Monday, 18 May 2020

प्रकरण क्रमांक: (२३) "मोगरकसा तलाव"


                       "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
          'सुधारित पाचवी आवृत्ती'  प्रकरण क्रमांक (२३) 
                                  "मोगरकसा तलाव"

सत्ययुगातील गोष्टी आपण इतिहासात वाचतो. रामायणात असा उल्लेख आहे की, जेव्हा श्रीराम चौदा वर्षे वनवासाला गेले होते, तेव्हा भरताने श्रीरामाच्या पादुका राजसिंहासनावर ठेवून त्यांच्या नावाने राज्यकारभार सुरळीत चालविला होता. हेतू हा की, श्रीराम हा सत्य आचरण करणारा मर्यादा पुरूषोत्तम होता. तीच लक्षणे त्यांच्या पादुकांत होती. त्यामुळेच राज्यकारभार सुरळीत चालला. परंतु या कलियुगात सुद्धा पादुकांना तेवढेच महत्व आहे, महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या रूपात बाबा जुमदेवजी हे मोंगरकशा तलाव येथे गेले असतानाची ही घटना आहे. एक जोडनाव जी पाण्याने संपूर्ण भरून सुद्धा तलावात न डुबता तरंगत होती आणि त्यात असलेला सेवक जीवंत राहिला. हा एक परमेश्वराचा साक्षात्कार आहे.

       १९७८ सालातील एप्रिल महिन्याची गोष्ट महान त्यागी बाबा जुमदेवजींनी परमेश्वराबद्दल मानवाला जागविण्याकरिता नेहमीप्रमाणे सात सेवक घेऊन रामटेक तालुक्यातील काही गावांत दौरा काढला. १/४/१९७८ ला महानत्यागी बाबा जुमदेवजी नागपूरच्या आपल्या सेवकांसोबत नागपूर रामटेकवरून भंडारबोडी येथील परमात्मा एक सेवक दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेत पोहचले. तेथे बाबांचे भगवतकार्यावर मार्गदर्शन झाले. दुसऱ्या दिवशी दोन एप्रिलला बाबांनी सेवकांना, पाच बैलगाड्या बरोबर घेऊन कांद्री येथे दौरा केला. तेथे भगवतकार्याची चर्चा बैठक आणि बाबांचे मार्गदर्शन होऊन मुक्काम केला. तीन एप्रिलला पंचाळा येथे दौरा होऊन चार एप्रिलला मंगरली या गावात दौरा केला. या गावाच्या दौऱ्यात नागपूरसह लोहारा, कांद्री, सिवनी, भंडराबोडी, सालईमेटा, पंचाळा, मांडवी या गावांतील बरेच सेवक होते. मंगरली हे गाव घनदाट जंगलाच्या मध्यभागी वसलेले १५-२० घरांचे छोटेसे गाव आहे. या गावात या मार्गात आलेले दोन सेवक राहत होते. त्यांपैकी एक सेवक बाहेरगावी लग्नाला गेला होता म्हणून बाबांचा मुक्काम दुसऱ्या सेवकाकडे झाला. ज्या सेवकाकडे बाबा थांबले होते त्या ठिकाणी त्या सेवकाचा मामा पण थांबला होता तो म्हातारा होता. त्याला पंधरा दिवसांपासून सारखा ताप येत होता. या गावात भगवत कार्याची चर्चा बैठक होऊन बाबांनी मानवजागृतीवर सेवकांना मार्गदर्शन केले.

           चर्चाबैठकीच्या अगोदर तेथे या दौऱ्यात ज्या बायामंडळी आल्या होत्या त्यांनी संपूर्ण स्वयंपाक केला होता. चर्चाबैठक संपल्यावर भोजनाची तयारी झाली. सर्व सेवक आणि बाबा भोजनास बसले. सोबत आलेल्या बायांनी पंगती वाढल्यात. तो म्हातारा बाबांकडे आला आणि त्याने त्यांना नमस्कार केला. त्या पंगतीतच तो बाबांच्या आदेशानुसार जेवायला बसला. जेवण झाल्यावर तो बाबांजवळ पुन्हा आला आणि बाबांना नम्रपणे म्हणाला की, बाबा आपण धन्य आहात. मला पंधरा दिवसांपासून खूप ताप होता. त्यामुळे मी जेवलो नव्हतो. पण आपल्या आगमनाने आणि मार्गदर्शनाने माझा ताप नाहीसा झाला आणि आज मी पोटभर जेवलो. हा किती मोठा चमत्कार आहे की, बाबांच्या आगमनाने आणि मार्गदर्शनाने सेवकांनाच नव्हे तर इतरांना सुद्धा परमेश्वरी कृपेचा लाभ मिळतो आणि त्यांचे दुःख नाहीसे होते.

              जो सेवक बाहेरगावी लग्नाला गेला होता त्याचे नाव होते शेरकी. तो रात्री लग्नावरून परत आला. त्या रात्रीला मंगरली या गावातच मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच एप्रिलला शेरकी नावाच्या सेवकाने बाबा जुमदेवजींना विनंती केली की, बाबा येथून दहा मैलांवर मोंगरकशा नावाचा एक ऐतिहासिक तलाव आहे. त्याच्या चारही बाजूनी घनदाट जंगल आहे. फार सुंदर दृश्य आहे. आपण तेथे सर्वजण वनभोजनास चलावे. त्यावर बाबांनी संमती दिली. साधारणतः माणसे व बाया मिळून साठ सेवक हजर होते. सर्वांनी चहापाणी, नास्ता घेतला आणि सर्वजण वनभोजनास जाण्याची तयारी करू लागले. सामान घेऊन जाण्याकरिता बैलबंडिची आवश्यकता होती. तेव्हा सेवकाचा म्हातारा मामा म्हणाला, एक बंडी आहे. त्याचे बैल म्हातारे आहेत. त्यांतील एक बैल असा आहे की, तो मोंगरकशा तलाव संपल्यावर खाली बसला तर उठतच नाही . त्याच्या अंगावरून ट्रक गेला तरी तो उठत नाही. हे शब्द बाबांनी ऐकले . तेव्हा बाबा म्हणाले , बंडीला त्या बैलालाच जुपा काय होईल ते परमेश्वर करील आणि लवकर वनभोजनास चला. सर्व सेवक तयार झाले सामानाकरिता एक बैलबंडी आणि सेवकांकरिता खाचर तयार केले ज्या बंडीत जास्त साहीत्य होते , तेथे पाच-सहा सेवक बसले होते आणि त्याच बंडीला तो बैल जुंपला होता. ती बंडी नागपूरचा एक सेवक श्री. जगन्नाथजी सोनकुसरे चालवत होता. तो म्हातारा पण बाबांबरोबर वनभोजनास आला. जाताना तो समोरच्या खचरामध्ये बसला होता आणि बंडी मागे होती. त्याला सारखी भीती वाटत होती की , बैल चालता चालता खाली बसतो काय ? म्हणून तो सारखा मागे वळून पाहत होता. परंतु त्याला तो बैल चालताना दिसत होता . किंबहुना तो बैल त्याच्या जोडीला बैलाचे मानाने धावत होता. संपुर्ण प्रवासात तो बैल एकदाही खाली बसला नाही. त्यामुळे या बसक्या बैलाचे त्या म्हाताऱ्याला आश्चर्यच वाटत होते. बाबा आणि सर्व सेवक मोंगरकशा तलावापाशी पोहचले. हा तलाव भंडारा जिल्ह्यात आहे. चांगलीशी जागा पाहून झाडाच्या सावलीत सर्व सामान उतरविले. तेथे स्वयंपाकाकरिता काळया दगडांची जमवाजमव केली. चूल तयार केली. दौऱ्यावर आलेल्या काही बाया मंडळी तलावावरून अंघोळ करून आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करू लागल्या. बायांना बाबांनी सांगितले की तुम्ही या बाजूला आंघोळ करून या ती पूर्व दिशा होती. आणि पुरूष मंडळी तो डोंगा दिसतो तेथे म्हणजे त्या दिशेच्या विरूध्द दिशेला, पश्चिमेला आंघोळ करायला जातील मुक्काम दक्षिण दिशेला होता. स्वयंपाकाला सुरूवात झाल्यावर बाबा सर्व सेवकांना (पुरूष) म्हणाले की , चारपाच सेवक येथे थांबा आणि बाकीचे सर्व आंघोळ करायला चला. त्याचप्रमाणे सर्व सेवक बाबांसोबत डोंगा असलेल्या बाजूला, पश्चिमेला आंघोळ करायला निघाले तेथे पोहचल्यावर काही सेवकांना पोहणे माहीत असल्यामुळे त्यांनी पोहण्यासाठी बाबांची परवानगी मिळण्यासाठी त्यांना विनंती केली तेव्हा तेथे वनखात्याचा चौकीदार होता. त्याने त्यांना पोहायला  जाऊ नये यासाठी विनंती केली. कारण तलावात सुरूवातीलाच दोन हत्ती, पुढे तीन हत्ती आणि मध्यभागी चार हत्ती पाणी आहे संपूर्ण तलावात खूप जाळे आहे त्यामुळे येथे कोणीही कोळी मासोळी पकडायला आत जात नाही, कारण जाळ्यात पाय अडकले तरी तो वर येत नाही आणि बुडून त्याचा अंत होतो, असे तो म्हणाला. त्यावर बाबांनी काठाजवळ पोहायला परवानगी दिली. त्यानंतर सेवक लोक पोहू लागले. बाजूलाच एक जोडनाव होती. तेव्हा एका सेवकाने ती जोडानांव पाण्यात नेण्याकरिता विनंती केली. तेव्हा बाबा म्हणाले, जर नाव चालवता येत असेल तरच घेऊन जा. त्याप्रमाणे ती नाव बाबांच्या परवानगीने तिची दोरी सोडून आत नेण्यात आली. त्यांत पाच-सहा सेवक होते त्यावेळेस बाबा किनाऱ्यावर बसूनच आंघोळ करणार होते. म्हणून ते सेवकांना म्हणाले की, मी नावेत येत नाही. नाव थोडी दूर पाण्यात गेल्यावर ज्या सेवकांना पोहता येत होते त्यांनी पटापट नावेतून पाण्यात उड्या मारल्या. त्यानंतर तेथे श्री. मोतीरामजी हरडे (दिवानजी) नावाचे एकच सेवक उरले होते. कारण त्यांना पोहता येत नव्हते. दिवानजीला वाटले की, आपण आता नाव चालवू ते नावेच्या डाव्या भागाला उभे होते. म्हणून त्यांनी वल्हे उचलले आणि त्यांच्या उजव्या भागाला ते वल्हे पाण्यात टाकले. वल्हे पाण्यात घेतल्यामुळे आणि त्याला खालच्या बाजूला आधार न मिळाल्यामुळे दिवानजी उजव्या नावेत पडले हे दृश्य बाबा आंघोळ करता करता पाहत होते तेव्हा बाबा म्हणाले दिवानजी तुम्हाला नाव चालवता येत नाही तर नावेत कशाला गेलात बाबांना वाटले हे पाण्यात बुडतील म्हणून त्यांनी गडीरामजी डोनारकर या सेवकाला विचारले की , तुला पोहता येते काय ? त्याने होकार दिल्याबरोबर बाबांनी त्याला आदेश दिला की, तुम्ही पोहत जा आणि त्या नावेची दोरी ओढून किनाऱ्यावर आणा आणि बांधून ठेवा. त्याप्रमाणे त्यांनी ती नाव आणून किनाऱ्यावर बांधून ठेवली. बाबांची आंघोळ आटोपल्यावर बाबा सर्व सेवकांना म्हणाले की, तुम्ही सर्वजण लवकर आंघोळ करून भोजनास या तोपर्यंत मी मुक्कामाच्या ठिकाणी जातो आहे. त्याप्रमाणे बाबा जायला निघाले. त्यावेळेस ते पायात पादुका घालावयास विसरले होते त्या तलावाच्या काठावरच राहिल्या होत्या .

बाबा तेथून गेल्यामुळे काही सेवकांनी बांधून ठेवलेल्या नावेची दोरी सोडली. काही सेवक नावेत बसून कपडे धुऊ लागले. लोहारा या गावचा सेवक श्री. शामरावजी कार याने त्या नावेला जोराने लाथ मारली. त्यामुळे ती नाव खोल पाण्यात गेली आणि उकडे कारचा पाय चिरला गेला. श्री. श्रीराम भंडारबोडीवाला हे पुन्हा पोहत पोहत त्या नावेपर्यंत गेले आणि नावेला पकडून ते नावेत चढतांना ती नाव एका बाजुला वाकली. त्याबरोबर नावेत असणारे लोक पाण्यात भडाभड पडले. नाव जेव्हा सरळ झाली तेव्हा त्या जोडानावेत संपूर्ण पाणी भरले होते. काठावर असलेले १५-२० सेवक जोराने ओरडू लागले की नाव पाण्यात बुडाली, हा आवाज स्वयंपाक करणाऱ्या  बायांपर्यंत पोहचला. तेथे धर्मपुरी या गावची सौ. चंद्रभागाबाई ही सेविका होती. ती जोराने म्हणाली, बाबा असतांना नाव बुडू शकत नाही. त्या बाईला बाबांच्या कृपेबद्दल किती आत्मविश्वास होता हे दिसून येते. बाबा तेव्हा तीनचारशे पावले चालत आले होते. त्यांच्याही कानावर ओरडण्याचा आवाज आला. त्याचक्षणी त्यांच्या पायाला खडे रूतू लागले. तेव्हा बाबांच्या लक्षात आले की, आपण पायात पादुका घातल्या नाहीत, आणि त्या आपण तलावाच्या काठावरच विसरलो आहोत. बाबांनी मनात विचार केला की भगवंता, काय केले या सेवकांनी ? बाबांच्या शब्दांवर अंमल न केल्यामुळे या सेवकांवर हा प्रसंग ओढवला होता. परंतु बाबांच्या ऐवजी त्यांच्या पादुका तेथे असल्यामुळे त्यावर मात झाली होती.

     बाबा पादुका घालण्याकरिता परत तलावाच्या काठावर आले आणि तलावावरील दृश्य त्यांनी पाहिले तेव्हा नागपूरचे सेवक श्री. लक्ष्मणरावजी उराडे हे एकटेच त्या जोडनावेत दोन भागात पाय देऊन उभे आहेत संपूर्ण नाव पाण्याने भरलेली आहे तरी ती पाण्यात तरंगत आहे असे दिसले. बाबांच्या बाजूला काही सेवक उभे होते. त्यांना म्हणाले, हे तुम्ही काय केले ? तुम्हा सेवकांना बाबा सांगूनही तुम्ही बाबांचे ऐकत नाही आणि असे प्रसंग तुम्ही बाबांना दाखवता. तेव्हा त्या सेवकांनी बाबांना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर बाबांना संपूर्ण चौकशी केली , किती सेवक नावेत होते ? किती सेवक पोहून बाहेर निघाले? आणि किती आत बुडाले ? चौकशी अंती त्यांना कळले की सर्वजण बाहेर निघाले, पण गोपीचंद तुपट या सेवकाला पोहता येत नव्हते. म्हणून तो आतच आहे. त्याला काढण्याकरिता संपत शेरकी पाण्यात गेला. संपत शेरकीने गोपीचंदला काठावर आणले. बाबांच्या बाजूला मादरी या गावाचा कचरू नावाचा सेवक उभा होता. त्याला बाबांनी विचारले, "तुला पोहता येते काय?" त्याने होय म्हटल्याबरोबर त्याला बाबांनी आदेश दिला की, पाण्याने भरलेल्या नावेची दोरी धरून काठावर आण. त्याप्रमाणे बाबांच्या आदेशाचे पालन करून त्याने त्या नावेला पोहत जाऊन काठावर आणले. त्याबरोबर श्री. उराडे हेही काठावर आले. सर्वजण बाहेर निघाल्यावर बाबांनी त्यांना विचारले की, हे कसे काय घडले? त्यावर त्यांनी खालील माहिती सविस्तरपणे सांगितली. 

         प्रथम उराडे साहेब म्हणाले, नावेने कलाटणी घेतल्याबरोबर मी नावेला घट्ट धरून ठेवले. नावेत संपूर्ण पाणी भरल्यावर ती सरळ झाली आणि मी उभा झालो. विचार केला की, मला पोहता येत नाही म्हणून उडी मारू शकत नाही. नावेत संपूर्ण पाणी भरल्यामुळे ती नाव बुडणार म्हणजे दोन्ही क्रियांत मी मरणारच आहे. जीवंत राहू शकत नाही. तेव्हा मी भगवंताला प्रार्थना केली आणि म्हटले, "मरे या जिये भगवत नामपर! बाबा हनुमानजी आप मुझे मारो, या तारो मैं आपके शरणमें हुँ। अशी याचना करीत होतो. “देव तरी त्याला कोण मारी" या म्हणीप्रमाणे खरोखरच भगवंताने श्री. उराडे यांना जीवदान दिले. नाव संपूर्ण पाण्याने भरून सुध्दा बुडाली नाही. ती पाण्यात तरंगत राहिली. म्हणजेच भगवंताने त्या नावेला खालून टेका दिला होता हे सिध्द होते आणि हा किती मोठा साक्षात्कार आहे की नावेत पाणी भरून सुध्दा ती बुडाली नाही. धन्य आहे तू भगवंता! नाव काठावर आणली असता बादलीने त्या नावेतून पाणी काढले आणि दोरीने ती काठावर बांधून ठेवली. 

         दुसऱ्या घटनेत श्री. संपत शेरकी सांगतात की, गोपीचंद ज्या भागातील पाण्यात पडला होता त्याच भागात तो पण पडला आणि त्याला वर आणण्याचे प्रयत्न केले. परंतु गोपीचंदने संपतला पाण्यातच एकदम मिठी मारली. त्यामुळे त्याच्या पोहण्यात अडथळा निर्माण झाला आणि त्याला हात फेकणे अशक्य झाले.  तेव्हा त्याच्या मनात आले की, मी आता बुडणार आणि हाही बुडणार म्हणून संपतने भगवंताला प्रार्थना केली, भगवान बाबा हनुमानजी आपण मला या प्रसंगातून वाचवा. मी आता मरतो आहे तेव्हा परमेश्वराने त्याच्यावरही कृपा केली. त्याने भगवंताला विनंती केल्याबरोबर गोपीचंदचा हात सुटला. लगेचच त्याने आपले दोन्ही हात पाण्यात मारले व तो वर आला. हात पाण्यावर मारल्याबरोबर संपतच्या हातात गोपीचंदचे धोतर आले. तो धोतर धरून पोहत पोहत काठावर आला आणि त्याने गोपीचंदला आपल्याबरोबर ओढत काठावर आणले. अशाप्रकारे सर्वजण तलावाच्या बाहेर जीवंत सुखरूप निघाले. धन्य तो परमेश्वर !  त्या ठिकाणी बाबांच्या पादुकांच्या रूपात परमेश्वर उभा होता आणि त्याने या सर्व सेवकांची त्या वाईट प्रसंगातून मुक्तता केली. त्यानंतर सर्वांनी भगवान बाबा हनुमानजी की जय ! समर्थ बाबा जुमदेवजीकी जय ! परमात्मा एक ! सत्य, मर्यादा प्रेम कायम करनेवाले, अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले मानव धर्म की जय ! असा हर्षकल्लोळात जयघोष केला. 

          वनखात्याच्या चौकीदार हाही त्या वेळेस तेथे हजर होता. तो म्हणाला, या तलावात जो उडी मारतो तो वर येत नाही. तो मरतोच पण तुम्ही सर्वजण सहीसलामत कसे वर आलात ? हे तुमचे गुरू तुमच्याबरोबर असल्यामुळेच त्यांचाच महिमा आहे. येथे कोळी मासोळी धरत नाहीत. ते घाबरतात पण तुमची हिंमत आणि तुमच्या गुरूने दिलेली परवानगी यामुळे खरोखरच भगवंत तुमच्याजवळ आहे हे सिध्द होते. 

          त्यानंतर सर्वजण भोजनाच्या ठिकाणी आले. सर्वांनी भरपूर भोजन केले. सर्वांच्या आनंदाला पारावर नव्हता. सर्वजण बाबांना म्हणाले "बाबा आज या प्रसंगातून वाचलो नसतो तर काय झाले असते? केवढा मोठा प्रसंग ओढवला होता आणि सर्व सेवक बाबांसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर त्या सर्वांनी बाबांना शब्द दिला की , हा प्रसंग बाबांचे न ऐकल्यामुळे, त्यांच्या शब्दाचा अनादर केल्यामुळे ओढवला. यापुढे बाबांचे शब्द नेहमी अंमलात आणू असे सत्य वचन त्या सर्वांनी दिल. बाबांनी त्या सर्वांना क्षमा केली. जेवण आटोपल्यावर सामानाची आवरा-आवर करून मंगरली या गावात सायंकाळी सर्व सेवक सुखरूपपणे परत आले वरील प्रसंगावरून हे सिध्द होते की , बाबांच्या रूपात परमेश्वर नेहमी सर्वत्र असतो. सर्व सेवकांनी त्यांच्या शब्दांचा आदर करायला पाहिजे. परमेश्वर बाबांच्या पादुकाच्या रूपातही हजर असतो. बाबा परमेश्वराचे रूप आहे हे "बसका बैलं" म्हणजे जनावराने देखील ओळखले.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जीवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Sunday, 17 May 2020

प्रकरण क्रमांक: २२ "आत्मप्रचिती"


                       "मानवधर्म परिचय पुस्तक"  (मराठी)
                'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२२) 
   
                                  "आत्मप्रचीती"

एके दिवशी महानत्यागी बाबा जुमदेवजी नेहमीप्रमाणे काही सेवकांना बरोबर घेऊन मानव जागृती विषयी मार्गदर्शन करण्याकरिता रामटेक तालुक्यातील भंडारबोडी या गावी दौऱ्यावर गेले होते. ते परमात्मा एक सेवक सहकारी दुग्ध उत्पादक संस्था, भंडारबोडी येथे निवासाला थांबले होते. ही संस्था बाबांच्याच मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली आहे. हे दौऱ्याचे दिवस भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षाचे होते. या कृष्णपक्षास पितृपक्ष असेही म्हणतात. हिंदु धर्मातील लोक या पितृपक्षामध्ये त्यांच्या कुटुंबात मरण पावलेल्या लोकांचे त्या तिथीला श्राध्द करतात. त्यामुळे या पक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. 

भगवतकार्याची चर्चाबैठक आटोपल्यावर बाबांनी त्या ठिकाणी मुक्कात केला. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आंघोळ वगैरे आटोपून त्या संस्थेच्या प्रांगणात एकटेच बसले होते. त्यावेळेस त्यांना एकाएकी आठवण झाली की , सध्या श्राध्दपक्ष सुरू आहे आणि आज त्यांच्या वडिलांचा मुक्तिदिवस आहे. तेव्हा ते स्वतःच मनाशी विचार करू लागले की, आजच्या तिथीला त्यांच्या वडिलांना देवाज्ञा होऊन या मृत्युलोकांतुन मुक्ती मिळाली होती. ते या पृथ्वीतलाला (जगाला) सोडून गेले होते. ते मनाशीच बोलले, जर मी स्वतःच्या घरी नागपूरला असतो तर वडिलांच्या नावावर दिवसभर उपवास केला असता आणि सायंकाळी भगवान बाबा हनुमानजीला नैवेद्य दाखवून एकदाच जेवण घेतले असते . पण आता तसे करणे शक्य नाही. या विचारात ते चिंतामग्न झाले आणि या विचारतच देहभान विसरले. ते नकारात आले. त्यांच्या अंतरात्म्यातून खालील संवाद बाहेर पडलेत ? जे त्यांनी त्यांच्याच कर्णाव्दारे ऐकले.

त्यांच्या अंतरात्म्यातून आवाज निघला की, "सेवक, तू पागल हो गया। किस बातकी तू चिंता कर रहा है। तेव्हा महानत्यागी बाबा जुमदेवजी भगवान बाबा हनुमानजीला म्हणाले, "बाबा, आज मेरे पिताजी का मुक्ति का दिन है। अगर मैं अपने घरपर होता तो उनकी याद में एकही समय भोजन करता। लेकिन मैं बाहर गांव में हूँ। मैं कुछ भी नही कर सकता"। बाबाचे हे शब्द ऐकून भगवान बाबा हनुमानजी महानत्यागी बाबा जुमदेवजीला म्हणाले , "हे सेवक सुन, तेरे पिताका शरीर और मेरा आत्मा एक है। तू एक भगवान को मानता है, इसलिए तेरे पिता मरने के बाद वह आत्मा तेरे पिताका शरीर छोड़कर मुझमे विलीन हो गया, और तूने तेरे पिताका शरीर जलाकर राख कर दिया। अब बोल सेवक, तू राखकी पूजा करता है या मेरी। भगवंताचे हे शब्द ऐकून महानत्यागी बाबा जुमदेवजी म्हणाले, भगवान आजसे मेरे मन का शुद्धिकरण हुआ। में इस तरह के पुराने विचार मेरे दिल मे कभी नही लाऊंगा और भगवान , मैं तेरी ही पूजा हमेशा करूँगा असे बाबांनी भगवंताला सत्य वचन दिले.

 अशा प्रकारे भगवंताने (बाबा हनुमानजीने) महानत्यागी बाबा जुमदेवजींना आत्मप्रचीती दिली. तेव्हापासून बाबांनी सेवकांना मुत्यु झालेल्या लोकांची पूजा करणे बंद करायला लावले .

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
जीवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.




Saturday, 16 May 2020

प्रकरण क्रमांक: (२१) "अभाग्यास भाग्यप्राप्ती"



                        "मानवधर्म परिचय पुस्तक"  (मराठी)
                 'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२१) 
   
                            "अभ्याग्यास भाग्यप्राप्ती"

महानत्यागी बाबा जुमदेवजींनी प्राप्त केलेल्या परमेश्वरी कृपेचा लाभ अनेक सेवकांनी त्यांची नानातऱ्हेची दुःखे नष्ट करण्याकरिता घेतला. शारीरिक दुःखबरोबरच त्यांचे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दु:खही दूर झाले याशिवाय अनेकांना नानातऱ्हेचे योग प्राप्त झाले आहेत. बाबा स्वयम् परमेश्वरात विलीन झालेले आहेत. त्यांच्या मुखकमलातून जे शब्द निघतात त्याचप्रमाणे प्रत्येकाला योग मिळतो आणि आपले भाग्य बनविता येते. अशाच एका अभाग्याने आपले भाग्य या मार्गात येऊन बनविले आहे. त्या अभाग्याचे नाव आहे श्री हरिभाऊ कुंभारे.

श्री हरिभाऊ कुंभारे हे जुनी मंगळवारी, नागपूर येथे राहतात. त्यांना दोन पत्नी आहेत. त्यांचे दुर्भाग्य की त्यांचे पहिले लग्न झाल्यावर पुत्रप्राप्ती न झाल्यामुळे त्यांनी दुसरे लग्न केले, पण तेथेही ते अपयशी ठरले. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी खूप प्रयत्न केलेत, पण योग आला नाही. हा कर्मभोगाचा भाग आहे. तेव्हा ते कुटुंबासह महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्याकडे आलेत आणि प्रार्थना करू लागले. तेव्हा बाबांनी त्याना सांगितले, तुम्ही अभागी आहात. तुम्हाला आमच्या मानव धर्माचा स्वीकार करावा लागेल. तरच तुमचे भाग्य उदयास येईल. त्यावर हरिभाऊंनी बाबांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. बाबांनी संपूर्ण मार्गदर्शन करून अनेक देवांची पूजा बंद करून एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानावे लागेल, तसेच कुटुंबात सत्य, मर्यादा, प्रेमाने वागावे लागेल हे सांगून त्यांच्याकडून तसे वचन घेतले. त्यांनी या मार्गात येण्याकरिता करावी लागणारी ४१ दिवसांची साधना सुरू केली. ती साधना पूर्ण करताना त्या काळात पाळावयास काही अटी दिल्यात. साधना पूर्ण झाल्यावर ४२ व्या दिवशी कार्याची समाप्ती करून हवनकार्य थाटामाटात पार पडले. आणि ४३ व्या दिवसापासून बाबा हनुमानजीच्या नावाने ते माळ जपू लागले.

साधारणतः चार वर्षांनंतर बाबा हनुमानजींनी त्यांच्या स्वप्नात एक साक्षात्कार दखविला. त्यांना स्वप्नात दिसले की, एक छोटासा बाळ साधारणता सात आठ महिन्याचा असलेला रांगत आला आणि त्यांच्या पत्नीचे दूध पिऊन अंगणात खेळावयास गेला. हरिभाऊनी ही घटना बाबांना समजावून सांगितली. तेव्हा बाबा जुमदेवजीनी सागितले, परमेश्वराला पुढे काय घडवायचे आहे ते तुम्ही पाहा. 

सौ. वत्सलाबाई सदावर्ती ही गोळीबार चौक नागपूर येथे राहते. ती हरिभाऊंची धाकटी बहीण आहे. तिला मुले होत होती पण ती जन्माला आल्यानंतर थोड्यात वेळाने परमेश्वराला प्रिय होत होती. अशारीतीने तीन मुले मरण पावल्यामुळे त्यांनी मुले जाऊ नयेत म्हणून प्रयत्न केलेत पण दुख दूर झाले नाही. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेल्या मानव धर्माचे पहिले सेवक श्री. गंगारामजी रंभाड हे तिच्या घराजवळ राहत होते. ती त्यांच्या घरी आली आणि आपली हकीकत तिने त्यांना सांगितली. या मार्गाबद्दल तिला थोडीफार माहिती होती. तेव्हा त्या सेवकाने तिला बाबा हनुमानजीच्या फोटोजवळ अगरबत्ती लावून त्याला आपली मनोकामना सांगायला लावले. पुढे परमेश्वर काय घडवतो ते पाहा असे ते म्हणाले. त्याप्रमाणे तिने कार्य केले. 

"भगवान के पास देर है, अंधेर नही" या म्हणीप्रमाणे त्या बाईची मनोकामना पूर्ण झाली. तिला पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा कसलाही त्रास न होता झालेत. ती तिसऱ्यांदा गरोदर राहिली, परंतु या वेळेस तिला गरोदर असताना खूप त्रास होत होता. तिने डागा मेमोरिअल हॉस्पीटलमध्ये जाऊन औषधोपचार केलेत. पण तेथेही त्रास नाहीसा झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्रास वाढतच गेला. एकवेळ अशी आली की, तिने आत्महत्या करण्याचा विचार केला. परंतु दोन अपत्ये पोरकी होणार हा ही विचार तिच्या मनात आला. असा विचार करीत असताना पुन्हा बाबा हनुमानजींची आठवण झाली आणि एके दिवशी सकाळीच ती बाई आंघोळ करून महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या निवासस्थानी बाबांना भेटावयास गेली. त्यावेळेस बाबा घरी नव्हते. म्हणून ती बाई बाबा हनुमानजींच्या फोटोसमोर बसली आणि अगरबत्ती लावून तिने भगवंताला विनंती केली की भगवंता या गरोदरपणात मला खूप त्रास होत आहे. मला या दुःखातून मुक्त करा. मला जे अपत्य होईल ते तुझ्या चरणी वाहून देईन. यावेळी ती या मार्गाची सेविका होती. तिचे दुख नाहीसे झाले, यावेळेस ती सात महिन्यांची गरोदर होती. तिने भगवंताला अशी विनंती केली ती तिने घरी कोणालाही सांगितली नाही. 

वत्सलाबाईंची मनोकामना पूर्ण झाली. परमेश्वराने तिचे शब्द ऐकून तिला त्रासातून मुक्त केले. कारण महानत्यागी बाबा जुमदेवजींनी जी एका भगवंताची प्राप्ती केली आहे ती परमेश्वरी कृपा जागृत आहे. नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिने एका छानशा गोंडस मुलाला जन्म दिला. दिवसेंदिवस वाढत वाढत तो आठ महिन्यांचा झाला. एक दिवस रांगत असताना पायरीवरून तो खाली पडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली.  खूप औषधोपचार केले पण दुःख होत नव्हते. तेव्हा वत्सलाबाईने आपल्या घरातील लोकांना सांगितले की हा मुलगा मी भगवंताला वाहून देईन असे त्यांना वचन दिले आहे. हा मुलगा आपला नाही. तो भगवंताचा आहे. म्हणून त्याचे दुःख दूर होत नाही. म्हणून त्याला भगवंताच्या चरणी अर्पण करणे हाच एक उपाय आहे. तेव्हाच त्याचे दुःख दूर होईल. तेव्हा घरच्या लोकांनी तिला अडविले. ते तिला म्हणाले , भगवंताला शब्द दिला म्हणून काय पोटच्या गोळ्याला असे वाहून देतात काय ?  परंतु त्या बाईचा निर्धार पक्का होता.  तिला नक्की माहीत होते की, वाहून दिल्याशिवाय दुःख दूर होणार नाही. तिने घरच्या लोकांना बजावून सांगितले की मी बाबा जुमदेवजींकडे जाते आणि सर्व हकीकत सांगते. ते ज्याप्रमाणे मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे मी पुढील कार्य करीन. 

सौ . वत्सलाबाई त्या मुलाला घेऊन बाबा जुमदेवजींच्या निवासस्थानी आली. बाबांना संपूर्ण हकीकत तिने सांगितली आणि परमेश्वराला दिलेले वचन तिने पूर्ण केले नाही याची चूक कबूल केली. बाबांनी शांतपणे तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि बाबांनी तिला मार्गदर्शन केले की, बाई हा मुलगा तुझा नाही. तुला असे वचन देण्यास कोणी सांगितले ? ती उत्तरली, बाबा मला खूप कष्ट होत होते. मी ते सहन करू शकत नव्हते. मला कोणीही सांगितले नाही. मी स्वतःच भगवंताला अंतःकरणाला दुःख दूर होण्याकरिता वचन दिले. तेव्हा बाबा म्हणाले, ठीक आहे. तू भगवंताला मुलगा वाहून दे. बाई म्हणाली, बाबा आपण म्हणाल त्या दिवशी मुलगा वाहून देईन. त्यावेळी बाबांनी तिला अट घातली की मी मुलगा दान घेईन पण दोन्ही डोळ्यांत अश्रुंचा एकही थेंब न आणता हसतमुखाने दान द्यावे लागेल. अश्रूचा एक थेंब जरी डोळ्यात दिसला तर मी दान घेणार नाही. त्याप्रमाणे बाईने अट मंजूर केली आणि त्यांनी तिला तिसर्या दिवशी सायंकाळी त्या मुलाला घेऊन येण्यास सांगितले. ठरलेला दिवस शनिवार होता. त्या दिवशी १९७० सालची जानेवारी महिन्याची तीन तारीख होती. ठरलेला दिवस उजाडला बाबांनी एका सेवकातर्फ २०, ३० सेवक आणि श्री. हरिभाऊ कुंभारे यांना सहकुटुंब बोलावून घेतले सायंकाळी ७ वाजता सर्व हजर झाले सौ. वत्सलाबाई सदावर्ती ही पण आपल्या आठ महिन्यांच्या मुलाला घेऊन वेळेवर आली. भगवंताला सर्वांनी एकतेने प्रणाम केला आणि आनंदाच्या सोहळयात सुरूवात झाली.

 सौ. वत्सलाबाई आपल्या मुलाला भगवान बाबा हनुमाजीच्या प्रतिमेसमोर झोपवले अगरबत्ती लावली, कापूर लावला आणि भगवान बाबा हनुमानजीला विनंती केली की, बाबा हनुमानजी मी आपणास वचन दिल्याप्रमाणे आज मुलाला वाहून देत आहे . हा माझा मुलगा नसून तो तुमचा आहे त्याला आपण स्वीकारावे. असे म्हणून तिने मुलाला वाहून दिले. कापूर विझाल्यावर तिने त्या मुलाला उचलेले आणि बाबा जुमदेवजींसमोर ती उभी झाली. बाबा सारखे तिच्या डोळ्यांकडे बघत होते. त्या बाईने हसतमुखाने त्या मुलाला बाबा जुमदेवजींना दान दिले तिच्या डोळयात अचूंचा एक थंबही आला नाही. त्याचवेळी बाबांनी त्या मुलाला घेऊन श्री हरिभाऊ कुभांरे यांना समोर बोलावून त्या अभाग्याला तो दान दिला. परमेश्वरी लीला अगाध आहे त्याला जे घडवायचे होते, ते त्यांनी घडामोडी करून घडविले.

 आश्चर्याची गोष्ट अशी की , ज्यावेळी हरिभाऊंनी मुलाला आपल्या हातात घेतले त्याचवेळी त्यांनी तो मुलगा आपल्या लहान पत्नीजवळ दिला आणि साक्षात्कार घडला की , त्या बाईने मुलाला हातात घेताच तिच्या स्तनातून दूध बाहेर येऊ लागले . हे तेथे जमलेल्या सेवकांनी पाहिले आणि वत्सलाबाई चे दूध आटले गेले ही भगवंताची लीला पाहून सर्व सेवक आश्चर्यचकित झाले आणि म्हणून बाबांनी प्राप्त केलेल्या एका परमेश्वराची कृपा जागृत आहे विशेष सांगायचे म्हटल्यास या दान दिलेल्या मुलाचा चेहरा वत्सलाबाईच्या दोन मुलांच्या चेहच्यापेक्षा वेगळा आहे . वत्सलाबाईची दोन मुले तिच्या चेहऱ्यावर असून हा तिसरा मुलगा हरिभाऊंच्या चेहऱ्यावर आहे धन्य तो परमेश्वर.

अशाप्रकारे बाबांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या सेवकांची इच्छा परिपूर्ण होऊन त्याला त्याच्या जीवनात समाधान लाभते . परंतु त्याकरिता एक परमेश्वराला समोर ठेवून मानवतेचे कार्य केले पाहिजे म्हणजे या कलियुगात सुद्धा सत्ययुगाचा लवलेश आहे हे वरील गोष्टीवरून सिद्ध होते . अशाप्रकारे या मार्गात अभाग्यास भाग्य लाभते हे सिद्ध झाले आहे .

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
जीवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.