Followers

Saturday, 16 May 2020

【"जुने विचार बंद करणे"】


                            【"माझा अनुभव"】
अनुभव क्रमांक: १८०  प्रकाशित दिनांक: २० नोव्हेंबर २०१६

                        【"जुने विचार बंद करणे"】

माझे नाव दिनेश जुमळे आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा तिसरा अनुभव 'मार्गात आल्यानंतरचा दैवी शक्तीचा अनुभव' सादर करीत आहे.

आमच्या घरात असलेल्या एका कुत्र्यामुळे (रजत) आलेला अनुभव सांगत आहे. जसे आपण पूर्ण कुटुंब एकत्रित राहतो. तसेच, आपल्यासोबत असणारा आपला एक सगळ्यांना आवडणारा प्राणी जो आपल्या घराची वेळोवेळी रक्षण करतो तो म्हणजे आपल्या घरातील कुत्रा. ही गोष्ट आहे सन २०११ ची माझ्या बाबांनी घरी एक कुत्रा आणला होता. त्याचे नाव आम्ही रजत असे ठेवलेले होते. तो सगळ्यांचा आवडता होता तो लहान असल्यामुळे घरातील मंडळी त्याचा खूप लाड करत असे, पण काही दिवसांनी रजत बद्दल परिसरातून तक्रारी येऊ लागल्या की, तो परिसरात कोंबड्यांचा मागे धावतो व तो त्यांना खाऊ शकतो अश्या प्रकारच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्यामुळे बाबा त्या गोष्टीला कंटाळले व त्यांनी विचार केला कि, याला कुठे तरी दूर नेऊन सोडायचे. पण बाबाचे मन काही केल्या मानत नव्हते. कारण, तो सगळ्यांचा लाडका होता आणि आमच्या घरातील एक सदस्य पण.

तरीपण काय करणार लोकांच्या तक्रारी खूप वाढलेल्या होत्या. त्यामुळे बाबांनी कंटाळून त्याला आमच्या गावाजवळील १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मांढळ या गावाजवळ नेऊन सोडले होते. ती गोष्ट मला पण माहिती नव्हती. कारण, तेव्हा मी कुही येथे राहत होतो. त्याला बाबांनी कुठेतरी नेऊन सोडले त्या गोष्टीचे मला खूप दु:ख झाले. कारण, तो माझा खूप आवडता कुत्रा (रजत) होता.
मी कधीही गावाला गेलो असता तो माझ्या नेहमीच अंगावर खेळायचा माझ्यावर जोरजोरात भुंकायचा. तेव्हा मी अवधूत डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज, कुही येथे पोलिटेक्निक करत असल्यामुळे, कुही येथे मी माझ्या मोठ्या वडिलांच्या मुला सोबत रूम करून राहत होतो. 

ते पण कुही येथे श्री सद्गुरू दत्त डिप्लोमा कॉलेज फार्मसी, कुही येथे डी-फार्म ला शिकवत होते. त्याच बरोबर सकाळ-सायंकाळ शिकवणी वर्ग पण घ्यायचे त्याकरिता आम्ही तिथेच राहत होतो. रजतला (कुत्रा) कुठेतरी नेऊन सोडले व मला माहिती नव्हते तर मला दुसऱ्या दिवशी अचानक माझ्या लहान भावाचा नरेशचा फोन आला कि बाबांनी आपल्या कुत्र्याला (रजत) ला कुठेतरी नेऊन सोडले. तेव्हा खूप वाईट वाटले. मला रडायला पण येत होते कारण, तो माझा खूप आवडता होता. माझ्या बाबानापण खूप पश्चाताप होत होता, त्यांनी पेपर मध्ये तो हरवलेला आहे म्हणून त्याची जाहिरात देऊ अशी तयारी दर्शवलेली होती.

मी पण भगवंताला माझा कुत्रा (रजत) मिळू द्या अशी विनंती रोज करत होतो आणि मला रडायला पण येत होते. कारण, एखाद्या मुक्या प्राण्याची भावना व्यथा कोणाला समजून येणार? कारण, तो मुका प्राणी आहे. मी मग मनात पक्का विचार केला कि, मी आपल्या कुत्र्याला (रजत) ला काहीपण करून शोधून काढणार. व मी आपल्या मोठ्या वडिलांच्या मुलाची (गणेश) ची मोटारसायकल घेऊन मांढळ तसेच आजूबाजूच्या गावात शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तो मला मिळाला नाही.

मग मी बाबा हनुमानजी समोर शब्द ठेवला कि, माझा कुत्रा (रजत) मला मिळू द्या. मी एक पाव पेढ्याचा प्रसाद वाटणार. मग मी चापेगडी येथिल माझ्या गावाला गेलो.

तिथून पण साईकल ने मी त्याची दोन ते तीन दिवस शोधमोहीम सुरु केली पण काही केल्या तो मला मिळाला नाही आणि माझ्या कडे दुसरा पर्याय पण नव्हता. मी एके दिवशी जेवण करत असताना माझ्या मित्राचा मला फोन आला कि तुझा कुत्रा (रजत) मिळाला आहे आणि तो मांढळ कडून एका शेतकऱ्याचा बंडी मागे चापेगडी च्या दिशेने येत आहे. कारण, जो व्यक्ती माझ्या बाबासोबत माझ्या कुत्र्याला (रजत) सोडायला गेलेला होता तो त्याच रस्त्याने कुठे तरी मय्यतीला जात होता. त्याच्याकडे माझा मोबाईल नंबर नसल्यामुळे त्याने माझ्या मित्राला फोन केला होता.

माझा मित्र लगेच माझ्या घरी आपली मोटार सायकल घेऊन आला आणि मी माझा जेवणाचा ताट सोडून त्याला (रजतला) आणायला निघालो. तर तो आम्हाला रस्त्यातच मिळाला व माझ्या अंगावर उड्या मारू लागला व माझ्यावर जोरजोरात भुंकू लागला. त्याला असे वाटले असेल कि, तुम्ही मला का बर सोडले होते. मला पण तो भेटल्यामुळे खूप चांगले वाटले व माझे मन भरून आले. मी त्याला मोटारसायकल वर बसवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही केल्या मोटारसायकल वर बसतच नव्हता त्याला जणू असे वाटत होते कि आणखी हे मला कुठे तरी दूर नेऊन सोडणार, मला पण काय करू काहीच समजत नव्हते. 

त्याला दहा ते बारा किलोमीटर पायी नेऊ शकत नव्हतो. त्यानंतर त्याला मी जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत पायी नेले. त्यामुळे तो थकला व मग मी त्याला मोटारसायकल वर बसवून घरी आणले आणि त्याची अंघोळ करून दिली व त्याला बिस्कीट खाऊ घातले. पण तो काही केल्या बिस्कीटाला तोंड पण लावत नव्हता मला त्याची खूपच दया येत होती. मग तो बिस्कीट खाल्यानंतर इकडे तिकडे फिरू लागला त्यामुळे आमच्या घरातील मंडळींना तो भेटल्याचा खूप आनंद झाला. त्याच्या तक्रारी येणे पण बंद झालेल्या होत्या नंतर मी बाबा हनुमानजीला दिलेला शब्द पन पूर्ण केला.

त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी घडलेली होती कि, माझ्या कुत्र्याच्या (रजत) डोक्याला काहीतरी लागलेल होत व त्यामुळे जखम झालेली होती. ही गोष्ट जवळपास दहा ते पंधरा दिवसा अगोदरची आहे. जखम जास्तच मोठी होत होती त्यामुळे घराजवळील मार्गात असलेल्या एका सेवकाने त्याच्याकरिता औषध आणून दिली. काही प्रमाणात त्याला आराम झाला नंतर त्याला लावण्यासाठी तीच औषध मी पण फार्मसी मधून आणली आणि त्याच बरोबर बाबा हनुमानजीला विनंती केली कि, त्याला आलेले दुखः दूर होऊ द्या व मी तीन दिवस त्याच्या जखमेवर रक्षा लाऊन फुक मारत गेलो आणि हळू-हळू जखम भरत आली व ती पूर्णपणे भरून दुरस्त झाली.

बघा परमेश्वराची कृपा हि मानवावरच नसून प्राणी, पक्षी, जीव, जंतू यावर सुद्धा आहे. एक वेळेस आपण कोणाला विसरू शकतो पण भगवंत आपल्याला विसरू शकत नाही. त्याच्या कृपेचा मायाळू हात आपल्या डोक्यावर नेहमीच असतो. ह्या अनुभवातून आपल्याला माहिती मिळते. तो मानवावरच नाही तर प्राणी-पक्षी इत्यादीवर सुद्धा त्याची कृपा दृष्टी असतेच.

या अनुभवात एक माझी खूप मोठी चूक झालेली ती म्हणजे, "मी बाबा हनुमानजी समोर शब्द ठेवला कि माझा कुत्रा (रजत) मला मिळू द्या व तो मिळाल्यास मी एक पाव पेढ्याचा प्रसाद वाटीन". असा शब्द देणे म्हणजे "नवस" करण्यासारखे आहे आणि त्याला आपल्या मार्गात बंधन आहे. म्हणजेच आपल्या मार्गात बाबांनी सर्व जुने विचार बंद करायला सांगितले आणि मार्गात येताच आपण परमेश्वरास शब्द देत असतो की, "मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले" आणि मी ती चूक केली. 

म्हणून, कोणत्याही सेवकांनी कधीही असे शब्द परमेश्वरास देऊ नये, कि जर तुम्ही माझी ही ईच्छा पूर्ण केली तर मी तुम्हाला हे देईल किंवा ते देईल. परमेश्वरास फक्त ४ तत्व, ३ शब्द आणि ५ नियम पाहिजे असतात, त्याला या नश्वर दुनियेतील दुसरे काहीच नको म्हणून, कुणीही अशी चूक कधीही करू नये. कारण, त्याचे गंभीर परिणाम कुटुंबावर येऊ शकतात. याबद्दल काळजी घ्यावी ही नम्र विनंती.


लिहिण्यात काही चूक-भूल झाली असेल तर “भगवान बाबा हनुमानजी” व “महानत्यागी बाबा जुमदेवजी” यांना क्षमा मागतो. 

नमस्कार...!

सेवक : दिनेश रा. जुमळे
पत्ता : चापेगडी, कुही, नागपूर
सेवक क्रमांक: १०१०५
मार्गदर्शक: मा. श्री. हिरामनजी नंदनवार
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】


🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

1 comment:

  1. खूपच सुंदर अनुभव दादा
    नमस्करजी जी दादा व ताई

    ReplyDelete