"मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक: (१५)
"आईची ममता"
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती केली आणि तेव्हापासुन ते भगवंताचा प्रति लोकांना जागृत करण्याचे कार्य निष्काम भावनेने करीत आहेत. या कृपेचा लाभ अनेकांना मिळत असल्यामुळे या मार्गात अनेक सेवक येत आहेत. त्या सर्वांना अनेक प्रकारचे फायदे उदाहरणार्थ, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक तसेच पुत्रप्राप्ती, इत्यादी गोष्टींचा लाभही त्यांना मिळत आहे. त्याचबरोबर अनेक चमत्कारिक अनुभव येत आहेत. बाबांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यावरही भगवंत त्यांची कधी कधी परीक्षा घेतात. त्यातील एक प्रसंग आहे.
सन १९५१ च्या एप्रिल महिन्याची ही घटना आहे. बाबांच्या जेष्ठ वहिनी श्री. बाळकृष्णरावांची पत्नी श्रीमती सीताबाई ह्यांना स्वप्नात बाबा हनुमानजी यांनी आकाशात असतानाच्या स्थितीमध्ये दर्शन दिले आणि आकाशवाणी केली की, सेवकांच्या (बाबांच्या) पाच भावांचा कुटुंबात जी बाई गरोदर आहे त्या बाईला मुलगाच होणार आहे आणि त्याचे आयुष्य फक्त तीन महिन्याचे राहणार आहे. त्यानंतर तो इहलोक सोडून जाईल.
या वेळेस श्री. नारायणराव यांच्या पत्नी सात महिन्यांचा गरोदर होत्या. ती बाई नऊ महिने पूर्ण झाल्यावर १ जुलै १९५१ रोजी प्रसृत झाली आणि त्यांनी एका गोंडस पुत्ररत्नाला जन्म दिला. भविष्यवाणी खरी ठरली. श्री. नारायणरावांकडे येणारे हे पहिलेच अपत्य आणि तेही पुत्र असल्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद झाला. बाळाला पाळण्यात घालण्यात आले. गरीब परिस्थिती असूनही मुलाचे बारसे थाटात पार पडले. मुलगा दिवसेंदिवस वाढत होता. छान खेळत होता त्याला कधी ताप आला नाही, सर्दी झाली नाही, दूध पीत नाही किंवा सारखा रडतो अशी कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे तो सर्वांचा आवडता होता. त्याचे कौतुकही तितकेच होत होते. तो तीन महिन्याचा होईपर्यंत त्याला काहीही त्रास झाला नाही.
'भगवंताची लीला न्यारीच' या म्हणीप्रमाणे झालेल्या भविष्यवाणीप्रमाणे तीन महिने पूर्ण झाले आणि दुसऱ्यादिवशी तो एकाएकी आजारी पडला. त्याचे शरीर एकदम थंड पडले. शरीराची हालचाल बंद झाली. डॉक्टरांच्या उपायाला यश येत नव्हते. सकाळची वेळ होती. त्यामुलाचे वडील नारायणराव त्याला घेऊन महानत्यागी बाबा जुमदेवजींकडे आले. वडील खुप रागात होते. ते मुलाच्या मोहमायेत गुंतले होते. त्यांचाबरोबर कुटुंबातील इतर मंडळी पण गोळा झाली. त्यांनी त्या मुलाला बाबांच्या समोर खाली झोपावले. ते रागारागाने म्हणाले, आपल्या घरात बाबा (भगवंत) आहेत तर हा मुलगा जगायला पाहिजे. तरच खरा परमेश्वर आहे. अन्यथा परमेश्वर प्राप्ती खोटी आहे. बाबांना प्रमेश्वराबद्दलचे असे उद्गार ऐकून खूप वाईट वाटले. त्यांचासमोर फार मोठा प्रश्न उपस्तिथ झाला. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे असे विचार योग्य नाहीत असे त्यांना वाटले.
ते निराकार अवस्थेत आले आणि कुटुंबातील लोकांना उद्देशून म्हणाले, "बाबा हनुमानजीने उस बाई को बताया कि बच्चा तीन महिनेका आयुष्य लेकर आनेवाला है। अब उसका तीन महिने का आयुष्य पुरा हुआ है। इसे जाना है। अब इसे किसका आयुष्य दे।" अणि आदेश दिला की, "परिवारके लोग एक कतार मे खडे हो जाओ। और जीसकी इच्छा हो वह कहे की मेरा आयुष्य इसे दे दो" त्याप्रमाणे सर्व जण पुरुषमंडळी आणि स्त्रिया हे एका ओळीत वेगळेवेगळे उभे राहिले. सगळीकडे स्तब्धता होती. सर्व विचारमग्न झाले. कोणाच्याही तोंडून शब्द निघाला नाही की, माझे आयुष्य या मुलाला द्या. कारण सर्वांना आपआपले प्राण प्रिय होते. प्रत्येकाला वाटत होते की, आपण खूप जगावे आणि हे स्वाभावीकही आहे. काही वेळाने त्या मुलाच्या आईने बाबांना विनंती केली की, बाबा मला विचार करायला दोन तासांची मुदत द्या. बाबांनी तिला दोन तासांची मुदत दिली. निराकार बैठक संपली. मुलगा तेथेच पडून राहिला.
दोन तासांनी पुन्हा त्याच ठिकाणी निराकार बैठक झाली. मुलगा तसाच अचेतन स्थितीत पडला होता. सर्वजण जमले होते. बाबा निराकारमध्ये आले आणि कुटुंबातील लोकांना म्हणाले, परिवारके लोग सुनो, बच्चेको आयुष्य मिल गया. त्यानंतर पुढील काहीच सांगितले नाही. बाबांचे शब्द त्यांच्या मुखकमलाव्दारे बाहेर पडताच त्या अचेतन मुलाने एकदम जोरात रडायला सुरवात केली. तेव्हा सर्वजण थक्क झाले. त्या मुलाला कोठून आयुष्य मिळाले याबाबतीत बाबांनी कोणत्याही प्रकारचा उल्लेख केला नाही. अशा प्रकारे "भगवंताची लीला न्यारींच" ही म्हण बाबांनी सिध्द करून दाखवली आणि परमेश्वर खरा आहे हे पण दाखवून दिले.
पंधरा दिवसांनंतर त्या मुलाची आई अचानक आजारी पडली. औषधेपचार केले. घरच्या मंडळींनी भगवंताला विनंती केली. पण तिचा काहीही उपयोग झाला नाही. त्या बाईने जी दोन तांसाची मुदत मागितली होती, त्यामागील कारण, तिची इच्छा काय होती हे तिने कोणालाही सांगितले नव्हते. शेवटी काही दिवसांनी ती परमेश्वराला प्रिय झाली. ती हे जग सोडून गेली. मुलगा अजूनही कायम आहे.
तेव्हा बाबांनी सांगितले की या बाईने आपले आयुष्य तिच्या मुलाला दिले. तिने प्रत्यक्षात सर्वांसमक्ष जरी सांगितले नव्हते तरी तिने भगवंताला तशी विनंती केली होती. यावरून "आईची ममता" किती महान (थोर) आहे, तसेच एकाचे आयुष्य संपवून ते दुसऱ्यास देता येते हे याउदाहरणावरून या मार्गाने सिध्द केले आहे. खरोखरच हा मार्ग (मानवधर्म) इतरांच्या तुलनेने "जगावेगळा मार्ग" आहे.
कायम असलेल्या मुलाचे नाव अशोक असुन आज तो चाळीस वर्षाचा आहे. तो सुखी आणि समाधानी असुन सर्वगुण संपन्न आहे.
लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार..!
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
जीवन पाटील: 7020000823
सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
"परमात्मा एक मानवधर्म परिवार"
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
छान माहिती दिली आहे जी
ReplyDeleteखूप छान माहिती......
ReplyDeleteनमस्कार जी
खूप सुंदर माहिती दादा
ReplyDeleteनमस्कार जी दादा व ताई
खूप छान माहिती... नमस्कार
ReplyDelete