Followers

Friday, 15 May 2020

प्रकरण क्रमांक: २० "ढोंगी साधू"



                     "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
          'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२०) 
  
                                     "ढोंगी साधु"

१९७० च्या जानेवारी महिन्याची ही गोष्ट. १९६९ साली महानत्यागी बाबा जुमदेवजींचा मुलगा महादेव याने विश्वेश्वरय्या रिजनल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर येथून बी. ई. ची परिक्षा प्रथम मेरीट क्रमांकाने उत्तीर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षणाकरिता परदेशात जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अमेरिकेतील नावाजलेल्या न्यूयार्क युनिव्हर्सिटीमध्ये मेटॅलर्जी आणि मटेरिअल सायन्स या विषयात एम. एस. च्या पदवी परीक्षेकरिता त्याला प्रवेश मिळाला. महादेव विमानाने अमेरिकेला जाणार होता. त्याला निरोप देण्याकरिता दिल्लीला महादेवबरोबर महानत्यागी बाबा जुमदेवजी, आई सौ. वाराणसीबाई, त्याची मावशी सौ. चंद्रभागाबाई निखारे, मामी सौ. गयाबाई बुरडे आणि त्याचा मित्र विठ्ठल राऊत इतके लोक गेले होते.

       दिल्लीला विठ्ठल राऊतचा मोठा भाऊ राहत होता. त्याच्याकडे सर्व मंडळी थांबली होती. दोन दिवस सर्वांनी दिल्लीदर्शन केले. तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहिलीत. ताजमहल, चारमिनार, जंतरमंतर लाल किल्ला इत्यादी स्थळांना भेटी दिल्यात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्रीच्या विमानाने महादेवला अमेरिकेला जाण्यासाठी पालम विमानतळावर सोडले. नंतर परत सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी आले. रात्रभर थांबून दुसऱ्या दिवशी आपसात सर्वांनी विचार केला की, येथून जवळच हरिद्वार, ऋषीकेश ही ऐतिहासीक तीर्थक्षेत्रे आहेत. त्यामुळे ती तीर्थक्षेत्रे पाहून यावीत. ठरल्याप्रमाणे सर्वजण रेल्वेने ऋषीकेशला जाण्यासाठी सकाळीच निघाले. त्यांनी सोबत फराळाचे साहित्य घेतले होते.

       जानेवारीचा महिना असल्यामुळे ऋषीकेशला खूप थंडी पडली होती. हृषीकेश रेल्वेस्टेशनपासून ऐतिहासिक स्थळापर्यंत जाण्यास घोडागाडी केली. त्या अगोदरच बाबांनी सर्व मंडळींना रेल्वे
स्टेशनवरच सांगितले की, आपण एकच भगवंताला मानतो. देव आपला आत्मा आहे. म्हणून कोणीही कोणत्याही देवळात नमस्कार करायचा नाही. आपण फक्त मानवाने तयार केलेली कलाकृती पाहून हाताने तयार झालेल्या दगडाच्या निर्जीव मूर्तीत मानवाच्या परमेश्वर वास करीत नाही, तर तो सजीवांच्या आत्म्यात निरंतर वास करतो. ठरल्याप्रमाणे ते सर्वजण ऋषीकेश या गावी ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्याकरिता निघाले. रस्त्यात त्यांची गुजरात येथुन आलेल्या एका मारवाडी जोडप्याशी ओळख झाली होती. त्या सर्वांनी सर्व स्थळे पाहिल्यानंतर सर्वात शेवटी 'लक्ष्मणझुला' पाहिला. ठरल्याप्रमाणे कोणत्याही देवळात कोणीही नमस्कार केला नाही. लक्ष्मणझुला पवित्र गंगा नदीवर बांधला आहे. त्या पुलावरून ते गंगा नदीच्या दुसया काठावर गेले.

दुपारची वेळ होती. तेथे सर्वांनी आंघोळ केली. त्याच ठिकाणी त्यांना ते मारवाडी कुटुंब भेटले. ते पति-पत्नी होते. मारवाडी समाजात अशी एक प्रथा आहे की, जेव्हा ते तीर्थस्थानाला जातात तेव्हा त्या समाजाची बाई कोणत्याही माणसाला आपला बंधू मानते (जर तिचा भाऊ बरोबर नसेल तर) आणि त्या भावाला भेट म्हणुन काही वस्तु प्रदान करते. त्यामुळे त्या बाईचा उध्दार होतो असा समज आहे. त्याप्रमाणे बाबांकडे त्या माणसाने बुजुर्ग या नात्याने बघून त्या बाईचा भाऊ बनुन त्यांना भेट स्वीकारण्याबद्दल विनंती केली. ते जोडपेही वयस्कर होते. बाबांनी विचार करून त्यांना होकार दिला. त्याप्रमाणे सर्वांच्या आंघोळी आटोपल्यावर त्या बाईने बाबांना आपला भाऊ मानुन वस्तु भेट दिल्या आणि रीतिरिवाजाप्रमाणे त्यांची पुजा केली. त्यानंतर बाबांनी त्यांना परमेश्वराबद्दल मार्गदर्शन केले आणि त्याला टिकविण्याकरिता मानवाने नेहमी सत्य, मर्यादा, प्रेमाने वागले पाहिजे असा हितोपदेश केला. त्यानंतर बाबांनी त्यांना फराळ करण्याचा आग्रह केला. परंतु त्यांना संकोच वाटू लागला. त्यांना वाटले की, हे बरोबर नाही, कारण आपण त्यांना भेट दिली म्हणुन ते आपणास बोलावितात यावर बाबांनी पुन्हा मार्गदर्शन केले की, या पृथ्वीतलावर कोणत्याही मानवाने संकुचित विचार न ठेवता मानवा मानवाने एकमेकांचे हृदय जिंकून एकता निर्माण केली पाहिजे. सर्व मानव परमेश्वराची लेकरे असल्यामुळे समान आहेत, मानव कर्मकर्ता आहे म्हणून सर्वांचे विचार सारखेच असावयास पाहिजेत, जे परमेश्वराला प्रिय आहेत. त्यानंतर त्यांनी बाबांबरोबर फराळ केला आणि तेथून पुढे हरिद्वारला जाण्याकरिता त्या कुटुंबासहित रेल्वे स्टेशनवर गेले.

हरिद्वारचे तिकीट काढून हरिद्वारला जाणाऱ्या गाडीत सर्व मंडळी एकाच डब्यात बसली. त्या डब्यातील एका कंपार्टमेंटमध्ये एक महात्मा ऋषी बसले होते. त्याच कंपार्टमेंटमध्ये बाबा त्यांच्याजवळ बसले आणि समोरच्या बाकावर बायामंडळी बसली. बाबांची आणि त्या तपस्व्याची ओळख झाली. त्यानंतर त्या तपस्व्याने बाबांना विचारले की तुम्ही सर्वजण कोठून येत आहात आणि कुठे निघाले आहात ? तेव्हा बाबांनी त्याला उत्तर दिले , आम्ही नागपूरला राहतो. दिल्लीवरून मुलाला अमेरिकेला जाण्यासाठी सोडले आणि ऋषीकेश हे ऐतिहासीक स्थळ पाहण्यास आलो. तेव्हा त्या ऋषीने बाबांना प्रश्न केला की, आपण भगवंताचे मंदिर पाहिले काय ? तेव्हा बाबा उत्तरले आपण फार उत्तम प्रश्न विचारला. महात्माजी आम्ही येथील सर्व देवळे पाहिलीत मानवाने बनविलेल्या कला पाहिल्यात, परंतु कोणत्याही देवळात नमस्कार केला नाही , कारण आम्हाला फक्त निर्जीव मूर्ती दिसल्यात पण भगवंत दिसला नाही. तेव्हा ऋषीने म्हटले , आपण असे करावयास नको होते. त्यानंतर बाबा पुढे म्हणाले की या देशाची लोकवाणी काय आहे हे मला माहीत नाही. परंतु ज्या व्यक्ती परमेश्वराशी संबंधित असतात त्यांना असे वाटते की, देवळात प्रणाम केला नाही तर परमेश्वराचा अनादर होतो. म्हणून मी देवळात प्रणाम न केल्यामुळे परमेश्वरांचा अपमान केला आहे असे आपल्याला वाटत असेल तर आपण ब्रम्हांड चढवावे आणि त्या परमेश्वराला सांगावे की, हे परमेश्वरा, नागपूरवरून एक व्यक्ती काही जणांना घेऊन या तीर्थक्षेत्रावर आली आहे. तो देवळात गेला पण तेथे असताना देखील त्याने तुला नमस्कार केला नाही. त्यानंतर जेव्हा परमेश्वर मला विचारेल तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर मी त्याला देईन , पण तुम्हाला देणार नाही . 

त्यानंतर तो महात्मा खूप विचारात पडला आणि ब्रम्हांड न चढवता विचाराअंती तो बाकावरून खाली उतरला आणि बाबांच्या पायाशेजारी बसला . त्याने बाबांचे पाय धरले आणि म्हणाला , तुम्ही धन्य आहात आपल्यासारखा एकही तपस्वी मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही . मी हिंदी भाषिक ब्राम्हण असून पदवीधर आहे आणि गेल्या तीस वर्षांपासून परमेश्वर प्राप्तीकरिता पहाडावर जाऊन हृषीकेश , हरिद्वार यांसारख्या तीर्थस्थानी आणि हिमालयात जाऊन आराधना करीत आहे. पण मला अजून परमेश्वरप्राप्ती झाली नाही . तसेच आजतागायत हरिद्वार ते कन्याकुमारीपर्यंत मी खूप ऋषिमुनी पाहिलेत. महात्मा पाहिलेत, परंतु तुमच्या ध्येयाचा एकही तपस्वी आढळला नाही . इतिहासात कालिदास एक महात्मा ऋषिमुनी होऊन गेला. त्याचे पण हेच धोरण होते. तेव्हा बाबा म्हणाले , तुलसीदासजींनी सुद्धा हेच म्हटले आहे की , "पत्थर पूजे भगवान मिले. तो मैं पूजू पहार" तसेच "ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय" असेही सांगितले. तेव्हा तो महात्मा बाबांना म्हणाला, आपण परमेश्वराला ओळखता. मला आपण भगवान कुठे आहे ते दाखवा. मी आपला दास बनून राहीन .

त्या महात्माच्य जटा खूप वाढलेल्या होत्या. त्या केसांची छानपैकी डोक्यावर मध्यभागी चुंबड घातली होती. पाटापर्यंत दाढी वाढलेली होती. कानांत कुंडल घातले होते. गळ्यात रूद्राक्षाच्या माळा होत्या आणि अंगात लालरंगाची कफनी होती. हातात एक छोटीशी काठी आणि दानपात्र होते.

त्या महात्म्याने बाबांना खूप विनंती केली , पण बाबा एकाएकी गहिवरले नाहीत. त्याला त्यांनी काहीही सांगितले नाही. त्याने बाबांची खूप विनवणी केली. तो बाबांचे पाय सोडत नव्हता. त्याने त्यांच्या पायांवर डोके टेकून दिले. तो डोके वर उचलत नव्हता. परंतु बाबा स्वतःच्या पाया कोणालाही पडू देत नाहीत म्हणून ते पाय सोडवण्याचा प्रयत्न करीत होते . शेवटी बाबांनी त्याला उठवले आणि म्हटले, महात्माजी तुम्हाला भगवंताला पाहायचे असेल तर माझा नागपूरचा पत्ता लिहून घ्या. माझी एक अट आहे. ती अट पूर्ण झाली तरच मी तुम्हाला भगवंत दाखवीन. तेव्हा तो उठून पुन्हा बाबांच्या शेजारी बसला आणि पुढे काय करावयाचे याबद्दल मार्गदर्शन करण्याची त्याने बाबांना प्रार्थना केली. तेव्हा बाबा त्याला म्हणाले की, तुम्हाला प्रथम दाढी, जटा काढाव्या लागतील. कफनी, कुंडलेफेकून द्यावी लागतील. तुमचा वेष बदलून माझ्यासारखी साधी रहाणी स्वीकारावी लागेल. तीस वर्षे तपश्चर्या करून भगवंताला प्राप्त करू शकले नाही ही फार दुःखाची आणि शरमेची गोष्ट आहे. कारण या तुमच्या वेषाने या संपूर्ण संसाराला भुलविले आहे. तुम्ही लोकांना परमेश्वराच्या नावाखाली लुबाडता. तुम्ही तीस वर्षांचे तपस्वी जर या देशात परमेश्वराच्या नावावर आंधळे आहात तर संपूर्ण जग आंधळे आहे असे मी समजतो.  हे ऐकल्यावर त्या तपस्व्याने बाबांना म्हटले या देशात होत असलेल्या कुंभमेळयात निरनिराळ्या प्रकाराचे तपस्वी, महात्मा, मुनी येतात. सर्व लोक देवळात जाऊन प्रणाम करतात. त्याला भोग चढवितात. परंतु तुम्ही असे केले नाही. म्हणजेच तुम्ही परमेश्वराला नक्की ओळखता हे सिद्ध होते. म्हणून आपण मला परमेश्वर दाखवत नसले तरी निदान त्याबद्दल मार्गदर्शन करावे. अशी विनंती त्याने केली. तेव्हा बाबा म्हणाले, मी तुम्हाला माझा पत्ता दिला आहे. त्या पत्त्यावर आपण मी सांगितल्याप्रमाणे साध्या वेषात या. मी आपणास तेथेच मार्गदर्शन करीन परमेश्वर दाखवीन. ही चर्चा सुरू असतानाच हरिद्वार आले. त्याने बाबांचा पत्ता लिहून घेतला. परंतु बाबांनी त्याला परमेश्वराबद्दल मार्गदर्शन केले नाही. 

ही चर्चा सुरू असतानाच बाबांनी त्याला एक प्रश्न विचारला होता की, महात्माजी या देशाची एक लोकवाणी आहे, परंतु मी प्रत्यक्ष पाहिले नाही. ती अशी की, तपस्वी लोकांना त्यांची साधना सुरू असताना भगवान त्यांना जेवणाचे ताट आणून देतो. नंतर तो जेवण करतो आणि भगवंतच त्याचे सर्व पूर्ण करतो. कारण तपस्या करताना तो स्वयंपाक करू शकत नाही आणि जेवण केल्याशिवाय तो जीवंत राहु शकत नाही. म्हणून तुम्ही सत्य सांगा की, तुम्ही तपस्या करताना तुम्हाला भगवंताचे जेवनाचे ताट आणून दिले काय? नाहीतर तुम्ही जेवण कसे घेतले किंवा इतके दिवस उपाशी राहून जगले कसे ? ते प्रथम मला समजावून सांगा. तेव्हा तो महात्मा एकदम अवाक झाला आणि त्याने बाबाना नम्रपणे उत्तर दिले. आपण जी लोकवाणी एकली आहे ती खोटी आहे. भगवान जेवनाचे ताट आणून देत नाही. आम्हा तपस्वी लोकांचा दर्शनाकारिता लोक आमच्या आश्रमात येतात. तेव्हा आम्ही त्याना सारखेच पाच हजार, दहाहजार रुपये द्या. भगवान तुमची मनोकामना पूर्ण करील असा आशीर्वाद देतो. अशाप्रकारे तीस वर्षात करोडो रूपये कमविले. अतोनात पैसा मिळविला, परंतु इतके दिवस तपश्या करूनही भगवान पाहायला मिळाला नाही. त्याला प्राप्त करता आले नाही. हरिद्वार आल्यावर सर्वजन डब्यातुन खाली उतरले. त्या महात्म्याने बाबांचा पत्ता लिहून घेतले पण बाबांचे म्हणणे आहे कि, आजपर्यंत तरी तो महात्मा त्यांना भेटायला आला नाही. यावरून बाबा आपल्या सेवकांना नेहमी मार्गदर्शन करून जगवितात. त्यानी याबद्दल सेवकाना खालीलप्रमाणे उपदेश दिला आहे.

■ उपदेश : बाबा हरिद्वारला उतरल्यावर तेथे ते सर्व मंदिरात जाऊन आलेत. परंतु कोणत्याही मंदिरात त्यांनी प्रणाम केला नाही. कारन ते म्हणतात की. देवळात भगवान विराजमान नाही. तर तो प्रत्येक आत्मयात विराजमान आहे. पण त्यांना चैत्यनयुक्त आत्मयात असलेला देव दिसत नाही. लोक देवळात निर्जीव मूर्तिला भगवान समजून त्याला भोग चढवितात. हि या देशाची प्रथा आहे. याची मला खुप खंत वाटते. या अंधश्रद्धेमुळे अशा ढोंगी व्यक्ति, लोकांना भगवंताचा धाक दाखवून लुबाडन्याचे कार्य करतात. तरीपण लोकांच्या लक्षात ते देखील येत नाही. याचे दू:ख वाटते. या देशात अधर्म होत आहे. भारतात अनेक धर्म आहेत.  भारतीय लोक सुसंघटित आहेत.

भगवंताने वेळोवेळी आकारात येऊन जे जे सत्य आहे ते ते दाखविले आहे या देशाचा इतिहास या लोकांना माहीत आहे. असे असूनही बाबा आणि लोक हे पाहत आहेत की सर्वच धर्माचे लोक सत्य सोडून असत्याकडे धावत आहेत आणि लोक असत्याकडे धावत असल्यामुळे या देशाची स्थिती बिघडली आहे असत्य भगवंताला आवडत नाही . या देशात भ्रष्टाचार होत आहे सर्वच धर्माचे लोक भगवंताविषयी मार्गदर्शन करतात तरीपण या देशातील सत्य नाहीसे झाले आहे. असे का ? प्रत्येक धर्मातील लोक (धर्मगुरू ) आपआपल्या धर्मातील लोकांना जागवत का नाहीत . की सत्य हेच केवळ परमेश्वराला प्रिय आहे आणि सत्य नेहमीकरिता निर्माण करायचे आहे आणि सत्य जर निर्माण झाले नाही तर देशाचे नक्कीच पतन होणार आहे. सत्याला जागविल्यास या देशाला लाभ होणार आहे म्हणूनच बाबा सत्याला जागविण्याचे कार्य करतात बाबा नेहमी मार्गदर्शन करताना सांगतात की, माझ्या या मार्गाच्या मार्गदर्शनाचा जे लाभ घेतात ते मूठभर सुद्धा भीक मागत नाहीत तर स्वतः कष्ट करून स्वावलंबी होतात मी भगवान नाही तर भगवंताने आपला परिचय माझ्या आत्म्यात दाखविलेला आहे म्हणून मी मानवांच्या (लोकांच्या) आत्म्यामध्ये भगवंत पाहतो आहे आणि याची ओळख त्या मानवाला करून देतो आहे या देशाचे पतन होत आहे या देशात अधर्म सुरू आहे त्याला बाबा आपल्या मार्गदर्शनाने थांबविण्याचे कार्य करीत आहेत. या महान कार्याकरिताच भगवंताने महानत्यागी बाबा जुमदेवजींना आपल्याबरोबर घेतले आहे म्हणजेच बाबा भगवंताच्या रूपात लोकांना सत्य मार्गावर चालण्याकरिता शिकवीत आहेत. त्यांना सत्याविषयी जागृत करीत आहेत. कारण देशाची संपूर्ण समस्या बाबांच्या समोर आहे म्हणून बाबांनी त्याग केला आहे ते निष्काम भावनेने परमेश्वराचे कार्य करतात. बाबा कोणकडूनही गुरूपूजा घेत नाहीत.

 प्रत्येकाच्या आत्म्यात परमेश्वर असल्यामुळे आपल्या पायावर कोणालाही डोके ठेवू देत नाहीत स्वतःच्या प्रपंचाचा संपूर्ण खर्च ते स्वतःकरतात ते कोणाकडेही भीक मागत नाहीत आणि मार्गातील सेवकांना मागू देत नाहीत बाईला तर फार लांब उभे ठेवतात, त्यामुळे स्पर्श करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते कोणाशीही खोटे व्यवहार करीत नाहीत. मानव हा बुद्धिजीवी प्राणी आहे. त्यामुळे भगवंताची खरी ओळख त्यालाच आहे. मानवाच्या नर आणि नारी या दोनच जाती आहेत. म्हणून हे दोन प्राणी परमेश्वरला जागवू शकतात. प्रत्येक माणूस किंवा बाई हे कार्य करू शकते. बाबा नेहमी सत्कर्म करतात आणि सेवकांनाही सत्कर्म करायला लावतात. भगवंताने आपल्याला निर्माण केल्यामुळे आपला सर्वांचा विधाता हा एकच भगवान आहे असे ते सांगतात. म्हणून परमेश्वराने आपल्या आत्म्यातून आपल्या मनाला आत्मप्रचीती, आत्मानुभव आणि आत्मज्ञान दिले आहे, हे सत्य आहे. हे ज्ञान प्रत्येक मानवाला दिले आहे. म्हणून ते प्रत्येक मानवाला जागविण्याचे कार्य करतात. मानव आपल्या कुटुंबाच प्रपंच चालविण्यासाठी सतत जीवन व्यतीत करतो आणि त्याच्या कुटुंबात चालण्याकरिता त्या सर्वांनी सत्य , मर्यादा , प्रेमाची वागणूक केली पाहिजे. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबात परमेश्वर टिकतो कारण त्याला हेच प्रिय आहे.

  बाबा सांगतात की, या देशात मर्यादा पुरूषोत्तम राम याची माला जपतात. रामाने रावणाला (सैतानाला) संपविले आहे. त्याच्या सैतानी शक्तीला नष्ट केले आहे. हे इतिहासात लिहिलेले आहे तरी त्याच्या नावाची माला जपणारे हे मूर्ख लुच्चे ऋषी, महात्मे त्यांच्याप्रमाणे सत्य व्यवहार का करीत नाहीत याचे बाबांना खूप दुःख होते म्हणून बाबा सत्याचे प्रमाण हे ९९ टक्के किंबहुना १०० टक्के होऊन सैतानी वृत्तीचा र्‍हास करण्याकरिता स्वतः निष्काम भावनेने झटत असून आपल्या सेवकांना सुद्धा झटायला सांगतात. त्याप्रमाणे लोकांनी अध्यात्म लक्षात ठेवून व्यवहार करावयास पाहिजे. ज्यामुळे संपूर्ण जग या कलियुगातून पुन्हा सत्ययुगाकडे शांततेने वाटचाल करील.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर  अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

3 comments:

  1. खुपच सुंदर माहिती दादा
    नमस्कार जी दादा व ताई

    ReplyDelete
  2. खुप सुंदर छान माहिती मिळाली दादा नमस्कार जी

    ReplyDelete
  3. छान माहिती ! सर्वाना माझा नमस्कार जी।

    ReplyDelete