Followers

Monday, 4 January 2021

【"नवजीवनदान"】हा लेख नक्की वाचन करा व जास्तीतजास्त सेवकांपर्यत शेयर करा. नमस्कार


 【"चर्चा बैठकीचा विषय"】

▶"मार्गात येण्याअगोदर सेवक, अज्ञानी जीवन जगत होते. कुणाला विद्येचे ज्ञान नव्हते, तर कुणाला समाजाचे भान नव्हते! कुणी माणूस असूनही पशु प्रमाणे वागायचे, तर कुणी बुद्धीमान असूनही अंधश्रद्धा मध्ये वाहून जायचे! तर अश्या या भोळ्याभाबड्या लोकांना "महानत्यागी बाबा जुमदेवजींनी" कशाप्रकारे नवजीवनदान दिले ?"

                             【लेख स्पष्टीकरण】

मार्गात येण्याअगोदर सेवक शिकलेला होता शिकून असल्यानंतरही तो अज्ञानी होता विद्येचे ज्ञान होतं पण त्या ज्ञानाचा प्रकाश माणसाच्या जीवनात नव्हता. मानव हा समाजशील प्राणी आहे तो समाजात राहतो, वावरतो परंतु वाईट व्यसनामुळे व शट विकारामुळे मोहमाया, अहंकार, द्वेष, राग, अंधश्रद्धा यामध्ये ते गुरफटून होते. ते भोळेभाबडे नव्हते तर आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाची राखरांगोळी करणारे दानव वृत्तीचे मानव होते. एकदाच माणसाला दानव बनवणे सोपे आहे, परंतु दानवाला मानव बनवणे सोपी गोष्ट नाही. यासाठी महानत्यागी बाबा जुमदेवजींनी हाडाची काडी केली, खूप कठोर परिश्रम घेतले, स्वतः अगोदर ज्ञानी झाले व हा ज्ञानाचा दीपक त्यांनी आजन्म सेवकांच्या घरोघरी लावला.

भोळेभाबडे म्हणजे अंधश्रद्धा त्यांच्यात भरली होती, खरा रस्ता कोणी दाखवणारे नव्हते देव आहे तो दगडाच्या मूर्तीत अंगात येणाऱ्या देवी-देवतांच्या अवस्थेत, लटा लटा पायावर लोळण घेत बाबा बाबा म्हणत हा माणूस परावलंबी होता. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सर्वप्रथम आमचा विश्वास जिंकला म्हणजे आमचं मन सत्य परिस्थिती कडे वळविण्याचं काम केलं, पहिल्याच दिवशी एकता म्हणजे काय असते हे आम्हाला बाबांनी शिकवलं. नाहीतर तुझ्या घरच्या लोकांनी करणी केली ठोका केला, अशी भूलथापांना माणूस घाबरत, व्यसनाधीन झाला.

घरातली अंधश्रद्धा निघून व्यसनमुक्ती करून सर्व कुटुंबाची एकता दाखवून बाबांनी मानवाला मानव केलं माणुसकी शिकवली. आज जो माणूस गटारात पडला राहायचा त्याच्या अंगावर माशा भनभन करायच्या त्या व्यक्तीला मानव बनून सेवक ही पदवी दिली.

नुसती पदवी दिली नाही तर स्वावलंबी बनवलं जागृत केलं. दुर्जर असाध्य रोगी महारोगी कोडी वंशपरंपरेने चालत आलेले काही विकार बाबांनी दिलेल्या जागृत कृपेने नष्ट झाले. ज्या ठिकाणी पातळाला गाठी बांधून स्त्री स्वतःच शिव झाकत होती, बाहेरबाधे मुळे अनेकांनी कचकुन केस पकडले होते, नाना तर्हेच्या वेदना जीवाला होत होत्या, परंतु या मार्गात महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सेविका ताईंना अबला नाही सबला बनवलं. सती अनुसया असा दर्जा दिला.

आमच्यामधून कित्येक सेवक दादा व सेविका ताई यांनी कधीच स्टेज पाहिला नव्हता पण आज परमेश्वर कृपेने प्रत्येक सेवक-सेविका परमेश्वरी गुणाचे अनुभव,  हजारो लोकांच्या समोर माइक मध्ये सांगतात आजही माइक म्हटलं तर मोठे मोठे घाबरतात पण मानव धर्मात मार्गात आलेला सेवक कधीही घाबरत नाही. कारण जागृत परमेश्‍वरी कृपा ही २४ तास चैतन्यमय आत्म्यात वास करत असते. 

जर सेवकाची वागणूक असत्य असेल तर खरोखरच आपल्याला कष्ट होतीलचं, दुःख येईलचं म्हणून सेवकांनी बाबांची शिकवण, बाबांनी दिलेले तत्व, शब्द, नियम कधीही विसरू नये. मार्गात येण्याचा पहिला दिवस मी कसा होतो आणि आज मी कुठे आहो हे विसरता कामा नये. बाबांनी आम्हाला नवजीवनदान सोबत सफल समृद्ध जीवन आम्हाला दिलेलं आहे. फरक फक्त एवढा आहे ज्ञानाची तिजोरी सर्वांकडे आहे, एकच कुलूप लागलेला आहे, पण किल्ली कोणती लावायची हे सेवकांनी ठरवायचं आहे. कारण मनमंदिरात आपण कुणाला पाहतो, हे आपल्याला विश्वास, निश्चय, त्याग व समर्पण ही भावना ठेवून कार्य करणे आहे. हे कार्य जर आपण केले तर बाबांनी दिलेलं नवजीवन खरंच सफल, समृद्ध होईल. नमस्कार.!!

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ★ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- "सर्व सेवक -सेविका"

परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】


🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Friday, 11 December 2020

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे अनमोल मार्गदर्शन

 


[महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे अनमोल मार्गदर्शन]
     !! ----------------------------------------------!!

खालील मार्गदर्शन आवर्जून बघा व जास्तीतजास्त शेयर करा आणि आपल्या या YOU TUBE चॅनल ला नक्की SUBSCRIBE करा. यामुळे भगवत गुणांचा आनंद सेवकांना घेता येईल. आपल्या चॅनल वर तुमच्या LIKE आणि COMMENT आठवणीने द्या.  नमस्कार.!!
__________________________________

◆महानत्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन भाग-१
लिंक:https://youtu.be/M2DUvlRNvQY

◆महानत्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन भाग-२
लिंक:https://youtu.be/_pFs-aykK4E

◆महानत्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन भाग-३
लिंक:https://youtu.be/R1dPtcWTrdc

◆महानत्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन भाग-४
लिंक:https://youtu.be/8slcrcDHSdI

◆महानत्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन भाग-५
लिंक:https://youtu.be/hTibJ1KaJOg

◆महानत्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन भाग-६
लिंक:https://youtu.be/u-1pqyKqauk

◆महानत्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन भाग-७
लिंक:https://youtu.be/auB77oNz4Pk

                      !!!..नमस्कार..!!! 

प्रकरण क्र: (२९) "मर्यादित कुटुंब" हे प्रकरण नक्की वाचा व आवर्जून शेयर करा.

 


"मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)

             'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२९) 

                             "मर्यादित कुटुंब"


महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माच्या शिकवणुकीत जे चार तत्व, तीन शब्द आणि पाच नियम दिलेले आहेत. त्यातील नियम पाचमध्ये त्यावेळच्या परिस्थितीनुसार मानव मंदिर सजविण्याकरिता फंड अनुदान जमा करणे हा नियम दिला होता. त्याप्रमाणे बाबांनी सेवकांचे मानव मंदिर, सहकारी बँक, ग्राहक भांडार याच्या स्वरुपात सजविल्यानंतरही सेवकांना जीवनचरितार्थ चालवितांना त्रास होतो हे लक्षात आल्यानंतर त्याच्या कारणाचे संशोधन करुन त्यावर निदान काढले. सध्याची देशाची किंवा सपूर्ण जगाची परिस्थिती पाहून जाता मानवांना भेडसावणाऱ्या समस्या कोणतेही

सरकार पूर्णपणे सोडवू शकत नाही किंवा कोणतेही सरकार आपल्या देशाची भरभराट करु शकत नाही. वाढती महागाई, अन्नधान्याची टंचाई, उद्योगधंदे कमी पडणे याला जर कोणी जबाबदार असेल तर ती वाढती लोकसंख्या आहे. जोपर्यंत या वाढत्या

लोकसंख्येला आळा बसणार नाही. तोपर्यंत हल्लीच्या काळात कोणताही देश आपली प्रगती करु शकत नाही. म्हणून प्रत्येक देशाच्या सरकारने याविषयी बरेच संशोधन करुन कुटुंब कल्याण या नावाची योजना राबविणे सुरु केले आहे.

त्यात भारत हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु ही योजना भारतात सरकारतर्फे यशस्वी झाली नाही. भारत सरकार अजूनही मर्यादित कुटुंबाकरिता मानव जागृती करुन निरनिराळ्या प्रकारच्या योजना राबवीत आहे पण सरकार अजुनही लोकसंख्येला मात्र आळा घालु शकले नाही.

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी भगवान बाबा हनुमानजीचा वार्षिक कार्यक्रम आणि एका भगवंताचा सदतिसावा प्रगट दिनोत्सव दि. १७/८/१९८४ रोजी साजरा करीत असतांना सेवकांना भेडसावित असलेल्या समस्यांचे निवारण खालीलप्रकारे मार्गदर्शन केले. ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, "जीवनात चालण्याकरिता, गृहस्थी उंच आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी जे पाच नियम दिले आहेत त्यातील पाचवा नियम मंदिर सजविण्याकरिता फंड अनुदान गोळा

करणे याऐवजी "आपले कुटुंब मर्यादित ठेवणे" हा नियम आजपासून अमलात आणावा." कारण फंड अनुदान भरपूर झाले असून त्या फंडाचा सदुपयोग आपण चांगल्या कामाकरिता केला आहे आणि त्या सर्व गोष्टींचा लाभ सेवकांना मिळतही आहे. परंतु

सेवकांना त्यांच्या मुलांचे योग्यरित्या पालनपोषण करता यावे आणि त्यांना चांगले शिक्षण देता यावे याकरिता प्रत्येक कुटुंबात परिवार-नियोजन आणण्यासाठी खालीलप्रमाणे नियम पाळावेत असा आदेश सेवकांना दिला.

१) या मार्गात जे सेवक आहेत किंवा होतील, त्यांच्या कुटुंबातील ज्याचे लग्न झाले आहे किंवा पुढे होईल त्यांनी लग्नानंतर १६ वर्षांच्या अवधीमध्ये फक्त दोन मुले होऊ द्यावीत.

२) डॉक्टरी सल्ला घेऊन बायांनी गर्भप्रतिबंधक उपाय करावेत.

३) प्रत्येक कुटुंबात मुलाच्या लग्नाची वयोमर्यादा २५ वर्षांची असावी. २५ वर्षांच्या आत कोणत्याही मुलाचे लग्न करु नये.

महानत्यागी बाबा जुमदेवजी पुढे म्हणाले की, आज असे पाहण्यात येत आहे की, लग्न झाल्यावर ४-५ वर्षातच ३-४ मुले जन्माला येतात. त्यामुळे आईवडिलांची त्यांचे पालनपोषण करतांना तारांबळ उडते आणि त्यांना खूप त्रास होतो. त्याप्रमाणे

आईच्या प्रकृतीवरही परिणाम होतो. वरील नियमांचे पालन केल्यास त्रास कमी होईल आणि खर्चात बचत होऊन जीवनमान उंचावेल म्हणून सर्वांनी यापुढे "मर्यादित कुटुंब" हा नियम पाळावा असा आदेश दिला आणि त्या दिवसापासून म्हणजे १७ ऑगस्ट १९८४ पासून सर्व सेवकांनी तो नियम अमलात आणला.

अशाप्रकारे जे काम सरकार एकाएकी करु शकत नाही ते कार्य या मार्गातील सेवक बाबांच्या आदेशानुसार मार्गदर्शन करुन त्यांच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळवितात.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ★जिवन एस. पाटील: 7020000823


सौजन्य: "सर्व सेवक -सेविका"

परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】


🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.




Sunday, 29 November 2020

प्रकरण क्रमांक : (२८) "महानत्यागी"

 


                  "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)

          'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२८) 

                          "महानत्यागी"

समर्थ बाबा जुमदेवजी यांनी १९४६ साली बाबा हनुमानजीची प्राप्ती केल्यानंतर ते मानवाचे दुःख दूर करु लागले. परंतु त्या कृपेने मानवाचे दुःख पूर्णपणे नाहीसे झाले नाही त्यांनी अशा शक्तीचे संशोधन करण्यास सुरुवात केली की जो मानवाचे सर्व प्रकारचे दुःख हरण करु शकेल. शेवटी त्यांनी १९४८ साली एका भगवंताची प्राप्ती केली. तेव्हापासून परमेश्वराप्रती मानवाला जागविण्याचे कार्य निष्काम भावनने ते सतत करीत आहेत. याकरिता बाबा मानवाला रोज मार्गदर्शन करतात.

मानवाला त्यांच्या शारीरिक आणि मानसिक दुःखातुन मोकळे केल्यावर त्याच्या आर्थिक आणि सामाजिक अडचणीचे निवारण करण्याकरिता बाबा आध्यात्मिक

विषयाबरोबरच सामाजिक क्रांतीकडे वळले. त्यांनी त्याकरिता आपल्या सेवकांच्या गरजा भागविता याव्यात म्हणून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली आणि त्या माध्यमाद्वारे परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक, गोळीबार चौक, नागपूर येथे स्थापन केली. जागनाथ बुधवारी, नागपूर येथे "परमात्मा एक सेवक ग्राहक भांडार' उघडले. सालईमेटा आणि धोप या खेड्यांत तेथील सेवकांना शेतीबरोबर जोडधंदा मिळावा म्हणून दुध उत्पादक संस्था स्थापन केल्यात.

हे सर्व कार्य करीत असतांना आध्यात्मिक विषयांवर जास्त भर देऊन त्यांनी सतत १९४७ ते १९८४ म्हणजे जवळ जवळ ३७ वर्षे निष्काम भावनेने मानव जागृतीचे कार्य केले. याकरिता त्यांनी खेडोपाडी, गावोगावी, उन्हाळा, पावसाळा किंवा थंडीच्या

दिवसांची पर्वा न करता पायी, खाचर, बैलगाडी, बस इत्यादी साधनांनी प्रवास केला. याकरिता येणारा खर्च ते स्वतः करीत असत. खेड्यापाड्यात जे काही मिळेल ते खात-पित असत. परंतु मी भगवंत प्राप्ती केली आहे म्हणून लोकांनी फुकटात खाऊ घालावे असा कधीही मोह होऊ दिला नाही. ते कधीही गुरुपुजा घेत नाहीत. आत्मा हाच परमात्मा आहे आणि तो प्रत्येकात आहे हे ते समजतात. म्हणून कोणालाही स्वतःच्या पाया पडू देत नाहीत. कोणाचेही व्यक्तीगत हार स्वीकारत नाहीत. परमेश्वरी कार्य करतांना ते आंधोळीची किंवा जेवणाची पर्वा करीत नाहीत.

बाबांनी वरील संस्था स्थापन करुन सेवकांना त्यांची गृहस्थी उंच आणण्याकरिता या संस्थाचा लाभ मिळवून दिला. या संस्था बाबांनी आपल्या मार्गदर्शनाने तयार केल्या आहेत. या संस्था वृध्दिंगत व्हाव्यात यांकरिता त्यांनी स्वतः अंगमेहनत केलेली आहे. स्वतःच्या देह झिजविला आहे. या योजना राबविण्याकरिता स्वतःच्या रक्ताचे पाणी केले आहे आणि या संस्था तयार होऊन नावारुपाला आल्यावर स्वतःच्या कष्टाचे फलित म्हणून त्यांनी त्याचा मोबदला मात्र घेतला नाही. या संस्थेत होणाऱ्या लाभाचा कधी स्वतःकरिता उपयोग केला नाही. किंबहूना कधी साधा चहासुध्दा या संस्थाकडून त्यांनी घेतला नाही. बँकेची आणि मंडळाची वास्तु तयार करतांना स्वतः जातीने बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देऊन ते पूर्ण करण्याची पराकाष्ठा केली. यावरून त्यांनी केलेल्या त्यागाची कल्पना येते.

इतकेच नव्हे तर "आपल्यासारखे करिता तात्काळ, नाही काळवेळ तया लागी" या म्हणीप्रमाणे समर्थ बाबा जुमदेवजींनी आपल्या सर्व सेवकांना स्वावलंबी

जीवन जगण्यास शिकविले आहे. त्यांच्या आचरणात स्वतःसारखा त्याग निर्माण केला आहे. बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द आणि नियमांच्या आचरणाने सेवकांच्या जीवनात त्यागच निर्माण झालेला आहे आणि म्हणून मंडळामार्फत अस्तित्वात आलेल्या सर्व संस्था प्रगतीपथावर आहेत. त्यांनी आपल्या जीवनात सतत त्याग केल्यामुळे त्यांच्यावर परमेश्वरी कृपा आहे.

या परमेश्वरी कार्याकरिता बाबा सतत त्याग करीत आलेले आहेत. बाबांचे हे वरील सर्व प्रकारचे कार्य लक्षात घेऊन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या दि. ५/८/१९८४ च्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत "महानत्यागी बाबा जुमदेवजी" असे संबोधण्यात यावे असे ठरले आणि त्याप्रमाणे सर्व सेवकांतर्फे मंडळाच्या कार्यकारिणीने बाबांना नम्र विनंती केल्यावर सेवकांच्या विनंतीला मान देऊन वरील पदवी स्वीकारण्यास बाबांनी परवानगी दिली. त्याप्रमाणे दि. १६ ऑगस्ट १९८४ रोजी झालेल्या वार्षिक प्रगट दिनाच्या दिवशी बाबांना "महानत्यागी बाबा जुमदेवजी" ही पदवी सर्व सेवकांतर्फे बहाल करण्यात आली. आणि ती बाबांनी हसतमुखाने स्वीकारली. त्या दिवसापासून बाबा सद्गुरु समर्थ या नावाऐवजी "महानत्यागी" बनले.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ★जिवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:- "सर्व सेवक -सेविका"

परमात्मा एक मानवधर्म परिवार

【युवा सेवकांचा ग्रुप】


🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.


Sunday, 15 November 2020

प्रकरण क्र. (२७) "ज्ञान परस मररस योगी"

 


                 "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
                        'सुधारित पाचवी आवृत्ती'


      प्रकरण क्रमांक (२७): ज्ञान पररस मररस योगी

१९८३ सालची घटना आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजी हे आपल्या निवासस्थानी एक दिवस रात्री आपल्या असानावर झोपले होते. त्यांना झोपेत स्वप्न दिसले. त्या स्वप्नात त्यांना कोणीही व्यक्ती किंवा कोणतीही वस्तु दिसली नाही. फक्त त्यांना मोठमोठी अक्षरे लिहिलेली दिसलीत. त्यांच्या मुखातुन सारखे तेच तेच शब्द बाहेर पडत होते. ते शब्द होते "ज्ञान पररस मररस योगी" जवळजवळ अर्धातासपर्यंत ते हे शब्द वाचत होते. त्यानंतर त्यांना जाग आली आणि त्यानंतरसुध्दा त्यांच्या मुखातुन तेच शब्द बाहेर पडत होते म्हणून बाबांनी आपल्या डायरीत त्या शब्दांची नोंद त्याच वेळेस करुन ठेवली. हे शब्द जरी त्यांना स्वप्नात दिसले तरी ते शब्द परमेश्वरानेच त्यांच्या मुखकमलातुन बाहेर काढले होते. त्यावर बाबांनी बराच विचार केला आणि नंतर ते सर्वांना सांगू लागले की, ज्याप्रमाणे परिस नावाच्या वस्तुचा लोखंडाला स्पर्श झाल्यावर ते लोखंड सोने बनते, त्याप्रमाणे ज्ञान हे परिसा सारखे आहे. या ज्ञानाला जो स्पर्श करतो त्याचे सोने होईल. म्हणजे तो महानज्ञानी होतो. परंतु मानवी जीवनात दैवीशक्तीकरिता मनाची एकाग्रता, एक चित्त, एक लक्ष, एक भगवान याची अत्यावश्यकता आहे. हेच दैवी शक्तीचे उगमस्थान आहे.

 परमेश्वराला समोर ठेवून बाबांनी दिलेल्या "मरे या जिये भगवत नामपर" या तत्वाप्रमाणे परमेश्वराच्या नावावर मेले तर भगवंत भक्ताच्या पाठीशी उभा होतो आणि परिसासारखे रस तयार होऊन तो ज्ञानी बनतो. जर तो परमेश्वराच्या चरणी मेला नाही तर रस तयार होत नाही. म्हणून माणूस परमेश्वराच्या चरणी मेल्यावरच त्याचा रस तयार होतो आणि रस बनल्यावर ती व्यक्ती योग्यासारखी बनते. हा या मार्गातील सेवकांना प्रत्यक्षात आलेला अनुभव आहे. परमेश्वराच्या नावावर मरणारी व्यक्ती बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमाने वागली तर ती योगी बनते. अन्यथा तिला कितीही पुस्तकी ज्ञान असले तरी ती योगी बनु शकत नाही. त्याला परमेश्वराची साथ असणे आवश्यक आहे. कर्तव्याने आत्मानुभव येतो. आत्मप्रचिती होते, आत्मज्ञान वाढते. तेव्हाच तो ज्ञानी पुरुष होऊन योगी बनतो हे सिध्द होते.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जिवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.







Thursday, 5 November 2020

प्रकरण क्रमांक : (२६) (असाध्य रोग)



                  "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
                        'सुधारित पाचवी आवृत्ती'

      प्रकरण क्रमांक (२६):  असाध्य रोग

 मानवधर्म हा मार्ग मानवाने आत्मसात केल्यास त्याला झालेले असाध्य रोग नष्ट होतात. उदाहरणार्थ- ह्रदयविकार, कोड, महारोग, कॅन्सर, टी.बी. मुळव्याध, कावीळ मधमेह इत्यादी. यांची अनेक उदाहरणे म्हणून या मार्गातील सेवकांचे अनुभव सांगता येतील. या असाध्य रोगांत वंश परंपरागत आणि संसर्गजन्य असे अनेक रोग आहेत. या मार्गात हे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात.

जेव्हा वरीलपैकी कोणताही रोग उदा. टी.बी., महारोग कोड, मधुमेह, मुळव्याध, हृदयविकार मानवाला झाल्यानंतर जेव्हा तो डॉक्टरांकडे जातो तेव्हा प्रथमच डॉक्टर चौकशी करतात की त्यांच्या घराण्यात हा रोग यापूर्वी कधी झालेला आहे काय? त्यामागील कारण हेच की, हे रोग वंशपरंपरागत आहेत. म्हणून हे रोग होतात आणि यावर औषधोपचार केला तरी तो रोग त्या घराण्यात पुढे कोणालाही होणार नाही याची शाश्वती

डॉक्टरांकडून मिळत नाही. याला कारण "रक्ताचे नाते" म्हणून ते सांगतात. महाननत्यागी बाबा जुमदेवजी यांनी यावर बरेच संशोधन केले आहे आणि या असाध्य रोगांवर मात करुन या मार्गात ते साध्य केलेले आहेत. त्यांचे संशोधनपुढीलप्रमाणे आहे.

 डॉक्टरांच्या निदानाप्रमाणे वंशपरंपरागत रोग होण्याचे कारण, "रक्ताचे नाते" असेल तर तो त्या कुटुंबात प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात असला पाहिजे. परंतु तसे होत नाही. तो एखाद्यालाच असतो. काही वेळेस दोन-तीन पिढ्यानंतर येतो. त्या कुटुंबात तो रोग ज्या व्यक्तीला झाला असेल ती व्यक्ती मरण पावल्यावर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि मोक्ष न मिळाल्यामुळे तो भटकत असतो. तो आत्मा ज्या कुटुंबातून बाहेर पडतो त्या कुटुंबात तो पुनः जाण्याचा प्रयत्न करतो आणि शक्यतोवर तो तेथेच जातो. तेव्हा त्या कुटुंबात तो आत्मा गेल्यावर ज्याला तो स्पर्श करतो त्याला हा रोग जडतो. आणि जोपर्यंत त्या आत्म्याला शांती किंवा मोक्ष मिळत नाही तोपर्यंत रोग त्या कुटुंबातील वंशजात होत असतो.


 ज्या व्यक्तीला असा रोग झाला आहे ती व्यक्ती या मार्गात आल्यावर त्यावर ही दैवीशक्ती कार्य करते आणि ज्या आत्म्याचा त्याला स्पर्श झाला असेल त्यावर मात करते आणि त्या आत्म्याला या लक्ष चौर्यांशी भोगातुन मुक्त करते. ती भटकती आत्मा मुक्त झाल्यावर त्याला मोक्ष मिळतो. त्यामुळे तो पुन्हा भटकत नाही आणि त्यापुढे तो आत्मा कोणालाही स्पर्श करीत नाही. म्हणून त्या कुटुंबात ते दुःख पुन्हा कोणालाही होत नाही. अशा प्रकारे वंशपरंपरागत रोग नष्ट होतात आणि त्या कुटुंबाची त्या रोगापासून मुक्तता होते.

हाच सिध्दांत संसर्गजन्य रोगांकरिता लागू होतो. काही संसर्गजन्य रोग उदा. कावीळ हे धुळीच्या कणांमुळे होतात . वातावरण बदल झाल्यास अनेक रोग उद्भवतात. वातावरण बदलविणे हे सुद्धा त्या सृष्टीनिर्मात्या परमेश्वराचे कार्य आहे. तीच दैवीशक्ती यावर मात करू शकते. म्हणून हेही रोग या मार्गात त्या दैवीशक्तीमुळे बरे होतात.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जिवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.





Thursday, 15 October 2020

"चारोळी संग्रह" आवडल्यास नक्की शेयर करा, नमस्कार

 



दिखावे में सच्चा सुख नही है।

सच्चा सुख हकीकत में है।

झूठे दिखावे से अच्छा है की,

सत्य को ग्रहण करके ख़ुशहाल रहे।


हमारा मार्ग कर्म पर आधारित है।

इसलिए, अच्छे विचार पढ़ने से नही

उन विचारों को आत्मा में ग्रहण करके

उन पर चलने से बदलाव आता है।


 !! नमस्कार !!


🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.