BLOG

Tuesday, 12 January 2021

"मर्यादित कुटुंब" हम दो हमारे दो ! हा नारा अमलात आनुया! कुटुंबाचा उद्धार करूया!


                         【"चर्चा बैठकीचा विषय"】
▶"कुटुंबाचे कल्याण हीच खरी सुखी जीवनाची गाथा आहे, हे म्हण लक्षात घेता "महानत्यागी बाबा जुमदेवजींनी" कशाप्रकारे कुटुंब मर्यादित बाबत सेवकात जनजागृती केली"?

                             【लेख स्पष्टीकरण】
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी नेहमी सेवकांच्या हिताचे कार्य केले बाबांच्या ज्या वेळेस लक्षात आले की, सेवक व्यसनमुक्त झाला तरीपण त्याच्या कुटुंबाची परिस्थिती/अवस्था का पलटत नाही! पूर्वी बाबांनी जीवनात चालण्याकरता घर गृहस्थी उंच आणण्याकरिता अनेक उद्देश सफल करण्याकरिता पाच नियम दिले होते, यात पाचवा नियम "मानव मंदिर सजाना" हा होता बाबांना ज्यावेळी सेवकांच्या परिस्थितीचा विचार आला त्यावेळी त्यांनी आपले "कुटुंब मर्यादित ठेवणे" हा नियम सेवकांना बंधनकारक केला.

"देव मुल जन्माला घालतो, जेवढे होतील तेवढे होऊ द्या! या विचाराला बाबांनी नष्ट केले आहे." 

आपल्या बाबानी फार मोठे मोलाचे कार्य केले आहे.
सेवकांनी आपले कुटुंब लहान ठेवुन आपल्या परिवाराची निगा कशी राखता येईल याकडे लक्ष देण्यासाठी बाबांनी भाग पाडले. मर्यादित कुटुंब जर राहिले तर घर गृहस्थी उंचावली जावू शकते, तसेच परिवाराला संपूर्ण जीवन मिळू शकते.

भारत सरकारने "कुटुंब मर्यादित" यावर अनेक प्रकारे उपक्रम राबविले आहेत. परंतु ते यशस्वी झाले नाही. पण महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी या मानव धर्माची स्थापना करून, गरिबीत जीवन जगणाऱ्या मानवाला सुखी जीवन मिळण्याचा मार्ग दाखविला आहे. आज या मार्गातील कित्येक तरी परिवाराला "मर्यादित कुटुंब" पद्धति मुळे सुखी जीवन मिळाले आहे. पहिले कित्येक तरी परिवारात सदस्य जास्त दिसून येते होते. जसे - एकाच आई - वडील यांच्या पोटी ७-८ मुले जन्माला यायची. आणि त्यांचा गरजा पूर्ण करण्यासाठी आई - वडील अहोरात्र परिश्रम करून सुद्धा पूर्ण होत नव्हती.

कित्येक परिवारात खायला अन्न मिळत नव्हते, शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. अंगावर धड कपडे मिळत नव्हते. अशी परिस्थिती या समाजात निर्माण झाली होती. त्यामुळे परिवारात दुःख, दारिद्रय़, गरिबीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच अनेक वाईट व्यसन मानवाला लागले होते. या सर्व गोष्टी चा विचार विनिमय करून या मार्गाद्वारे सेवकांच्या परिवाराचे कल्याण व्हावे यासाठी "मर्यादित कुटुंब" पद्धतीचा अवलंब केला आहे. यामुळे कित्येक तरी परिवार आज सुखी जीवन जगत आहेत. लोकसंख्येच्या बाबतित आपला देश दुसरा क्रमांकावर आहे. आणि क्षेत्र फळाच्या दृष्टीने सातव्या क्रमांकावर आहे. यामुळे विचार करण्याची गरज निर्माण झाली होती, आणि या मार्गद्वारे ती संपुष्टात यायच्या मार्गावर आहे. 

राष्ट्रीय कार्यात भारत सरकार पूर्वी "हम दो, हमारे तीन" त्यानंतर "हम दो, हमारे दो" हा नारा देत होती. बाबांनी कुटुंबामध्ये म्हणजेच सेवकांना "आपले कुटुंब मर्यादित ठेवणे" हा नियम अमलात आणल्यानंतर कुणाकडे एक अपत्य तर कुणाकडे दोन अपत्य असे आज सेवक परिवार दिसताहेत.

आजची महागाई पाहता शिक्षण, आर्थिक नियोजन व राहणीमान म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा हे तर आवश्यक असून, शिक्षण हे महत्त्वाचे आहे. कुटुंबाचे कल्याण म्हणजे सर्व परिवार सुखी समृद्ध असायला पाहिजे, केव्हा होईल तर आपल्या कुटुंबातील संख्या कमी राहील तर आपले कुटुंब सुखासमाधानाने व शिक्षण क्षेत्रात प्रगती करू शकेल आणि साक्षर भारत हा पाया मानव धर्मातून निर्माण होईल व झालेला आहे.

मोठे कुटुंब असले म्हणजे वयोवृद्ध लोकांची हय गय होते, प्रकृतीविषयी आपण जागृत राहत नाही म्हणून बाबांनी सर्व सेवकांमध्ये कुटुंब मर्यादित असण्याचे अनेक फायदे सेवक कुटुंबात करून दिले. मानव हा समाजशील प्राणी आहे म्हणून त्याला आपल्या कुटुंबाचे संरक्षण व पालनपोषणाची जबाबदारी  स्विकारावीच लागेल. यासाठी बाबांनी सेवकांना कर्म प्रधान सांगुन मानव सेवा हीच ईश्वर सेवा सांगितली. कुटुंबात एकता ठेवायला सांगितली. म्हणून आज आपण बाबांनी दिलेल्या मर्यादित कुटुंबाविषयी जी जनजागृती केली त्याविषयी आपण सुखी झालो.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.


No comments:

Post a Comment